शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

'...तर पुढील निवडणुकीत मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 14:54 IST

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आघाडीचे घटक असतील. त्यांनी कुणाशी आघाडी करावी हा त्यांचा प्रश्न असून काँग्रेसच्या व्यासपीठावर मात्र एमआयएमला स्थान नसेल असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (14 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ठळक मुद्देआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आघाडीचे घटक असतील.देशात सर्वच पातळीवर प्रचंड अस्वस्थता असून त्याचा फटका बसेल म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आगामी निवडणुकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार ही बदलू शकेल.राज्यातील दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे जागावाटप पूर्ण होत आले आहे. 5 ते 6 जागांचा तिढा आहे.

कोल्हापूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आघाडीचे घटक असतील. त्यांनी कुणाशी आघाडी करावी हा त्यांचा प्रश्न असून काँग्रेसच्या व्यासपीठावर मात्र एमआयएमला स्थान नसेल असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (14 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सध्या देशात सर्वच पातळीवर प्रचंड अस्वस्थता असून त्याचा फटका बसेल म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आगामी निवडणुकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार ही बदलू शकेल अशी शक्यता ही चव्हाण यांनी व्यक्त केली. 

राज्यातील दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे जागावाटप पूर्ण होत आले आहे. 5 ते 6 जागांचा तिढा आहे. पण त्यात फारशी अडचण नाही. मनसे बद्धल चर्चा असली तरी तो पक्ष काँग्रेस आघाडीचा घटक असणार नाही असेही त्यांनी सांगून टाकले. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील, सुरेश कुराडे आदी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "नोटाबंदी, राफेल करारावरून सुरू असलेली टीका, आरबीआय आणि सीबीआयमधील वाद आणि कोलंडलेली अर्थव्यवस्था यामुळे देशात सगळीकडे अस्वस्थता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चुकीची धोरणे त्यास कारणीभूत आहेत त्यामुळे देशपातळीवरील चेहरा बदलल्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पर्याय नसेल."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस