शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

काँग्रेसच्या लिस्टमध्ये ऋतुराज, मधुरिमा व दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:41 IST

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे किंवा थेट माजी आमदार मालोजीराजे व दौलत देसाई या नावांवर पक्षाच्या केंद्रीय समितीत गांभीर्याने विचार सुरू आहे. मधुरिमा किंवा मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याबद्दल स्वत: शाहू छत्रपती यांची तयारी नसल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. ऋतुराज पाटील हा एक पक्षापुढे सक्षम पर्याय आहे; परंतु एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवार देण्याबाबत हरकती घेतल्या जात आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या लिस्टमध्ये ऋतुराज, मधुरिमा व दौलत देसाईकोल्हापूर उत्तरचे राजकारण : छत्रपती घराण्याशी पुन्हा संपर्क साधणार

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे किंवा थेट माजी आमदार मालोजीराजे व दौलत देसाई या नावांवर पक्षाच्या केंद्रीय समितीत गांभीर्याने विचार सुरू आहे. मधुरिमा किंवा मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याबद्दल स्वत: शाहू छत्रपती यांची तयारी नसल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. ऋतुराज पाटील हा एक पक्षापुढे सक्षम पर्याय आहे; परंतु एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवार देण्याबाबत हरकती घेतल्या जात आहेत.चांगला उमेदवार दिल्यास या मतदारसंघातून काँग्रेसला चांगली संधी आहे; परंतु उमेदवार ठरवितानाच पक्षाची दमछाक होऊ लागली आहे. एका बाजूला लढण्यासाठी सोडाच, पक्षाची उमेदवारी घेण्यासाठीही कोण उमेदवार मिळेनात, अशी स्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन जागांसाठी पाच लोकांचे अर्ज आले आहेत.

पुणे ग्रामीणपासून ते सोलापूर, सातारा जिल्ह्यांतही पक्षाकडे अर्ज न्यायलाही कोण फिरकलेले नाहीत. असे असतानाही एकाच घरात दोन उमेदवार कशाला, असा मुद्दा पक्षांतर्गत राजकीय कुरघोडीतून पुढे आणला जात आहे. हा मुद्दा कोल्हापुरात जसा पुढे आला आहे, तसाच तो लातूरमध्येही आणला जात आहे. ऋतुराज पाटील यांनी लढायची तयारी केली आहे.

गेल्या दोन वर्षांतील त्यांचा प्रत्येक सार्वजनिक कार्यातील वावर व परवाच्या महापुरातील सहभाग पाहता, ते रिंगणात उतरतील, असा अनेकांचा होरा आहे. त्यांच्याशिवाय मधुरिमा राजे यांचेही नाव कायमच सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत आहे; परंतु शाहू महाराज यांच्याकडून त्यास अजून संमती मिळालेली नाही; यासाठी दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या अनुषंगाने शाहू महाराज यांच्याशीच थेट बोलून विनंती करावी, अशा हालचाली सुरू आहेत. कदाचित आज, शनिवारी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेही त्यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे.गेले १५ वर्षे विविध सामाजिक कामांत सक्रीय असलेले दौलत देसाई यांनीही या वेळेला पक्षाकडे उमेदवारी मागितली असून, निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यांचे काका माजी आमदार दिवंगत दिलीप देसाई हे याच मतदारसंघातून शिवसेनेकडून १९९० ला निवडून आले होते; त्यामुळे त्यांना हा मतदारसंघ नवीन नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोखले कॉलेजच्या माध्यमातून घरोघरी आपला संपर्क असल्याचा त्यांचा दावा आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर चांगली लढत देऊ, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.काही झाले तरी लढणारच : सत्यजित कदमगेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून मोदी लाटेतही दोन नंबरची मते घेतलेले सत्यजित कदम यांनीही काही झाले तरी निवडणूक लढविणारच अशी घोषणा केली आहे. महापालिकेतील ते ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी कदमवाडी, भोसलेवाडी, रुईकर कॉलनी, आदी भागांतून ८ नगरसेवक निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

महापालिकेत ते ताराराणी आघाडीचे नेते आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक हे जरी भाजपमध्ये गेले, तरी या आघाडीचे अस्तित्व कायम ठेवण्यात येणार आहे; त्यामुळे या आघाडीकडूनही ते रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप स्वतंत्र लढली, तर ते या मतदारसंघातून भाजपकडूनही प्रयत्न करू शकतात. सत्यजित कदम यांचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी हाडवैर आहे. त्याचबरोबर आमदार सतेज पाटील गटाशीही त्यांचा राजकीय संघर्ष आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची ताकद त्यांच्यामागे असेल. 

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर