शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

मुंबई विद्यापीठातील पुनर्मूल्यांकनाचे निकाल महिनाअखेरपर्यंत : देवानंद शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 11:26 IST

मुंबई विद्यापीठातील पुनर्मूल्यांकनाचा निकालाचा वेग दिवाळीमुळे मंदावला होता. सुमारे २४ हजार इतके पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करावयाचे आहेत. त्यातील आतापर्यंत साधारणत: १२ हजार निकाल जाहीर झाले आहेत. उर्वरीत निकालांचे काम या महिनाअखेरपर्यंत संपविण्यात येईल. अशी माहीती मुंबई विद्यापीठाचे प्रभारी आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्दे‘मुंबई’तील कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाची विश्वासार्हता वाढली ‘लोकमत’ शहर कार्यालयाला कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिली सदिच्छा भेटअवघ्या वीस दिवसांत चार लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर

कोल्हापूर ,दि. २३ : मुंबई विद्यापीठातील पुनर्मूल्यांकनाचा निकालाचा वेग दिवाळीमुळे मंदावला होता. सुमारे २४ हजार इतके पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करावयाचे आहेत. त्यातील आतापर्यंत साधारणत: १२ हजार निकाल जाहीर झाले आहेत. उर्वरीत निकालांचे काम या महिनाअखेरपर्यंत संपविण्यात येईल. मुंबईतील या कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाची विश्वासार्हता वाढली असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे सांगितले.

‘लोकमत’ शहर कार्यालयाला कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’ चे संपादक वसंत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’ चे उपव्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर उपस्थित होते.

संवाद आणि विश्वासाच्या जोरावर मुंबई विद्यापीठातील निकालाचे आव्हान समर्थपणे पेलले. यासाठी शिवाजी विद्यापीठातील अनुभव खूप उपयोगी पडला.  मुंबई विद्यापीठातील कामगिरी, निकालाची स्थिती, त्याठिकाणी राबविलेली यंत्रणा आदींबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी संवाद साधला.

त्यांनी सांगितले की, मुंबई विद्यापीठाचे निकाल लावण्याचे काम आव्हानात्मक होते. ज्यावेळी मी तेथील प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी ३०० परीक्षांमधील ५५ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले होते. यानंतर अवघ्या वीस दिवसांत चार लाख विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले. यासाठी त्याठिकाणी कार्यरत असलेल्या यंत्रणा वापरली.

लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी तेथील अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद, विश्वास या सूत्रावर जोर देत कार्यरत राहिलो. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. पुणे विद्यापीठापाठोपाठ मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाल्याने यातून शिवाजी विद्यापीठाचा सन्मान झाला आहे.

निकालाच्या मुद्यावरुन अडचणी आलेल्या मुंबई विद्यापीठाला सुरुवातीला उत्तरपत्रिका तपासणीसाठी आपल्या विद्यापीठाने मदतीचा हात दिला. यानंतर प्रभारी कुलगुरुपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. यापदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केलेल्या सकारात्मक कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय, राज्य पातळीवर विश्वासार्हता वाढली आहे.

बांधिलकी मोठी

औरंगाबाद, पुणे, मुंबईच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाबाबतची समाजातील विविध घटकांची मोठी बांधिलकी आहे. त्याची जाणीव मला येथून बाहेर काम करताना झाली असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, ही बांधिलकी विद्यापीठाला मोठे बळ देणारी आहे. त्याच्या जोरावर विद्यापीठाचा विविध क्षेत्रातील नावलौकीक वाढत आहे.

ग्रामीण विद्यापीठांचा विचार व्हावादेशातील काही ग्रामीण भागातील विद्यापीठांचे संशोधन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अनुषंगाने चांगले काम सुरू आहे. देशातील वीस विद्यापीठे जागतिक दर्जाची बनविणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. यामध्ये ग्रामीण विद्यापीठांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सध्या देशात राज्यनिहाय, विविध अभ्यासक्रमनिहाय शिक्षणाबाबतचे धोरण आहे. ते बदलून समान धोरण असणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर