शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

'लक्ष्मी'पाठोपाठ कौटुंबिक कलहाची 'अवदसा'; नागपूर-रत्नागिरीचे २२४ कोटी न्यायालयात पडून 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 26, 2025 16:47 IST

सुनावणीद्वारे ३१ कोटींचे वाटप

इंदुमती गणेशकोल्हापूर : लक्ष्मीपाठोपाठ अवदसा येते ही म्हण नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठीच्या भूसंपादनातून पुन्हा अनुभवायला येत आहे. नुकसानभरपाईची घसघशीत रक्कम मलाच मिळाली पाहिजे या भावनेतून दोन भाऊ, भाऊ-बहीण, मामा-भाचे अशा भाऊबंदकीच्या वादामुळे मागील अडीच वर्षात २५५ कोटी ७० लाख ७५ हजार ५३४ रुपये न्यायालयात जमा झाले आहेत. त्यापैकी फक्त ३३ कोटी १३ लाख ३० हजार १३४ इतक्या रकमेचे सुनावणीद्वारे वाटप झाले आहे. अजूनही २२४ कोटी रुपये वाटपाविना पडून आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर हक्काच्या रकमेसाठी पिढ्यान्पिढ्या न्यायालयाच्या पायऱ्या झिजवल्या लागतील असे चित्र आहे.

जमीन, शेत, घर, रोख रकमा अशा कोणत्याही प्रकारची संपत्ती जास्त असली की त्यातून होणाऱ्या वादांनी नातेसंबंध दुरावतात. नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठीच्या भूसंपादनातील नुकसानभरपाईच्या डोळे मोठे करायला लावणाऱ्या आकड्यांनी नात्यांमधील हा फोलपणा पुन्हा अधोरेखित केला आहे. इतकी वर्षे गुण्यागोविंदाने राहत असलेले आई-वडील, भाऊ-बहिणी, मामा-भाचे. भाऊबंद एकमेकांचे वैरी झाले.सातबारा एकत्र असेल तर इतर खातेदार सहमती देत नाहीत. नुकसानीची सगळी रक्कम मलाच मिळाली पाहिजे, या हव्यासातून नात्यांचा गुंता इतका वाढला की प्रशासनालाही कुणाच्या खात्यावर रक्कम वर्ग करावी याचे कोडे पडले, शेवटी त्यांनी सन २०२३ पासून वादातील तब्बल २५५ कोटी रुपये न्यायालयात जमा केले. त्यापैकी न्यायालयाने सुनावणीद्वारे ३१ कोटींचे वाटप केले आहे.

तालुका : गावांची संख्या : खातेदार संख्या : न्यायालयात जमा रक्कम : न्यायालयाने वाटलेली रक्कमकरवीर : ८ : २७ : ८५ कोटी ३७ लाख ८३ हजार ६९० : १२ कोटी ४४ लाख ८१ हजार ४५६हातकणंगले : ६ : ३३ : २३ कोटी ५९ लाख ४० हजार ३८५ : १ कोटी ३९ लाख ४७ हजार २७२शाहूवाडी : २८ : ९१ : १०० कोटी, ६४ लाख ९८ हजार ५६६ : १६ कोटी, ४१ लाख १९ हजार ३२०पन्हाळा : ७ : १६ : ४६ कोटी ८ लाख ५२ हजार ८९३ : ८७ लाख ८२ हजार ८३

व्याजासहीत रक्कम परतन्यायालयाने ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये डिपॉझिट केली आहे. पक्षकारांना नोटीस काढून सुनावणी घेतली जाते. निकाल लागताच खातेदाराला मूळ रक्कम व्याजासहीत दिली जाते. मात्र अनेकजण सुनावणीलाच हजर राहत नसल्याने न्यायालयीन निकालावरदेखील मर्यादा येतात.

ज्यांनी अजून नुकसानभरपाई घेतलेली नाही त्या खातेदारांनी तात्काळ दावा करून आपली रक्कम घ्यावी. अन्यथा ती न्यायालयात जमा करावी लागेल. आपल्यातील वाद सामंजस्याने मिटवले तर पुढे न्यायालयीन प्रक्रिया टाळता येते. - अर्चना नष्टे, भूसंपादन अधिकारी