शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आहारशैलीबाबत गांभीर्याने विचार आवश्यक : निखिल गुळवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:14 IST

गोड पदार्थ अधिक खाण्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. ते संतुलित ठेवण्यासाठी शरीरातील इन्सुलीनचे प्रमाण वाढते. ही परिस्थिती कॅन्सरची शक्यता वाढविण्याची आणि असेल तर तो अधिक पसरण्याची शक्यता वाढवितो. - डॉ. निखिल गुळवणी

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत

समीर देशपांडे ।गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. पदार्थ टिकविण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक रासायनिक घटक समाविष्ट केले जात आहेत. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कॅन्सरची शक्यता बळावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच आहाराच्या शैलीबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. याबाबत येथील अ‍ॅपल सरस्वती हॉस्पिटलमधील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. निखिल गुळवणी यांची मुलाखत....

प्रश्न : एकूणच बदलत्या आहारशैलीबाबत तुमचे मत काय?उत्तर : गेल्या काही वर्षांत आहारशैली बदलली आहे, हे वास्तव आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पौष्टिकतेपेक्षा चवीला जे चांगले लागते तेच खाण्याकडे सर्वांचा कल असल्याने त्याचे दुष्परिणामही जाणवायला सुरुवात झाली आहे. मधुमेह, हृदयरोगाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आहारशैलीबाबत दक्ष राहण्याची वेळ आली आहे, हे मात्र निश्चित. 

प्रश्न : कॅन्सर कशाकशामुळे होऊ शकतो?उत्तर : अनमॉडिफाईड म्हणजे ज्यामध्ये बदल करता येत नाही असे आणि मॉडिफाईड म्हणजे ज्यामध्ये रोग होण्याची कारणे आपण टाळू शकतो अशांमुळे कॅन्सर होतो. पहिल्या भागात वय आणि अनुवंशिकतेमुळेही कॅन्सर होऊ शकतो. दुसऱ्या भागात तंबाखू खाणे, धुम्रपान, सातत्यपूर्ण मद्यपान अशा अनेक कारणांमुळे कॅन्सर होऊ शकतो. 

प्रश्न : कॅन्सरच्या रुग्णांसाठी आहार कसा महत्त्वाचा ठरतो?उत्तर : आमच्याकडे चार अवस्थांमधील कॅन्सरचे रुग्ण येतात. तिसºया आणि चौथ्या अवस्थांमधील रुग्णांवर उपचार करताना प्रामुख्याने त्यांची शस्रक्रिया करावी लागते. त्यानंतर केमोचे उपचार करावे लागतात.अशावेळी त्यांचा आहार योग्य, संतुलित असेल, तर त्यांना जाणवणाºया त्रासाचे प्रमाण कमी होते.कोणत्या कारणांमुळे कॅन्सर होतो?नव्या संशोधनानुसार दुधाचे सातत्यपूर्ण सेवन हे देखील कॅन्सरची शक्यता वाढविणारे ठरत आहे. यासाठी शास्त्रीय पुरावा नसला, तरी जेव्हा विविध रुग्णांचे निरीक्षण केले जाते तेव्हा त्यातून हा निष्कर्ष काढण्यात येत आहे. दूध उत्पादन वाढविण्यासाठी जनावरांना दिली जाणारी इंजेक्शन्स, भाजीपाला लवकर तयार करण्यासाठी, तसेच फळे पिकविण्यासाठी रसायने वापरली जातात.

कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावे?मुळात आहाराबाबतच संतुलितपणा साधावा लागेल. नव्या संशोधनानुसार तुमच्या जेवणामध्ये ५0 टक्के सॅलेड आणि हिरव्या भाज्यांचा समावेश हवा. २५ टक्के उसळी, भात, चपात्या तर २५ टक्के चिकन, मासे यांचा समावेश असावा. ‘रेडी टु इट’पदार्थ टाळणे आरोग्याच्यादृष्टीने हिताचे ठरते. दैनंदिन व्यायाम आवश्यक आहे. लहान मुलांना आपण दुधातून बरेच काही मिश्रण करून देत असतो; परंतु अशा पावडरमध्ये साखरेचे प्रमाण खूप असते. ते हितावह नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टर