शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

‘मल्टिस्टेट’ची भूमिका पालकमंत्र्यांनी कडेपर्यंत न्यावी :हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 2:42 PM

‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटबाबत सध्या आपणाला काही बोलायचे नाही; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भूमिका त्यांनी कडेपर्यंत न्यावी, असा उपरोधिक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला. स्वबळाची तयारी म्हणूनच भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अनेकांना जवळ केले, आता ते मागे हटण्याची शक्यता नसल्याने युती होवो अथवा न होवो विधानसभेला तिरंगीच लढत होईल, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘मल्टिस्टेट’ची भूमिका पालकमंत्र्यांनी कडेपर्यंत न्यावी :हसन मुश्रीफ युती होवो अथवा न होवो विधानसभेला तिरंगीच लढत

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटबाबत सध्या आपणाला काही बोलायचे नाही; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भूमिका त्यांनी कडेपर्यंत न्यावी, असा उपरोधिक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला. स्वबळाची तयारी म्हणूनच भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अनेकांना जवळ केले, आता ते मागे हटण्याची शक्यता नसल्याने युती होवो अथवा न होवो विधानसभेला तिरंगीच लढत होईल, असेही त्यांनी सांगितले.जिल्हा बॅँकेच्या ताळेबंदाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर अनौपचारिक गप्पा मारताना मुश्रीफ यांनी सावध भूमिका व्यक्त केली. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी आघाडीच्या दोन्ही जागा निवडून येणार हे निश्चित आहे.

गेल्यावेळेलाही शिवसेनेच्या उमेदवाराला कागलमध्ये मताधिक्य मिळालेच होते, असे सांगत हसन मुश्रीफ म्हणाले, लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे दुपारी तीननंतर मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. कोल्हापुरात तर तीन नंतर २५ टक्के मतदान झाले, हे कशाचे द्योतक आहे? एक सुप्त लाट जाणवत होती, ती नेमकी सरकारच्या कारभाराच्या विरोधात होती का? हे २३ मे रोजी समजेल.लोकसभेचा निकाल लागायच्या अगोदरच युतीमध्ये फटकेबाजी सुरू असल्याबाबत विचारले असता, मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची म्हणून भाजपने प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांना घेतले, त्यांना पदे देऊन ताकद दिल्याने ते गुडघ्याला बाशिंग बांधूनच उभे आहेत; त्यामुळे युती झाली अथवा नाही झाली, तरी तिरंगी लढत होणारच आहे.अरूंधती महाडिक यांचे कौतुकलोकसभा निवडणुकीत ‘भागीरथी’ संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक या कमालीच्या राबल्या. एक खासदाराची पत्नी आपल्या पतीसाठी किती परिश्रम घेते, हे चांगले उदाहरण असून, त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

‘त्यांना’ विधानसभेला विचारतीलसाखर उद्योगाबाबत आपणच फार चिंता करता, शिवसेना-भाजपचे कारखानदार बोलत नाहीत, यावर मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आणि साखर कारखानदारीतील कार्यकर्ता म्हणून ही भूमिका मांडत असतो. शिवसेना-भाजपच्या कारखानदारांचा प्रश्न आहे; पण एफआरपी न दिल्यास त्यांना विधानसभेला शेतकरी निश्चितच विचारतील. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkokrajhar-pcकोकराझार