शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

आवाराबाहेरील शेतीमाल विक्रीस पायबंद - :‘नियमन रद्द’चा वटहुकूमच निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:30 AM

बाजार समित्यांच्या आवाराबाहेर शेतीमाल विक्री करण्यास शेतकऱ्यांना मुभा देणारा वटहुकुमास राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने तो निकाली निघाला आहे. सरकारने आॅक्टोबर २०१८ मध्ये समित्यांच्या आवाराबाहेरील

ठळक मुद्देबाजार समित्यांचा पुन्हा अंकुश राहणारसरकारच्या निर्णयाने समित्यांच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने वटहुकुमाविरोधात बाजार समिती संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : बाजार समित्यांच्या आवाराबाहेर शेतीमाल विक्री करण्यास शेतकऱ्यांना मुभा देणारा वटहुकुमास राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने तो निकाली निघाला आहे. सरकारने आॅक्टोबर २०१८ मध्ये समित्यांच्या आवाराबाहेरील शेतीमालाचे नियमन रद्दचा निर्णय घेतला होता; पण आता पुन्हा बाजार समित्यांचा अंकुश राहणार आहे.

बाजार समिती कार्यक्षेत्रात शेतीमालाची खरेदी-विक्री केली तर मार्केट फी द्यावी लागते. त्याचबरोबर समितीच्या परवानगीशिवाय शेतकऱ्यांना बाहेर विक्री करता येत नाही. त्यामुळे शेतीमाल खरेदी-विक्रीवर समित्यांचे अंकुश राहतो; पण राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर समित्यांचे नियंत्रणच कमी करण्याचा निर्णय घेतला. समिती आवाराबाहेर शेतीमाल खरेदी-विक्री करण्याची मुभा सरकारने दिली होती. याबाबतचा २५ आॅक्टोबर २०१८ रोजी वटहुकूम काढला होता. या निर्णयाने समित्यांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला होता.

व्यापारी शेतकºयांकडून कोठेही माल खरेदी करू लागल्याने मार्केट फी वसूल करता येत नाही, त्यामुळे अनेक समित्यांचे उत्पन्न निम्यावर आले होते. याविरोधात नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यातील बाजार समित्यांच्या पदाधिकाºयांची पुणे येथे बैठक झाली होती. सरकारच्या निर्णयाने समित्यांच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने वटहुकुमाविरोधात बाजारसमिती संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सहा महिन्यांच्या आत दोन्ही सभागृहांत मान्यता घेतल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते. वटहुकुमाला २५ एप्रिलला सहा महिने पूर्ण झाले,वास्तविक सरकारने त्याला मुदतवाढ देण्याची गरज होती; पण तसे न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने न्यायालयाने वटहुकूम कालबाह्य झाल्याने नियमनमुक्ती कायदेशीरदृष्ट्या अमलात असणार नाही, असा आदेश न्यायालयात दिल्याचे समजते.निवडणुकांसाठी समित्यांवर कर्जाची वेळनियमनमुक्ती आणि एकूणच उत्पन्नात मोठी घट झाल्याने राज्यातील ३०० पैकी २०-२५ समित्या सोडल्या तर इतर आतबट्ट्यात आल्या आहेत. कर्मचाºयांचे पगार भागवताना दमछाक उडत असून काहींचा निवडणूक कार्यक्रम लागला आहे. त्यात कार्यक्षेत्रात २० गुंठे जमीनधारकांना मतांचा अधिकार सरकारने दिल्याने हजारोंच्या पटीत मतदार आहेत. यासाठी मोठा बोजा पडला असून निवडणुकांसाठी कर्ज काढण्याची वेळ समित्यांवर आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार