शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आहारशैलीबाबत गांभीर्याने विचार आवश्यक : निखिल गुळवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 01:14 IST

गोड पदार्थ अधिक खाण्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. ते संतुलित ठेवण्यासाठी शरीरातील इन्सुलीनचे प्रमाण वाढते. ही परिस्थिती कॅन्सरची शक्यता वाढविण्याची आणि असेल तर तो अधिक पसरण्याची शक्यता वाढवितो. - डॉ. निखिल गुळवणी

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखत

समीर देशपांडे ।गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. पदार्थ टिकविण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक रासायनिक घटक समाविष्ट केले जात आहेत. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कॅन्सरची शक्यता बळावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच आहाराच्या शैलीबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. याबाबत येथील अ‍ॅपल सरस्वती हॉस्पिटलमधील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. निखिल गुळवणी यांची मुलाखत....

प्रश्न : एकूणच बदलत्या आहारशैलीबाबत तुमचे मत काय?उत्तर : गेल्या काही वर्षांत आहारशैली बदलली आहे, हे वास्तव आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पौष्टिकतेपेक्षा चवीला जे चांगले लागते तेच खाण्याकडे सर्वांचा कल असल्याने त्याचे दुष्परिणामही जाणवायला सुरुवात झाली आहे. मधुमेह, हृदयरोगाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आहारशैलीबाबत दक्ष राहण्याची वेळ आली आहे, हे मात्र निश्चित. 

प्रश्न : कॅन्सर कशाकशामुळे होऊ शकतो?उत्तर : अनमॉडिफाईड म्हणजे ज्यामध्ये बदल करता येत नाही असे आणि मॉडिफाईड म्हणजे ज्यामध्ये रोग होण्याची कारणे आपण टाळू शकतो अशांमुळे कॅन्सर होतो. पहिल्या भागात वय आणि अनुवंशिकतेमुळेही कॅन्सर होऊ शकतो. दुसऱ्या भागात तंबाखू खाणे, धुम्रपान, सातत्यपूर्ण मद्यपान अशा अनेक कारणांमुळे कॅन्सर होऊ शकतो. 

प्रश्न : कॅन्सरच्या रुग्णांसाठी आहार कसा महत्त्वाचा ठरतो?उत्तर : आमच्याकडे चार अवस्थांमधील कॅन्सरचे रुग्ण येतात. तिसºया आणि चौथ्या अवस्थांमधील रुग्णांवर उपचार करताना प्रामुख्याने त्यांची शस्रक्रिया करावी लागते. त्यानंतर केमोचे उपचार करावे लागतात.अशावेळी त्यांचा आहार योग्य, संतुलित असेल, तर त्यांना जाणवणाºया त्रासाचे प्रमाण कमी होते.कोणत्या कारणांमुळे कॅन्सर होतो?नव्या संशोधनानुसार दुधाचे सातत्यपूर्ण सेवन हे देखील कॅन्सरची शक्यता वाढविणारे ठरत आहे. यासाठी शास्त्रीय पुरावा नसला, तरी जेव्हा विविध रुग्णांचे निरीक्षण केले जाते तेव्हा त्यातून हा निष्कर्ष काढण्यात येत आहे. दूध उत्पादन वाढविण्यासाठी जनावरांना दिली जाणारी इंजेक्शन्स, भाजीपाला लवकर तयार करण्यासाठी, तसेच फळे पिकविण्यासाठी रसायने वापरली जातात.

कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावे?मुळात आहाराबाबतच संतुलितपणा साधावा लागेल. नव्या संशोधनानुसार तुमच्या जेवणामध्ये ५0 टक्के सॅलेड आणि हिरव्या भाज्यांचा समावेश हवा. २५ टक्के उसळी, भात, चपात्या तर २५ टक्के चिकन, मासे यांचा समावेश असावा. ‘रेडी टु इट’पदार्थ टाळणे आरोग्याच्यादृष्टीने हिताचे ठरते. दैनंदिन व्यायाम आवश्यक आहे. लहान मुलांना आपण दुधातून बरेच काही मिश्रण करून देत असतो; परंतु अशा पावडरमध्ये साखरेचे प्रमाण खूप असते. ते हितावह नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टर