शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या लिस्टमध्ये ऋतुराज, मधुरिमा व दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:41 IST

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे किंवा थेट माजी आमदार मालोजीराजे व दौलत देसाई या नावांवर पक्षाच्या केंद्रीय समितीत गांभीर्याने विचार सुरू आहे. मधुरिमा किंवा मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याबद्दल स्वत: शाहू छत्रपती यांची तयारी नसल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. ऋतुराज पाटील हा एक पक्षापुढे सक्षम पर्याय आहे; परंतु एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवार देण्याबाबत हरकती घेतल्या जात आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या लिस्टमध्ये ऋतुराज, मधुरिमा व दौलत देसाईकोल्हापूर उत्तरचे राजकारण : छत्रपती घराण्याशी पुन्हा संपर्क साधणार

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे किंवा थेट माजी आमदार मालोजीराजे व दौलत देसाई या नावांवर पक्षाच्या केंद्रीय समितीत गांभीर्याने विचार सुरू आहे. मधुरिमा किंवा मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याबद्दल स्वत: शाहू छत्रपती यांची तयारी नसल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. ऋतुराज पाटील हा एक पक्षापुढे सक्षम पर्याय आहे; परंतु एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवार देण्याबाबत हरकती घेतल्या जात आहेत.चांगला उमेदवार दिल्यास या मतदारसंघातून काँग्रेसला चांगली संधी आहे; परंतु उमेदवार ठरवितानाच पक्षाची दमछाक होऊ लागली आहे. एका बाजूला लढण्यासाठी सोडाच, पक्षाची उमेदवारी घेण्यासाठीही कोण उमेदवार मिळेनात, अशी स्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन जागांसाठी पाच लोकांचे अर्ज आले आहेत.

पुणे ग्रामीणपासून ते सोलापूर, सातारा जिल्ह्यांतही पक्षाकडे अर्ज न्यायलाही कोण फिरकलेले नाहीत. असे असतानाही एकाच घरात दोन उमेदवार कशाला, असा मुद्दा पक्षांतर्गत राजकीय कुरघोडीतून पुढे आणला जात आहे. हा मुद्दा कोल्हापुरात जसा पुढे आला आहे, तसाच तो लातूरमध्येही आणला जात आहे. ऋतुराज पाटील यांनी लढायची तयारी केली आहे.

गेल्या दोन वर्षांतील त्यांचा प्रत्येक सार्वजनिक कार्यातील वावर व परवाच्या महापुरातील सहभाग पाहता, ते रिंगणात उतरतील, असा अनेकांचा होरा आहे. त्यांच्याशिवाय मधुरिमा राजे यांचेही नाव कायमच सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत आहे; परंतु शाहू महाराज यांच्याकडून त्यास अजून संमती मिळालेली नाही; यासाठी दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या अनुषंगाने शाहू महाराज यांच्याशीच थेट बोलून विनंती करावी, अशा हालचाली सुरू आहेत. कदाचित आज, शनिवारी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेही त्यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे.गेले १५ वर्षे विविध सामाजिक कामांत सक्रीय असलेले दौलत देसाई यांनीही या वेळेला पक्षाकडे उमेदवारी मागितली असून, निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यांचे काका माजी आमदार दिवंगत दिलीप देसाई हे याच मतदारसंघातून शिवसेनेकडून १९९० ला निवडून आले होते; त्यामुळे त्यांना हा मतदारसंघ नवीन नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोखले कॉलेजच्या माध्यमातून घरोघरी आपला संपर्क असल्याचा त्यांचा दावा आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर चांगली लढत देऊ, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.काही झाले तरी लढणारच : सत्यजित कदमगेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून मोदी लाटेतही दोन नंबरची मते घेतलेले सत्यजित कदम यांनीही काही झाले तरी निवडणूक लढविणारच अशी घोषणा केली आहे. महापालिकेतील ते ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी कदमवाडी, भोसलेवाडी, रुईकर कॉलनी, आदी भागांतून ८ नगरसेवक निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

महापालिकेत ते ताराराणी आघाडीचे नेते आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक हे जरी भाजपमध्ये गेले, तरी या आघाडीचे अस्तित्व कायम ठेवण्यात येणार आहे; त्यामुळे या आघाडीकडूनही ते रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप स्वतंत्र लढली, तर ते या मतदारसंघातून भाजपकडूनही प्रयत्न करू शकतात. सत्यजित कदम यांचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी हाडवैर आहे. त्याचबरोबर आमदार सतेज पाटील गटाशीही त्यांचा राजकीय संघर्ष आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची ताकद त्यांच्यामागे असेल. 

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर