शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कोल्हापुरात हुल्लडबाज तृतीयपंथीयांकडून श्रद्धेला बीभत्स रूप; सलग तीन वर्षे यात्रेला गालबोट, भाविक वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:07 IST

तृतीयपंथीयांचा गैरवापर

कोल्हापूर : रेणुकादेवीच्या यात्रेत मानापमानावरून काही तृतीयपंथीयांमध्ये होणारी हाणामारी, ओढ्यावरील मंदिराचा ताबा घेण्यावरून दोन गटात झालेली धुमश्चक्री आणि यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याने नागरिकांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होत आहे. काही मोजक्या तृतीयपंथीयांच्या हुल्लडबाजीमुळे श्रद्धेला बीभत्स रूप येत असल्याची नाराजी भाविकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री ओढ्यावरील मंदिरात झालेल्या मारामारी प्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.रेणुकादेवीच्या यात्रेत शहरातून मानाच्या जगांची मिरवणूक निघते. यात शहरासह आसपासच्या जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसह भाविक सहभागी होतात. यातील काही गटांमध्ये संघर्ष वाढल्याने मिरवणुकीत मानापमानाचे नाट्य रंगते. जग उचलण्यावरून आणि मिरवणुकीत पुढे जाण्याच्या कारणातून वाद होतात. सोमवारी दुपारी असाच प्रकार घडल्याने मिरवणुकीत तृतीयपंथीयांमध्ये हाणामारी झाली. वादांमुळे मिरवणूक रेंगाळली.रात्री उशिरा ओढ्यावरील यल्लम्मा मंदिराचा ताबा घेण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारीमुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. बीभत्स आणि हिडीस प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली. हुल्लडबाजीमुळे सलग तिसऱ्या वर्षी मिरवणुकीला गालबोट लागल्याचे नागरिकांनी सांगितले.तृतीयपंथीयांचा गैरवापरशहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी तृतीयपंथी भिक्षेच्या रूपाने नागरिकांकडून पैसे गोळा करतात. हीच बाब लक्षात घेऊन काही तरुण तृतीयपंथीयांच्या गटांचे म्होरके बनत आहेत. त्यांना भिक्षा मागण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यांच्याकडून काही गैरप्रकार करवून घेतले जातात. यातून त्यांच्यातील काही गटांमध्ये संघर्ष वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.