शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

Vidhan Sabha Election 2024: बेसावध राहिल्याचा काँग्रेसला मोठा फटका, कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील यांचा लागणार कस

By भारत चव्हाण | Updated: November 26, 2024 16:57 IST

पुन्हा उभारण्याची ताकद : काँग्रेसमुक्त जिल्हा दावा चुकीचा

भारत चव्हाणकोल्हापूर : राजकारणात कोणाला गृहीत धरून चालत नाही. मतदारांनाच काय तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनाही गृहीत धरून चालत नाही. जेथे ‘डॅमेज’ झाले असेल तेथे तत्काळ सुधारणा करावी लागते. कोणी नाराज असेल तर त्यांची नाराजी दूर करावी लागते. कार्यकर्त्यांना महत्त्व द्यावे लागते. परंतु ‘काँग्रेस’ पक्षाने याच चुका केल्या. त्याची जिल्ह्यात पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. आजच्या घडीला जिल्हा काँग्रेसमुक्त असला तरी तो संपला असे नाही. पक्षाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया नव्याने सुरू करावी लागणार आहे.

जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना पक्षाने राज्य पातळीवरील नेतृत्वाची जबाबदारी दिल्याने त्यांना विधानसभा निवडणूक काळात मुंबई, दिल्ली येथील बैठकीत सातत्याने भाग घ्यावा लागला. त्यांच्या नंतर दुसरे नेतृत्वच पक्षात नसल्याने पक्ष समन्वयाची प्रक्रिया ढिली पडली. काँग्रेस बेसावध राहिली. त्याचा परिणाम पाच जागा मिळूनदेखील एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. एकही आमदार निवडून आला नाही म्हणून जिल्हा काँग्रेसमुक्त झाला असे अजिबात म्हणता येणार नाही. कारण २०१४ च्या निवडणुकीत आतासारखा एकही आमदार काँग्रेसचा झाला नाही, मात्र २०१९ च्या निवडणुकीत सर्वाधिक चार आमदार निवडून आले. काँग्रेस तळागाळात रुजली आहे. ती इतक्या सहजासहजी संपणार नाही.

महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा आणि राष्ट्रीय पक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही या पक्षाची ताकद मोठी आहे. सहकारी संस्था ताब्यात आहेत. या संस्थांवर संचालकही काँग्रेस विचाराचे आहेत. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हा जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले. त्यावेळी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात पुन्हा उभारणार नाही असे वाटत होते. परंतु उरलेल्या मावळ्यांना सोबत घेऊन माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड, कल्लाप्पाण्णा आवाडे, पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेस नव्याने उभी केली.

अलीकडील काही वर्षांत विशेषत: पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसची जबाबदारी एकट्या आमदार सतेज पाटील यांच्यावर येऊन पडली आहे. त्यांच्या तोडीचा कोणीच नेता सध्या पक्षात दिसत नाही. त्यानेच पक्षाचे नुकसान होत आहे. त्यामुळे नेतृत्वाची नवी फळी निर्माण करणे काँग्रेससमोरील पहिले आव्हान आहे. त्यानंतर समाजसेवेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची कामे करणे हे दुसरे आव्हान आहे. अनेकदा आपण पाहतो की, काँग्रेस पक्षात कार्यकर्ते समाजकारणाला फारसे महत्त्व देत नाहीत. पण पुढील काळात टिकायचे असेल ते हे करावेच लागणार आहे.

सतेज पाटील यांचा कसोटीचा काळ सुरूजिल्ह्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्याची तयारी आतापासून करावी लागणार आहे. विधानसभेत झालेल्या दारुण पराभव जिव्हारी लावून न घेता नव्या उमेदीने कामाला लागण्याची काँग्रेसला जास्त आवश्यकता आहे. कारण ‘थांबला तो संपला’ असे म्हणतात. त्यामुळे थांबून चालणार नाही. अडचणी आल्यानंतरच कसोटीचा काळ सुरू होतो. सतेज पाटील यांचा कसोटीचा काळ सुरू झाला आहे. पक्षाला ते कशी उभारी देतात हे पाहावे लागेल.

उमेदवार - मते

  • ऋतुराज पाटील - १,२९,६५६
  • राहुल पाटील - १,३२,५५२
  • राजेश लाटकर पुरस्कृत - ८१,५२२
  • राजूबाबा आवळे - ८७,९४२
  • गणपतराव पाटील - ९३, ८१४
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024