शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध लागले, भाज्यांचे दर चढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST

कोल्हापूर : लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लागण्याची घोषणा राज्य सरकारकडून झाल्यानंतर लगेचच कोल्हापूरकरांनी बाजारात धाव घेतली. तशी सकाळपासूनच गर्दी होती, ...

कोल्हापूर : लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लागण्याची घोषणा राज्य सरकारकडून झाल्यानंतर लगेचच कोल्हापूरकरांनी बाजारात धाव घेतली. तशी सकाळपासूनच गर्दी होती, पण अधिकृत घोषणा झाल्यावर रस्ते गर्दीने फुलून गेले. भाजीपाल्याच्या खरेदीसाठी अक्षरश: उड्या पडल्या. याचा लाभ उठवत विक्रेत्यांनी लगेच दरात वाढ केल्याने संकटातही लोकांना लुटण्याच्या प्रवृत्तीचे प्रत्यंतर आले.

खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला. भाजीमंडई बंद राहणार असल्याने संध्याकाळी लोकांनी लक्ष्मीपुरीसह शहरातील बाजारपेठाकडे धाव घेतली. संध्याकाळी बाजार आटोपत आला की दरात घसरण होते; पण लक्ष्मीपुरी बाजारपेठेत नेमके उलटे चित्र रविवारी दिसले. निर्बंध लागल्याचा लाभ उठवत लगेचच दरात वाढ सुरू झाली. लोकांनीही नाइलाजास्तव खरेदी केली. सकाळी १५ ते २० रुपये किलो असणारा बटाटा संध्याकाळी एकदम २५ ते ३० रुपयांवर गेला. गवारी, वांगी, भेंडी यांच्या दरातही लगेच किलोमागे लगेचच ५ ते १० रुपयांची वाढ झाली. कोंथिबीर, मेथीच्या जुड्या २० रुपयांवर गेल्या.

भाजीपाल्यासह धान्य व किराणा मालाच्या दुकानासमोर गर्दी उसळल्याने सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला. तोंडावर मास्क असला तरी प्रचंड गर्दी आणि रेटारेटीमुळे कोरोनाला मिठी मारण्यासारखीच परिस्थिती होती.