शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शक्तिपीठ महामार्गाच्या हालचाली, शेतकरी हवालदिल; कोल्हापुरात जनआंदोलन होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:50 IST

राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाचे काय  

कोल्हापूर : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या हालचाली महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने सुरू केल्याने कोल्हापुरातील शेतकरी पुन्हा हवालदिल झाले आहेत. विधानसभा निवडणूकीपूर्वी शक्तिपीठ कोल्हापुरातून जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले होते. पण, निवडणुका संपताच रस्ते विकास महामंडळाने प्रक्रिया सुरू केली आहे. याविरोधात पुन्हा जन आंदोलन उभे केले जाणार आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंतचा शक्तिपीठ महामार्ग १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गासाठी हजारो हेक्टर पिकाऊ जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरसह काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध केला आहे.कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन तीव्र बनले होते. निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागणार, म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून हा मार्ग रद्द केल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, रस्ते विकास महामंडळाने या रस्त्यासाठीच्या पर्यावरण विभागाच्या परवानगीची प्रक्रिया सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पुन्हा जनआंदोलन उभे केले जाणार असून, येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतचा निर्णय होणार आहे.

विधानसभेचा गुलाल आहे तोपर्यंतच..विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारने महामार्ग रद्द केल्याचे लेखी पत्र दिले होते. निवडणुकीचा गुलाल अजून अंगाला आहे, तोपर्यंतच सरकारने भूमिका बदल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दृष्टीक्षेपात शक्तिपीठ महामार्ग..

  • महामार्ग - पवनार (यवतमाळ) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग)
  • बाधीत जिल्हे - १२
  • गावे - ३४०
  • अंतर - ८२५ किलोमीटर
  • कोल्हापुरातील गावे - ६०
  • जमीन जाणार - ५२०० एकर

सरकारने दिलेला शब्द बदलण्याची भूमिका घेतली, तर शेतकरी त्यांना सोडणार नाहीत. जिल्ह्यात सर्वच महायुतीचे आमदार आहेत, त्यांनी आपली भूमिका आता जाहीर करण्याची वेळ आली असून, शेतकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ येऊ देऊ नका. - गिरीश फोंडे (समन्वयक, शक्तिपीठ महामार्ग विराेधी शेतकरी संघर्ष समिती).

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गFarmerशेतकरीGovernmentसरकार