शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

Vidhan Sabha Election 2024: बेसावध राहिल्याचा काँग्रेसला मोठा फटका, कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील यांचा लागणार कस

By भारत चव्हाण | Updated: November 26, 2024 16:57 IST

पुन्हा उभारण्याची ताकद : काँग्रेसमुक्त जिल्हा दावा चुकीचा

भारत चव्हाणकोल्हापूर : राजकारणात कोणाला गृहीत धरून चालत नाही. मतदारांनाच काय तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनाही गृहीत धरून चालत नाही. जेथे ‘डॅमेज’ झाले असेल तेथे तत्काळ सुधारणा करावी लागते. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी दूर करावी लागते. कार्यकर्त्यांना महत्त्व द्यावे लागते. परंतु ‘काँग्रेस’ पक्षाने याच चुका केल्या. त्याची जिल्ह्यात पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. आजच्या घडीला जिल्हा काँग्रेसमुक्त असला तरी तो संपला असे नाही. पक्षाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया नव्याने सुरू करावी लागणार आहे.

जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना पक्षाने राज्य पातळीवरील नेतृत्वाची जबाबदारी दिल्याने त्यांना विधानसभा निवडणूक काळात मुंबई, दिल्ली येथील बैठकीत सातत्याने भाग घ्यावा लागला. त्यांच्या नंतर दुसरे नेतृत्वच पक्षात नसल्याने पक्ष समन्वयाची प्रक्रिया ढिली पडली. काँग्रेस बेसावध राहिली. त्याचा परिणाम पाच जागा मिळूनदेखील एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. एकही आमदार निवडून आला नाही म्हणून जिल्हा काँग्रेसमुक्त झाला असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण २०१४ च्या निवडणुकीत आतासारखा एकही आमदार काँग्रेसचा झाला नाही, मात्र २०१९ च्या निवडणुकीत सर्वाधिक चार आमदार निवडून आले. काँग्रेस तळागाळात रुजली आहे. ती इतक्या सहजासहजी संपणार नाही.

महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा आणि राष्ट्रीय पक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही या पक्षाची ताकद मोठी आहे. सहकारी संस्था ताब्यात आहेत. या संस्थांवर संचालकही काँग्रेस विचाराचे आहेत. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हा जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले. त्यावेळी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात पुन्हा उभारणार नाही असे वाटत होते. परंतु उरलेल्या मावळ्यांना सोबत घेऊन माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड, कल्लाप्पाण्णा आवाडे, पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेस नव्याने उभी केली.

अलीकडील काही वर्षांत विशेषत: पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसची जबाबदारी एकट्या आमदार सतेज पाटील यांच्यावर येऊन पडली आहे. त्यांच्या तोडीचा कोणीच नेता सध्या पक्षात दिसत नाही. त्यानेच पक्षाचे नुकसान होत आहे. त्यामुळे नेतृत्वाची नवी फळी निर्माण करणे काँग्रेससमोरील पहिले आव्हान आहे. त्यानंतर समाजसेवेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची कामे करणे हे दुसरे आव्हान आहे. अनेकदा आपण पाहतो की, काँग्रेस पक्षात कार्यकर्ते समाजकारणाला फारसे महत्त्व देत नाहीत. पण पुढील काळात टिकायचे असेल ते हे करावेच लागणार आहे.

सतेज पाटील यांचा कसोटीचा काळ सुरूजिल्ह्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्याची तयारी आतापासून करावी लागणार आहे. विधानसभेत झालेल्या दारुण पराभव जिव्हारी लावून न घेता नव्या उमेदीने कामाला लागण्याची काँग्रेसला जास्त आवश्यकता आहे. कारण ‘थांबला तो संपला’ असे म्हणतात. त्यामुळे थांबून चालणार नाही. अडचणी आल्यानंतरच कसोटीचा काळ सुरू होतो. सतेज पाटील यांचा कसोटीचा काळ सुरू झाला आहे. पक्षाला ते कशी उभारी देतात हे पाहावे लागेल.

उमेदवार - मते

  • ऋतुराज पाटील - १,२९,६५६
  • राहुल पाटील - १,३२,५५२
  • राजेश लाटकर पुरस्कृत - ८१,५२२
  • राजूबाबा आवळे - ८७,९४२
  • गणपतराव पाटील - ९३, ८१४
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024