शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

ऊस उत्पादकांना दिलासा : FRPमध्ये १०० रुपयांनी वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 4:01 AM

उत्पादकांना दिलासा मिळाला असला, तरी साखर विक्रीच्या किमान दरात वाढ करण्याचा निर्णय कधी होतो याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर : ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन १०० रुपयांनी वाढवून ती २८५० करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला असला, तरी साखर विक्रीच्या किमान दरात वाढ करण्याचा निर्णय कधी होतो याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागले आहे. कारण त्याशिवाय ही एफआरपी देणे कारखान्यांना शक्य होणार नाही.गेली दोन वर्षे उसाची एफआरपी २७५० रुपये प्रतिटन कायम होती. यावर्षी त्यात प्रतिटन १०० रुपये वाढ करण्याला आणि त्यापुढील प्रत्येक टक्क्याला २८५ रुपये देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात मागील हंगामात उसाचे अपेक्षित उत्पादन झाले नव्हते. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.५० टक्के आहे. त्यामुळे प्रतिटन ३२७७.५० रुपये एफआरपी निघते. त्यातून ऊस तोडणी-ओढणी प्रतिटन ६२५ रुपये वजा जाता उर्वरित २६५२ रुपये ५० पैसे ऊस उत्पादकांच्या हातात मिळतील.>दृष्टिक्षेपात राज्याचा आगामी हंगामउसाचे उत्पादन साखर उत्पादन एफआरपी (तोडणी-ओढणीसह)९०० लाख टन १०५ लाख टन ३२७७.५० रुपये प्रतिटनकेंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय जरी झाला तरी निर्यात दरात वाढ करण्याची मागणी होत आहे.>उत्पादन खर्च वाढत असल्याने वाढीव एफआरपीचे स्वागत करतो. मात्र, त्याबरोबर साखरेचा किमान दर वाढविणे अपेक्षित होते. जर सुपातच नसेल, तर जात्यात कोठून येणार?- पी. जी. मेढे, साखर उद्योगातील तज्ज्ञ