शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Rajya Sabha Election: संभाजीराजेंची माघार शक्य!, दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 11:44 IST

शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात येत असला तरी अजूनही हा शिवसेनेचा दबावतंत्राचा भाग समजला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून संभाजीराजे यांना संधी दिली जावी या हालचाली थांबलेल्या नाहीत. शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.बुधवारी दिवसभर संभाजीराजे यांच्या पातळीवर कोणतीही नवी घडामोड नव्हती. मुंबईत थांबून ते विविध लोकांच्या संपर्कात होते. शिवसेनेने मात्र एक पाऊल पुढे टाकत संजय पवार यांचा अर्ज दाखल करण्याची तयारी केली. त्यामुळे ही कोंडी कायम राहिली. तुमचा आम्ही जरूर सन्मान करू; परंतु तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा..तुम्हाला आमची मते तर हवीत आणि पक्षीय बांधीलकी नको हे कसे चालेल या भूमिकेवर शिवसेना ताठर आहे. त्यामुळेच त्यांनी हेतुपुरस्सर कोल्हापूरचा आणि त्यातही मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे.

कोणत्याच पक्षाने पाठबळ दिले नाही तर संभाजीराजे यांच्यापुढे या लढतीतून माघार घेण्याशिवाय अन्य कोणताच पर्याय नाही. कारण उमेदवारी अर्जच दाखल करण्यासाठी दहा आमदार सूचक म्हणून लागतात. पक्षीय पाठबळ नसेल, तर हे आमदार आणणार कोठून, हा प्रश्नच आहे. महाविकास आघाडीत आठ, तर विरोधात भाजपकडे पाच अपक्ष आमदार आहेत.

लढायचेच झाले तर त्यांच्याशी पाठिंब्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल करावी लागेल, शिवाय विजयाची हमी नसताना अर्ज भरण्यातही काहीच हशील नाही. त्यामुळे एकतरी शिवसेनेचा पर्याय स्वीकारणे किंवा लढतीतून बाजूला होणे हेच दोनच पर्याय आजच्या घडीला त्यांच्यापुढे आहेत. त्यातून ते कोणत्या मार्गाने पुढे जातात यावर त्यांच्या राजकीय वाटचालीचीही दिशा ठरणार आहे. संभाजीराजे यांना भाजपने राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले; परंतु त्यांच्या खासदारकीचा भाजपला पक्ष म्हणून काडीमात्र फायदा झाला नाही. हा अनुभव असल्यानेच शिवसेनेने पक्षीय उमेदवारीचा आग्रह धरला आहे.

शरद पवार यांच्यावर मर्यादा...

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यातून काही तोडगा काढतील का, अशीही चर्चा सुरू आहे; परंतु त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. कारण ही जागाच शिवसेनेची आहे.
  • मागील दोन वर्षांपूर्वी स्वत: पवार व फौजिया खान यांच्या राज्यसभेवरील निवडीवेळी शिवसेनेने पवार यांचा शब्द मानून आपली वाढीव मते त्यांना दिली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळी काही भूमिका घेणे शक्य नाही.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की त्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते सहसा बदलत नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या बाजूने उमेदवारीचा विषय संपल्यात जमा आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवार