शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सतेज-पी. एन. पाटील यांचे ऐक्य कधी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 10:57 AM

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत कोण निवडून येणार याबद्दलही पैजा लागत असल्या, तरी काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र एका वेगळ्याच प्रश्नाने पोखरले आहे. या पक्षाचे दोन दिग्गज नेते आमदार सतेज पाटील व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यात ऐक्य होणार का? याबद्दलच त्यांना कमालीची उत्सुकता लागली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस कार्यकर्त्यांत उत्सुकता विधानसभेतील यशावर होणार परिणाम

विश्र्वास पाटील कोल्हापूर : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत कोण निवडून येणार याबद्दलही पैजा लागत असल्या, तरी काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र एका वेगळ्याच प्रश्नाने पोखरले आहे. या पक्षाचे दोन दिग्गज नेते आमदार सतेज पाटील व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यात ऐक्य होणार का? याबद्दलच त्यांना कमालीची उत्सुकता लागली आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघातील (गोकुळ) सत्ता हा या ऐक्यातील महत्त्वाचा अडसर आहे. गोकुळप्रश्नी पी. एन. पाटील काय भूमिका घेतात, यावरूनच या दोघांतील सख्य, विधानसभा निवडणुकीतील या दोघांचे व पक्षाचे यश व जिल्ह्यातील काँग्रेसचे भवितव्यही निश्चित होणार आहे.सध्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद प्रकाश आवाडे यांच्याकडे आहे. त्यांचे व या दोघांचेही आता चांगले संबंध आहेत; त्यामुळे जिल्ह्यात अन्य नेत्यांत (आहेत तरी कोण म्हणा) आता फारशी बेदिली नाही; परंतु ज्यांचा आजही पक्षाच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे, असे पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्यातच आज गैरविश्वासाचे वातावरण आहे.

लोकसभा निवडणुकीत आमदार पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांना विरोध केला. पी. एन. पाटील यांनी मात्र महाडिक यांच्याबद्दलचा जुना अनुभव फारसा चांगला नसतानाही त्यांच्यासाठी काम केले. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी असली, तरी कोल्हापुरात मात्र सामान्य शेतकरी, गोरगरीब जनतेला मात्र ती गोकुळ दूध संघाचे भवितव्य ठरविणारी असल्याचे वाटले.

संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक हे संघ मल्टिस्टेट करण्यास निघाले आहेत. तसे झालेच, तर संघाची मालकी महाडिक कुटुंबाकडे जाईल व त्यातून जिल्ह्याच्या अर्थकारणाचा, विकासाचा व राजकारणाचाही कणा असलेली ही संस्था अडचणीत येईल, असे लोकांना वाटले. संघाच्या वार्षिक सभेत सामान्य माणसाला त्याविरोधात काही करता आले नव्हते; त्यामुळे त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले. आता विधानसभा व गोकुळ निवडणुकीपर्यंत हा मुद्दा असाच तापत राहणार आहे.लोकसभेच्या निकालानंतर पी. एन. पाटील यांचा मल्टिस्टेटबद्दलचा आग्रह कायम राहणार, की ते आपली भूमिका बदलणार याचा त्यांच्या विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होणार आहे. पी. एन. व सतेज यांनी एकत्र यावे, असे सच्चा काँग्रेस कार्यकत्यांना वाटते; परंतु त्यात आजतरी गोकुळच्या सत्तेचीच आडकाठी आहे.

गोकुळच्या सत्तेवरून पडलेल्या या दोन नेत्यांतील दरी तशीच कायम राहिल्यास त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होणार आहेत; त्यामुळे या दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेऊन पक्षाच्या व व्यक्तिगत राजकीय भवितव्याचाही विचार करून एकत्र यावे, असे कार्यकर्त्यांना वाटते. हे दोघेही नेते सुज्ञ आहेत; त्यामुळे याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. ते परस्परांना किती विश्वास देतात, यावरच या घडामोडी अवलंबून असणार आहेत.

खरी मेख इथेच...आता ‘गोकुळ’मध्ये महाडिक व पी. एन. हेच प्रमुख नेते आहेत. या सत्तेचा मोठा लाभ महाडिक यांच्या राजकारणाला व व्यक्तिगत अर्थकारणालाही होत असला, तरी पी. एन. आपल्यासोबत नाही राहिले तर संघाची सत्ता ताब्यात राहत नाही, हे त्यांना अगदी पक्के माहीत आहे; त्यामुळे गोकुळमध्ये ते पी. एन. यांना दुखावत नाहीत. पी. एन. यांच्या राजकारणासाठीही गोकुळची सत्ता हाच मुख्य कणा आहे. ते भोगावती कारखान्याचे अध्यक्ष असले, तरी तिथे खिशातील पाकीट काढून चहा प्यावा लागतो, अशी कारखान्याची आर्थिक स्थिती आहे.

पी. एन. - सतेज एकत्र आल्यास गोकु ळची सत्ता काँग्रेसकडे राहू शकते. पी. एन. हे त्या सत्तेचे मुख्य नेते होऊ शकतात; परंतु आता जसा त्यांचा तिथे शब्द चालतो, तसा शब्द सतेज पाटील यांच्यासोबत एकत्र आल्यास चालणार का? ही शाश्वती पी. एन. यांना वाटत नाही हीच खरी हे दोघे एकत्र येण्यातील मेख आहे.

‘मनपा’ला ‘मुनपा’चे आव्हान...पी. एन. यांची आतापर्यंतची तरी भूमिका मल्टिस्टेटच्या बाजूने राहिली आहे. सतेज पाटील हे त्याविरोधात थेट मैदानात उतरले आहेत. या लढाईत त्यांना पी. एन. यांचे राजकीय विरोधक व करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे मोठे पाठबळ आहे. गोकुळ दूध संघातील पुढील निवडणूक ही सतेज पाटील, चंद्रदीप नरके व आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

गोकुळच्या राजकारणात ३० वर्षांनंतर ‘मुनपा’ जुन्या ‘मनपा’ला आव्हान देण्याच्या स्थितीत आहे. अशा स्थितीत पी. एन. व सतेज हे गोकुळमध्ये एकमेकांच्या विरोधात ठाकले, तर त्यातून काँग्रेसमध्येही दुफळी माजणार आहे. पी. एन. हे सतेज पाटील यांच्या आघाडीसोबत आले, तर नरके व त्यांची मोट कशी बांधणार ? हा कळीचा मुद्दा राहणारच आहे. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर