शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

'... म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अपमानित होऊन सत्तेतून बाहेर पडावे लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 21:13 IST

कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील कोरोनाला रोखण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार आता सक्रिय झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपमानित होऊन सत्तेतून बाहेर पडावे लागेल, असे भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी रात्री कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना वर्तवले. हे नको असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटून महाराष्ट्रातील स्थितीमध्ये पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची विनंती करावी, असेही त्यांनी सुचवले.

कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील कोरोनाला रोखण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातूनच बाहेर पडत नाही अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नसल्याचे शरद पवार सक्रिय झाले आहेत. त्यामुळे, उद्धव ठाकरेंना अपमानित होऊन सत्तेतून बाहेर पडावे लागेल, असे भाकितच पाटील यांनी वर्तवले आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी याअगोदर एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. भाजपा वारंवार राज्यपालांची भेट घेत असल्यामुळे सत्ताधारी नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. मात्र, उद्धव ठाकरेंची अपॉईंटमेंट मिळत नसल्यामुळे आम्ही राज्यपालांना भेटतो असं पाटील यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत. मग त्यांना कोरोना रोखण्याबाबत सल्ले कसे देणार असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंची अपॉईंटमेंट मिळवून द्या, आम्ही त्यांना भेटायला तयार आहोत, असंही पाटील म्हणाले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पाटील यांनी कोल्हापुरातून टीका केली आहे. 

दरम्यान, कोरोना संकटाचे कोल्हापूरच्या प्रशासनास गांभीर्य कळले नसून पालकमंत्री सतेज पाटील यांचा हम करे सो कायदा असा कारभार सुरू आहे. कॅबिनेटमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना ते विश्वासात घेत नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार