शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात राष्ट्रवादीसह शिंपी गटात उत्साह

By admin | Updated: August 30, 2015 23:05 IST

जयवंतराव शिंपींचे राजकीय पुनर्वसन : तालुका संघ, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विजयाने बळ

ज्योतीप्रसाद सावंत- आजरा -तडजोडीच्या राजकारणात नकळतपणे घेतल्या गेलेल्या एखाद्या निर्णयाची इतकी मोठी किंमत मोजावी लागते की, जवळचेही दूर जातात. अपयशाची परंपरा सुरू होते, राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. पुन्हा संधीची वाट पाहणे एवढेच हाती राहते आणि ती संधी मिळाल्यावर पुन्हा राजकीय पटलावर मनाजोगे फासे पडू लागतात असाच काहीसा प्रकार जयवंतराव शिंपी यांच्याबाबत घडला. तालुका संघ कृषी उत्पन्न बाजार समिती येथील विजयाने केवळ जयवंतरावांचे राजकीय पुनर्वसन झाले नाही, तर राष्ट्रवादीचेही ‘बळ’ वाढले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह आहे. गत जिल्हा बँक निवडणुकीत विजयाची खात्री असतानाही उमेदवारी ऐनवेळी काशीनाथअण्णा यांना दिली आणि राजकीय पिछेहाट स्वत:हून ओढवून घेतली. बळिरामदादांचा शब्द डावलायचा नाही म्हणून उमेदवारीसह ठरावांची रसदही काशीनाथअण्णा चराटी यांना पुरविली. दुर्दैवाने काशीनाथअण्णा, बळिरामदादांचे निधन झाले. याचा फटका जयवंतरावांच्या राजकीय कारकिर्दीस बसला. वरिष्ठ नेत्यांनी काशीनाथअण्णांच्या जागी जिल्हा बँकेत अशोकअण्णांची वर्णी लावली. आणि नवीन राजकीय समीकरणात विरोधक वाढले ते एकवटले.एकीकडे कारखान्याच्या अडचणी वाढत असतानाच दुसरीकडे राजकीय खिंडीत पकडण्याचे विरोधकांचे मनसुबे यशस्वी झाले. कारखाना, जिल्हा परिषद येथे एकतर्फी लढत देऊन निसटत्या पराभवांना सामोरे जावे लागले. तालुक्यात सर्वांत प्रबळ असणाऱ्या ‘शिंपी’ गटाची मोडतोड झाली. आघाड्यांचे नवीन राजकारण तालुक्यात अस्तित्वात आले. राजू पोतनीस, प्रकाश कुंभार यांच्यासारखे खंदे समर्थक विरोधकांच्या छावणीत दाखल झाले. होणाऱ्या सर्व घडामोडी शांतपणे पाहत जयवंतरावांनी तब्बल साडेचार वर्षे राजकीय वनवास भोगला. राष्ट्रवादीअंतर्गत सुरू असलेल्या कुरबुरींचा परिणाम म्हणून के. पी. पाटलांना आमदारकी गमवावी लागली. राष्ट्रवादीत उभी फूट पडली असताना राष्ट्रवादीलाही नेटक्या ताकदीच्या नेतृत्वाची गरज भासू लागली. राष्ट्रवादीच्या स्थानिक मंडळींनी जयवंतरावांना जवळ केले. जयवंतरावांनाही फायदा झाला. राष्ट्रवादीचेही बळ वाढले. जयवंतरावांची अपयशाची मालिका खंडित झाली.जनता बँक आणि साखर कारखान्यात सक्षम पॅनेल बनण्यास ‘जयवंतराव’ नावाचे वलय राष्ट्रवादीला उपयोगी ठरणार आहे. उतावळेपणामुळे तालुक्यातील अनेकांचे राजकीय भवितव्य संपुष्टात येत असताना संयमाने राजकारण करणाऱ्या जयवंतरावांना मात्र पुन्हा ‘लिफ्ट’ मिळत आहे.