शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

महावितरणकडे स्थिर आकार कोणी मागायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:45 IST

दत्ता पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क म्हाकवे : महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायत, शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकांवर मनमानी पद्धतीने स्थिर आकारांसह इतर करांची ...

दत्ता पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क

म्हाकवे : महावितरण कंपनीकडून ग्रामपंचायत, शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकांवर मनमानी पद्धतीने स्थिर आकारांसह इतर करांची आकारणी केली जाते. मात्र, गावात हवी ती जागा ताब्यात घेऊन तिथे विद्युत खांब, ‘डीपी’ बसवले जातात. मग त्याचे भाडे महावितरणकडून वसूल करायला नको का? असा सवाल ग्रामपंचायतीमधून केला जात आहे.

अलीकडील पाच-सहा वर्षांत महावितरणच्या बिलात अनेक प्रकारचे आकार लावले जात आहेत. त्यामुळे वीज बिलांचा आकडा फुगला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींच्या विद्युत पंपाच्या बिलांची व्यावसायिक दराने आकारणी केली जाते. ही बिले भरताना ग्रामपंचायतींची दमछाक होत आहे. बिले थकली की, महावितरण विद्युत पुरवठाच खंडित करते. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत महावितरणला सर्व सुविधा देते. मात्र, त्यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारीही काही कमी नाहीत. नळपाणी पुरवठा योजनेची वीज बिले ग्रामपंचायतींना डोईजड ठरत आहेत. मिळणारा घरफाळा व पाणीपट्टी ही वीजबिले भरण्यासाठीच जात आहेत. त्यामुळे नोकर पगार, अपंग निधी कोठून द्यायचा हा प्रश्न आहे.

मीटर आमचे मग भाडे का?

बहुतांशी ग्राहकांनी मीटर स्वत: खरेदी केलेली आहेत. वीज जोडणीचा खर्चही ग्राहकच करतो, मग स्थिर आकाराच्या आडून मीटरचे भाडे का वसूल करता? असा प्रश्न शेतकऱ्यांसह इतर ग्राहकांमधून केला जात आहे.

शेतीपंपाचे मीटर बंद तरी....

शेतीपंपांची बहुतांशी मीटर बंद आहेत. अंदाजे रीडिंग टाकून बिलांची आकारणी केली जाते. त्यामुळे भरमसाट बिले येत असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने वीज बिल म्हणजे ‘म्हशीपेक्षा रेडकू’ मोठे असेच आहे.

कोट-

"गावात पोल उभे केल्याबाबत ग्रामपंचायत जागेचे भाडे मागत नाही. पाणीपुरवठा ही गावची गरज आहे. त्यामुळे या योजनेची आकारणी ही व्यावसायिक न आकारता कृषिपंपाप्रमाणेच आकारावी. ग्रामपंचायतींना बळ देण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत निर्णय घ्यावा.

-वंदना रमेश सावंत ( सरपंच, बानगे )

माझ्या शेतात महावितरणने दोन पोल उभा केल्याने दोन-तीन गुंठे जमिनीत मशागतच करता येत नाही. त्यामुळे नुकसान होते, याला जबाबदार कोण?

- रमेश पाटील, ( बेनिक्रे, शेतकरी)