शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

Kolhapur: काळम्मावाडीची गळती तातडीने काढा, सतेज पाटील यांची अधिवेशनात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:09 IST

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाला मागील दोन वर्षे गळती सुरू असून, सध्या प्रतिसेकंद २७७ लिटर इतके पाणी वाया जात आहे. ...

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाला मागील दोन वर्षे गळती सुरू असून, सध्या प्रतिसेकंद २७७ लिटर इतके पाणी वाया जात आहे. गळती थांबवण्यासाठी यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ऐन उन्हाळ्यात याचा संपूर्ण जिल्ह्यावर ताण पडू शकतो, त्यामुळे सरकारने ही गळती थांबवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपण मांडलेला विषय गंभीर आहे, गळती असेल तर ती तपासावी लागेल, जलसंपदा विभागाला याबाबत निर्देश देऊ, अशी ग्वाही दिली.जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील धरणाला माेठ्या प्रमाणात गळती लागली आहे. जिल्ह्यातील राधानगरी, कागल, करवीर, हातकणंगले, शिरोळ, भुदरगडमधील १२१ गावांमधील ४६ हजार हेक्टर क्षेत्राला याच धरणातून पाणीपुरवठा होतो. शिवाय कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून पिण्यासाठी पाणी दिले जाते. या धरणाची २५.३९ टीमएसी इतकी क्षमता आहे.मात्र, गेल्या काही वर्षांपासून या धरणाच्या भिंतीला गळती लागल्याने रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी राज्य सरकारने ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया झाली नसल्याने पुढील काम थांबले आहे. ही गळती वाढल्याने आमदार पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. नुकतेच बिद्री कारखाना व गोकुळचे संचालक आर. के. मोरे यांनी दुधगंगा काठावरील सरपंचांना घेऊन पाटबंधारे विभागास गळती काढण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन