शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

चार इंग्रजी वाक्य बोलले अन् संसदेत आयपॅड घेऊन गेल्यानंतरच मेरिट असतं असं नाही; रूपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 4:19 PM

'पक्षात महिला जरा स्वकर्तृत्वानं पुढं जायला लागली की डोईजड होतात म्हणून बाजूला करायचं हे अनेक वेळा घडलंय'

कोल्हापूर: सुनेत्रा पवार यांचे ‘मेरिट काय’ अशी विचारणा करून सुप्रिया सुळे यांनी समस्त महिलांचा अपमान केला असल्याची टीका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली. चाकणकर यांनी शुक्रवारी संध्याकाळी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे उपस्थित होत्या.‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’चे विभागप्रमुख, पत्रकार उपस्थित होते. चाकणकर म्हणाल्या, डोक्यावरून कडबा घेऊन जाणाऱ्या, गोठ्यातलं काम करून घर, शेती सांभाळणाऱ्या महिलांचंही मेरिट असते. तुम्ही कोण ठरवणार मेरिट. तुम्हीही साहेबांची मुलगी म्हणूनच पहिल्यांदा निवडणुकीत उतरला. त्यामुळे सुळे यांनी सुनेत्राताईंच्या मेरिटची विचारणा करणं अपमानास्पद आहे. मोठ्या प्रमाणावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचं, साफसफाईची कामे आणि वृक्षारोपण करण्याचं रेकॉर्ड सुनेत्राताईंच्या नावावर आहे. चार इंग्रजी वाक्य बोलले आणि संसदेत आयपॅड घेऊन गेल्यानंतरच मेरिट असते असे नाही. महिलांचा हा केलेला अपमान मतदानातून आम्ही दाखवून देऊ.

अजित पवारांच्या निर्णयाबद्दल त्या म्हणाल्या, काकांची पुतण्यानं साथ साेडली हे भावनिक वातावरण आता संपलं आहे. आता जनतेला विकासकामं करून दाखवणारा नेता हवाय. त्यामुळे राज्यभरातून आम्हाला पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक वेळी भाजपसोबत चर्चा करण्यासाठी पाठवायचं आणि नंतर तोंडघशी पाडायचं. यातूनच अजित पवार यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला. पक्षात महिला जरा स्वकर्तृत्वानं पुढं जायला लागली की डोईजड होतात म्हणून बाजूला करायचं हे अनेक वेळा घडलंय. माझ्या बाबतीत दोन वेळा असंच झालंय.बहिणीबद्दलचं अजित पवार यांचं प्रेम सांगताना त्या म्हणाल्या, विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांचा नागीण म्हणून उल्लेख केला होता. तेव्हा बहिणीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवतारे यांना ‘तू पुढच्या वेळ निवडून कसा येतोस ते पाहतो’ आणि त्यानंतर त्यांचा पराभवही केला. अशा भावाच्या पत्नीचं तुम्ही ‘मेरिट’ काढता हे योग्य नाही.

घराघरातील संवाद वाढायला हवाएकूणच महिलांविषयक वाढते गुन्हे, मुलींच्या आत्महत्या, घटस्फोट हे सगळे पाहता महाराष्ट्र जेवढा वरून उत्तम, चांगला दिसतो तशी परिस्थिती नाही. मुलामुलींबाबतचे गुन्हे पाहिले असता घराघरातील संवाद वाढण्याची गरज आहे, असे मत चाकणकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRupali Chakankarरुपाली चाकणकरSupriya Suleसुप्रिया सुळे