शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोल्हापुरात संधिवात रुग्णांचा टक्का वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 21:38 IST

संधिवाताच्या रुग्णांचा टक्का कोल्हापूरमध्ये वाढत आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का नागरिकांना संधिवाताने हैराण केले आहे.

ठळक मुद्देआमवात हा आजार महिलांमध्ये, तर पुरुषांमध्ये गाउट अथवा पाठीचा संधिवात आजार आढळतो.या आजाराचा त्रास कमी करण्यासाठी योग्य आहार-विहार असणे आवश्यक आहे.

कोल्हापूर : संधिवाताच्या रुग्णांचा टक्का कोल्हापूरमध्ये वाढत आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का नागरिकांना संधिवाताने हैराण केले आहे. या आजाराचा त्रास कमी करण्यासाठी योग्य आहार-विहार असणे आवश्यक आहे.

‘संधिवात निवारण दिना’निमित या आजाराची लक्षणे, प्रमाण आणि घ्यावयाची दक्षता, आदींचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. वाढते प्रदूषण, बदलती जीवनशैली, जंक फूडचे सेवन, कामाच्या ठिकाणी बसण्याची चुकीची पद्धत आणि व्यायामाचा अभाव, आदींमुळे संधिवाताचे प्रमाण वाढत आहे. आनुवांशिकता हेही एक कारण आहे. संधिवाताच्या आजारांमध्ये सूजेचा संधिवात, आमवात, पाठीचा आमवात, चिकनगुणियामुळे होणारा, लुपुस, गाउट, सोरायसिसमुळे होणारी सांधेदुखी, लहान मुलांमधील, रक्तवाहिन्यांची सूज, त्वचा कडक होणे, झिजेचा संधिवात यांचा समावेश आहे. हे आजार कोणालाही होऊ शकतात.

आमवात हा आजार महिलांमध्ये, तर पुरुषांमध्ये गाउट अथवा पाठीचा संधिवात आजार आढळतो. वय वर्षे ३० ते ५० मधील व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. महिलांमध्ये प्रमाण अधिक असून त्याची तीव्रता जादा आहे. संधिवात टाळण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे योग्य आहार-विहार असावा. कामाच्या ठिकाणी बसताना शरीराची ठेवण योग्य असावी. वजन नियंत्रणात हवे. नियमितपणे व्यायाम असावा.

लवकर निदान, उपचार आवश्यक

संधिवात हा आजार नसून ताप, सर्दी आणि खोकल्यासारखे एक लक्षण आहे. संधिवातामध्ये १०० हून अधिक आजारांचा समावेश असल्याचे संधिवाततज्ज्ञ डॉ. कुणाल पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये संधिवाताचे सुमारे नऊ लाख रुग्ण आहेत. कोल्हापूरमध्ये  रुग्णांचा टक्का वाढत आहे. येथील एकूण लोकसंख्येच्या एक टक्का नागरिक संधिवाताच्या आजाराने त्रस्त आहेत. या आजाराकडे  दुर्लक्ष केल्यास अपंगत्व येऊ शकते. ते टाळण्यासाठी या आजाराची लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांकडून लवकरात लवकर निदान करून घेण्यासह उपचार घेणे आवश्यक आहे.

 

लक्षणे अशी

सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ सांधे दुखणे आणि त्यांना सूज येणे. सकाळी उठल्यावर किंवा विश्रांतीनंतर सांधे कडक होणे. सांध्यांमधून करकर असा आवाज येणे. सांधेदुखीसोबत ताप आणि थकवा येणे, कमी वयामध्ये कंबर दुखणे अथवा ताठरणे, त्वचा चामड्यासारखी कडक होणे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर