शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

शक्तिपीठ महामार्गाच्या हालचाली, शेतकरी हवालदिल; कोल्हापुरात जनआंदोलन होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:50 IST

राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाचे काय  

कोल्हापूर : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या हालचाली महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने सुरू केल्याने कोल्हापुरातील शेतकरी पुन्हा हवालदिल झाले आहेत. विधानसभा निवडणूकीपूर्वी शक्तिपीठ कोल्हापुरातून जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले होते. पण, निवडणुका संपताच रस्ते विकास महामंडळाने प्रक्रिया सुरू केली आहे. याविरोधात पुन्हा जन आंदोलन उभे केले जाणार आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंतचा शक्तिपीठ महामार्ग १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गासाठी हजारो हेक्टर पिकाऊ जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरसह काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध केला आहे.कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन तीव्र बनले होते. निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागणार, म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून हा मार्ग रद्द केल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, रस्ते विकास महामंडळाने या रस्त्यासाठीच्या पर्यावरण विभागाच्या परवानगीची प्रक्रिया सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पुन्हा जनआंदोलन उभे केले जाणार असून, येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतचा निर्णय होणार आहे.

विधानसभेचा गुलाल आहे तोपर्यंतच..विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारने महामार्ग रद्द केल्याचे लेखी पत्र दिले होते. निवडणुकीचा गुलाल अजून अंगाला आहे, तोपर्यंतच सरकारने भूमिका बदल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दृष्टीक्षेपात शक्तिपीठ महामार्ग..

  • महामार्ग - पवनार (यवतमाळ) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग)
  • बाधीत जिल्हे - १२
  • गावे - ३४०
  • अंतर - ८२५ किलोमीटर
  • कोल्हापुरातील गावे - ६०
  • जमीन जाणार - ५२०० एकर

सरकारने दिलेला शब्द बदलण्याची भूमिका घेतली, तर शेतकरी त्यांना सोडणार नाहीत. जिल्ह्यात सर्वच महायुतीचे आमदार आहेत, त्यांनी आपली भूमिका आता जाहीर करण्याची वेळ आली असून, शेतकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ येऊ देऊ नका. - गिरीश फोंडे (समन्वयक, शक्तिपीठ महामार्ग विराेधी शेतकरी संघर्ष समिती).

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गFarmerशेतकरीGovernmentसरकार