शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून ५० टक्क्यांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:32 AM

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी व आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून सरासरी ५० टक्क्यांवरच आहे. १५ वर्षांहून अधिककाळ ...

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी व आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजून सरासरी ५० टक्क्यांवरच आहे. १५ वर्षांहून अधिककाळ लोटला असला, तरी १00 टक्केपुनर्वसन झालेले नाही. जमीन व भूखंडांसाठी पसंतीचे अर्ज देऊन १0-१0 वर्षे झाली, तरी शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे प्रकल्पग्रस्तांचे हात रितेच राहिले आहेत.राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाला २००१ मध्ये मंजुरी मिळून, त्याच्या कामाला सुरुवात झाली. अद्याप धरणाचे काम ७० टक्केच झाले असून, पुनर्वसन ६० टक्केझाले आहे. राई, पडसाळी, कंदलगाव ही गावे बाधित होऊन, येथील २४९ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन राधानगरी तालुक्यातच राई व कंदलगाव प्रकल्पग्रस्त वसाहतींमध्ये झाले आहे. या वसाहती नुसत्या नावालाच आहेत. येथे वीज, पाणी, रस्ते अशा भौतिक व नागरी सुविधांची वानवा आहे. अजून ४० टक्केप्रकल्पग्रस्तांचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. यातील अनेक जणांना जमीनच मिळालेली नाही. ज्यांनी जमीन मागणीसाठी पसंतीचे फॉर्म भरून दिले आहेत. त्यांना आठ-१0 वर्षे उलटली, तरी वाटच बघावी लागत आहे. आठ वर्षांपासून या प्रकल्पाशी संबंधित एकही आदेश निघालेला नाही. शासकीय यंत्रणेच्या समन्वयाचा अभाव व ढिसाळ कारभार, यामुळेच प्रकल्पग्रस्तांवर ही वेळ आली आहे.आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाला १९९६ मध्ये मंजुरी मिळून, प्रत्यक्ष कामाला १९९९ मध्ये सुुरुवात झाली. अद्याप ७५ टक्केकाम झाले असून, सांडवा आणि घळभरणीचे काम बाकी आहे. पुनर्वसन ५० टक्केच झाले आहे. येथील उचंगी, चाफवडे, जेऊर, चितळे ही गावे बाधित झाली असून, २८८ प्रकल्पग्रत पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच १00 टक्केपुनर्वसन व्हावे, अशी प्रकल्पग्रस्तांनी मागणी आहे. याबाबत अनेक आंदोलने करूनही प्रशासनावर याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही.