शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Kolhapur: आईच्या डोक्यात खोरे घालून मुलाने केला खून, भाताची टोकण करताना झाला होता किरकोळ वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:01 IST

घाव वर्मी लागल्याने जागीच मृत्यू  

तुरंबे : बारडवाडी (ता. राधानगरी) येथे भाताची टोकण करताना आई, वडील आणि मुलगा यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून मुलाने आईच्या डोक्यात कुदळ मारल्याने मालुबाई श्रीपती मुसळे (वय ६२) या जागीच ठार झाल्या. मुलगा संदीप श्रीपती मुसळे (३५) याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या दरम्यान येथील सुतारकीचा माळ या शेतात घडली. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बारडवाडी येथील श्रीपती मुसळे, मालुबाई मुसळे हे पती-पत्नी आणि मुलगा संदीप हे सोमवारी सकाळी भात टोकणीसाठी सुतारकीचा माळ येथील शेतात गेले होते. काम करता-करता मुलगा आणि आई-वडील यांच्यात वाद झाला. या वादातून संदीप याने कुदळ वडिलांना मारण्याचा प्रयत्न करत असताना ती आईच्या डोक्यात लागली. घाव वर्मी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटना गावात समजताच त्या ठिकाणी लोक जमले होते. वडील आणि मुलगा दोघांनाही दारूचे व्यसन आहे. संदीप सेंट्रिंग काम करतो. मयत मालुबाई यांच्यापश्चात पती, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार, राधानगरीचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह राधानगरी पोलिस उपस्थित होते. सोळांकुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविछेदन केल्यानंतर मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास राधानगरी पोलिस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस