शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मिठाच्या रांगोळीतून दिला सामाजिक संदेश! कोल्हापूरच्या शिवाजी चौगुलेंची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:44 IST

संदीप आडनाईक ।कोल्हापूर : चिमूटभर मीठ जेवणामध्ये गोडी आणते. मिठाशिवाय जेवण नीरस आणि बेचव लागते. या मिठाचाच कलेमध्ये प्रतिभेचा वापर करून सामाजिक संदेश देण्याची किमया शिवाजी चौगुले यांनी साधली आहे.मुंबईत सार्वजनिक आरोग्य विभागात शिपाई असलेले शिवाजी चौगुले यांचे मूळ गाव कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा. दहावीपर्र्यत शिक्षण शिवाजी यांनी सर जे. ...

संदीप आडनाईक ।कोल्हापूर : चिमूटभर मीठ जेवणामध्ये गोडी आणते. मिठाशिवाय जेवण नीरस आणि बेचव लागते. या मिठाचाच कलेमध्ये प्रतिभेचा वापर करून सामाजिक संदेश देण्याची किमया शिवाजी चौगुले यांनी साधली आहे.

मुंबईत सार्वजनिक आरोग्य विभागात शिपाई असलेले शिवाजी चौगुले यांचे मूळ गाव कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा. दहावीपर्र्यत शिक्षण शिवाजी यांनी सर जे. जे. कला महाविद्यालय परिसरात घुटमळून, पाहून कलेची आवड जोपासली.२00४ मध्ये आरोग्य खात्यात त्यांना शिपाई म्हणून नोकरी लागली. कौटुंबिक जबाबदाºया पार पाडत सरकारी कार्यालयातील वार्ताफलकावर दैनंदिन आरोग्य सुविचार आणि घोषवाक्ये लिहायला सुरुवात करत आपल्यातल्या कलाकाराला वाट मिळवून दिली.

रांगोळीतून सामाजिक संदेश२0१५ मध्ये प्रजासत्ताकदिनी स्त्री भ्रूणहत्याविरोधात लेक वाचवा हा संदेश देणारी ४५ किलो मीठापासून मोठी रांगोळी सजविली. माघी गणेश जयंतीला ३0 किलो मीठापासून श्रीगणेशाचे रुप साकारले. स्वातंत्र्यदिनाला ५0 किलो मीठापासून डॉटस क्षयरोग कार्यक्रमांतर्गत पूर्ण कोर्स, पक्का इलाज हा संदेश दिला. शिवजयंतीला ५0 किलो मीठापासून जाणता राजा साकारला. उल्हासनगर पालिका मुख्यालयात आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे या विषयावर १६ बाय २0 चौरस फुटाची तब्बल १६ तास खपून भव्य रांगोळी साकारली. २0१६ च्या स्वातंत्र्यदिनाला नेत्रदान हेच श्रेष्ठदान यावर ४५ किलो मीठापासून रांगोळी साकारली. जागतिक लोकसंख्या दिनी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभाृहात ७0 किलो जाड मीठ आणि ७ किलो रंग वापरुन १६ बाय १८ आकाराची जबाबदारी स्वीकारा, कुटूंब नियोजन पध्दतीचा अवलंब करा, असा संदेश देणारी भव्य आणि नेत्रदीपक रांगोळी रेखाटली. 

कलाकृतीसाठी लागते सरासरी १00 किलो मीठकोणतीही रांगोळी काढताना शिवाजी मोठ्या मीठाचा वापर करतात. सरासरी १00 किलो मीठ एखादी कलाकृती साकारताना लागते. यात काही किलो रंगांचाही वापर केला जातो. कलाकृती साकारण्यासाठी त्यांना अंदाजे ११ तास लागतात.हे मीठ नंतर नारळीच्या झाडांसाठी वापरले जाते. यामुळे झाडांना कीड लागत नाही. रांगोळी कलाकृतींबद्दल त्यांना ४ पुरस्कार मिळालेले असून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी ते प्रयत्न करत आहेत. 

अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांतून माझी कला लोकांसमोर सादर करण्याचा माझा मानस आहे. ही कला जोपासण्यासाठी माझी पत्नी प्रियंका हिची अमूल्य साथ लाभली आहे. कलेमध्ये नावीन्य आणण्यासाठी माझी धडपड आहे. मिठापासून तयार होणाºया कलाकृतीचे प्रदर्शन भरविण्याची आणि याची लिम्का बुकमध्ये नोंद होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.- शिवाजी चौगुले, रांगोळी कलाकार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरArt of Livingआर्ट आॅफ लिव्हिंग