शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी साखळीत अडकला व्याज परतावा

By admin | Updated: August 15, 2016 00:52 IST

शेतकरी मेटाकुटीला : दोन वर्षांचे २६ कोटी अडकले; शासकीय पातळीवर नुसतीच तरतूद

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर पीक कर्जावर सरकारकडून विविध व्याज सवलत योजना राबविल्या जातात; पण परताव्याची रक्कम वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. सध्या राष्ट्रीयीकृत बॅँकांची पाच कोटी, तर जिल्हा बॅँकेचा सुमारे २२ कोटी परतावा यायचा आहे. सरकारच्या पातळीवर आर्थिक वर्षाच्या अगोदरच तरतुदी होत असताना केवळ सरकारी साखळीतून पाठपुरावा होत नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करत बसावे लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेती अडचणीत आल्याने शेतकरी पीक कर्जाखाली दबला जातो. त्याला हातभार लावण्यासाठी पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडित प्रोत्साहनात्मक ‘डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना’ कॉँग्रेस आघाडी सरकारने आणली. त्यात केंद्र सरकारनेही सहभाग घेऊन शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत शून्य टक्के, तर तीन लाखांपर्यंत दोन टक्के व्याज दराने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला. एक लाखापर्यंतच्या कर्जाचे तीन-तीन टक्के व्याज केंद्र व राज्य सरकार देते; तर एक लाख ते तीन लाखांपर्यंतच्या कर्जाचे तीन टक्के केंद्र व एक टक्का व्याज राज्य सरकार बॅँकांना देते. त्यामुळे विकास संस्थांनी शेतकऱ्यांकडून या व्याजदरानेच आकारणी करावी, अशी ही व्याज सवलत योजना सांगते; पण वित्तीय संस्थांना दोन-दोन वर्षे व्याज मिळत नसल्याने त्यांची शेतकऱ्यांकडून वसुली सुरू आहे. सरकार आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सवलतीच्या रकमेची तरतूद करते. राज्य सरकारच्या वाट्याची चालू २०१६-१७ या आर्थिक वर्षाची ११० कोटींची तरतूद ४ आॅगस्टलाच केली आहे. त्यातील ८८ कोटींचे वितरणही करण्याचे आदेश दिले; मग परतावा शेतकऱ्यांपर्यंत येण्यास एवढा विलंब का लागतो. ज्या शेतकऱ्यांनी मुदतीत परतफेड केली आहे, त्यांचे प्रस्ताव संबधित वित्तीय संस्थांकडून सहायक निबंधकांकडे पाठविले जातात. त्यांच्याकडून तपासणी होऊन जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून सरकारकडे पाठविले जातात; पण या साखळीतूनच परताव्याचा प्रस्ताव पुढे सरकत नसल्याचा आरोप वित्तीय संस्थांकडून होत आहे. जिल्ह्यातील दोन लाख ७१ हजार शेतकरी २०६९ कोटी पीक कर्ज घेतात. त्यापैकी जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून १३०० कोटी, तर इतर बॅँकांतून ७५० कोटी पीक कर्ज वितरित केले जाते. दीड लाख शेतकरी व्याज सवलत योजनेत सहभागी होतात. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा बॅँकेशी निगडित शेतकऱ्यांचे २१ कोटी, तर राष्ट्रीयीकृत बॅँकेकडील शेतकऱ्यांचे पाच, असे २६ कोटी रुपये अडकले आहेत. वित्तीय संस्थांनी एवढे व्याज शेतकऱ्यांकडून वसूल केल्याने त्यांचा ताळेबंद जुळला आहे; पण दुष्काळ व त्यानंतरची अतिवृष्टी यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक घडी मात्र विस्कटली आहे. ऊस बिलांच्या दिरंगाईने फटका ४व्याज सवलतीची मुदत ३० जूनअखेर केली आहे; पण आपल्याकडे एप्रिलपर्यंत साखर कारखाने चालतात. ४तेथून पुढे उसाची बिले जमा होण्यास किमान दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जातो. ४जूनअखेर कर्जाची परतफेड होत नसल्याने अनेक शेतकरी व्याज सवलतीला मुकतात.