शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

Kolhapur riots: हुल्लडबाज अडकले पोलिस कारवाईत, बंदची हाक देणारे नामानिराळे; दंगलखोरांचे पाठीराखे कोण?

By उद्धव गोडसे | Updated: June 12, 2023 15:37 IST

अनेकांना घडणार आयुष्यभराची अद्दल

उद्धव गोडसेकोल्हापूर : हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या बंददरम्यान जमावाने दगडफेक करून दंगल माजविल्यानंतर पोलिसांनी सुमारे ४०० संशयितांवर गुन्हे दाखल केले. ३६ जणांना अटकही झाली. विशेष म्हणजे बंदची हाक देणारे आणि दंगल घडविणाऱ्या एकाचाही यात समावेश नाही. त्यामुळे खरे सूत्रधार नामानिराळेच राहिले असून, दंगलीचे परिणाम काही हुल्लडबाज तरुण आणि त्यांचे कुटुंबीय भोगत आहेत.सोशल मीडियातील चिथावणीखोर आवाहनाला बळी पडून कोल्हापुरातील हजारो तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजेरी लावली. तिथे कोणताही मागचा-पुढचा विचार न करता तरुणांनी हातात दगड घेतले. आक्रमक बनलेल्या तरुणाईला आवर घालण्यासाठी एकही नेता चौकात थांबला नाही. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील चर्चेच्या निमित्ताने अनेक नेते गायब झाले. काहींनी तापलेले वातावरण पाहून काढता पाय घेतला. तत्पूर्वी जमावाला आक्रमक बनविण्याची संधी एकानेही सोडली नाही. परिणामी, नको तेच घडले आणि शहरात ठिकठिकाणी दगडफेक होऊन सामाजिक सलोख्यालाही भगदाड पडले.

दंगलीतील सुमारे ४०० संशयितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तातडीने ३६ जणांना अटक केली. मात्र, यात बंदची हाक देणारे नेते, संघटनांचे पदाधिकारी आणि त्यांना फूस लावणाऱ्या सूत्रधारांचा समावेश नाही. दंगलीला कारणीभूत ठरलेल्या अनेकांना पोलिस ओळखतात. पोलिसांच्या डोळ्यांसमोरच सारे काही घडले. तरीही त्या संशयितांची नावे एफआयआरमध्ये नाहीत हे विशेष. एफआयआरमध्ये नाव नसल्याने त्यांना अटक करण्याचा प्रश्नच नाही. त्याउलट ज्यांनी चिथावणीला बळी पडून दगड भिरकावले, ते मात्र पोलिसांच्या नजरेत आले. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून पोलिस दंगलखोरांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दंगलखोरांचे पाठीराखे कोण?

दंगलीनंतर तातडीने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापुरात येऊन पोलिस आणि काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याच बैठकीत त्यांनी दंगलीच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. पोलिसांनीही स्वत:हून बंदचे आवाहन करणाऱ्यांची नावे फिर्यादीत घेतली नाहीत. त्यामुळे दंगल घडवणाऱ्यांचे पाठीराखे कोण? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

पोलिसांकडून टाळाटाळ

गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना एफआयआरची प्रत मिळू नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली. बंदचे आवाहन करणाऱ्यांबद्दल वारंवार विचारणा करूनही पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाचे कारण देऊन टाळाटाळ केली.बहुजनांची मुले अडकलीपोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या संशयितांमध्ये सर्वच मुले बहुजनांची आहेत. गुन्हे दाखल झालेल्या १८ ते २५ वयोगटातील तरुणांचे करिअर धोक्यात आले, त्यामुळे आता पालकांची झोप उडाली आहे. आपल्या मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी पालक वकिलांना घेऊन पोलिस ठाण्यात चकरा मारत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस