शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील सुरक्षा रामभरोसे, ‘फायर ऑडिट’मधून समोर आली गंभीर बाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:28 IST

गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार?

कोल्हापूर : येथील अंबाबाई मंदिराचे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले फायर ऑडिट सोमवारी पूर्ण करण्यात आले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांनी केलेल्या पाहणीत एखाद्यावेळी मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याच्यापासून बचावाची कोणतीही यंत्रणा मंदिर प्रशासनाने सज्ज ठेवलेली नसल्याची गंभीर बाब या ऑडिटमधून समोर आली.अग्निशमन विभाग व देवस्थानचे कर्मचारी यांनी सोमवारी एकत्रितपणे फायर ऑडिटच्या अनुषंगाने अंबाबाई मंदिर परिसराची पाहणी केली. त्यावेळी बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. एखादी मोठी घटना घडली तर त्यापासून बचाव करणारी कोणतीही यंत्रणा त्याठिकाणी उपलब्ध नाही. अग्निशमन दलाची वाहने मंदिर परिसरात येईपर्यंत प्रारंभिक बचावाची साधनेही तेथे नसल्याचे आढळून आले. मंदिर परिसरात अग्निशमन दलाकडे असलेली वाहने, रुग्णवाहिका आत जाऊ शकत नाही, अनेक अडथळे आतमध्ये असल्याचे दिसून आले.

वायरिंग अतिशय जुनाट, गुंतागुंतीचेमंदिर परिसरात फायर इन्स्टिग्युशन, पाण्याची टाकी, मंदिर परिसरातील तटबंदीवर प्रत्येक पंधरा मीटर अंतरावर होजरिल सिस्टीम, प्रेशर पंप बसवावी लागणार आहेत. इलेक्ट्रीक वायरिंग अतिशय जुनाट व गुंतागुंतीचे असल्याचे त्याचेही एकदा ऑडिट करून घ्यावे लागणार आहे. प्रत्यक्ष पाहणीवेळी या गोष्टींची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले.

गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार?नवरात्रोत्सवात मंदिर आवारात मोठी गर्दी असते, विशेषत: मुखदर्शन व पालखीवेळी चेंगराचेंगरीचे प्रकार घडत असतात. त्यावर कसे नियंत्रण मिळवायचे या अनुषंगानेही सोमवारी पाहणी झाली. पालखी मिरवणूक तसेच मुखदर्शनाच्या गर्दीवर उपाययोजना करण्याची गरज पाहणीतून पुढे आली. ज्या पद्धतीने गाभाऱ्यापर्यंत जाणाऱ्या भाविकांची रांगेची व्यवस्था करण्यात येते तशाच पद्धतीने मंदिर परिसराच्या बाहेरूनच स्वतंत्र रांग मुखदर्शनासाठी करावी लागणार आहे, ज्यामुळे भाविक मंदिर आवारात विनाकारण रेंगाळणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर