शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Rajya Sabha Election: संभाजीराजेंची माघार शक्य!, दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 11:44 IST

शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात येत असला तरी अजूनही हा शिवसेनेचा दबावतंत्राचा भाग समजला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून संभाजीराजे यांना संधी दिली जावी या हालचाली थांबलेल्या नाहीत. शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.बुधवारी दिवसभर संभाजीराजे यांच्या पातळीवर कोणतीही नवी घडामोड नव्हती. मुंबईत थांबून ते विविध लोकांच्या संपर्कात होते. शिवसेनेने मात्र एक पाऊल पुढे टाकत संजय पवार यांचा अर्ज दाखल करण्याची तयारी केली. त्यामुळे ही कोंडी कायम राहिली. तुमचा आम्ही जरूर सन्मान करू; परंतु तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा..तुम्हाला आमची मते तर हवीत आणि पक्षीय बांधीलकी नको हे कसे चालेल या भूमिकेवर शिवसेना ताठर आहे. त्यामुळेच त्यांनी हेतुपुरस्सर कोल्हापूरचा आणि त्यातही मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे.

कोणत्याच पक्षाने पाठबळ दिले नाही तर संभाजीराजे यांच्यापुढे या लढतीतून माघार घेण्याशिवाय अन्य कोणताच पर्याय नाही. कारण उमेदवारी अर्जच दाखल करण्यासाठी दहा आमदार सूचक म्हणून लागतात. पक्षीय पाठबळ नसेल, तर हे आमदार आणणार कोठून, हा प्रश्नच आहे. महाविकास आघाडीत आठ, तर विरोधात भाजपकडे पाच अपक्ष आमदार आहेत.

लढायचेच झाले तर त्यांच्याशी पाठिंब्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल करावी लागेल, शिवाय विजयाची हमी नसताना अर्ज भरण्यातही काहीच हशील नाही. त्यामुळे एकतरी शिवसेनेचा पर्याय स्वीकारणे किंवा लढतीतून बाजूला होणे हेच दोनच पर्याय आजच्या घडीला त्यांच्यापुढे आहेत. त्यातून ते कोणत्या मार्गाने पुढे जातात यावर त्यांच्या राजकीय वाटचालीचीही दिशा ठरणार आहे. संभाजीराजे यांना भाजपने राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले; परंतु त्यांच्या खासदारकीचा भाजपला पक्ष म्हणून काडीमात्र फायदा झाला नाही. हा अनुभव असल्यानेच शिवसेनेने पक्षीय उमेदवारीचा आग्रह धरला आहे.

शरद पवार यांच्यावर मर्यादा...

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यातून काही तोडगा काढतील का, अशीही चर्चा सुरू आहे; परंतु त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. कारण ही जागाच शिवसेनेची आहे.
  • मागील दोन वर्षांपूर्वी स्वत: पवार व फौजिया खान यांच्या राज्यसभेवरील निवडीवेळी शिवसेनेने पवार यांचा शब्द मानून आपली वाढीव मते त्यांना दिली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळी काही भूमिका घेणे शक्य नाही.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की त्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते सहसा बदलत नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या बाजूने उमेदवारीचा विषय संपल्यात जमा आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवार