शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

सरकारी साखळीत अडकला व्याज परतावा

By admin | Updated: August 15, 2016 00:52 IST

शेतकरी मेटाकुटीला : दोन वर्षांचे २६ कोटी अडकले; शासकीय पातळीवर नुसतीच तरतूद

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर पीक कर्जावर सरकारकडून विविध व्याज सवलत योजना राबविल्या जातात; पण परताव्याची रक्कम वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. सध्या राष्ट्रीयीकृत बॅँकांची पाच कोटी, तर जिल्हा बॅँकेचा सुमारे २२ कोटी परतावा यायचा आहे. सरकारच्या पातळीवर आर्थिक वर्षाच्या अगोदरच तरतुदी होत असताना केवळ सरकारी साखळीतून पाठपुरावा होत नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करत बसावे लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेती अडचणीत आल्याने शेतकरी पीक कर्जाखाली दबला जातो. त्याला हातभार लावण्यासाठी पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडित प्रोत्साहनात्मक ‘डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना’ कॉँग्रेस आघाडी सरकारने आणली. त्यात केंद्र सरकारनेही सहभाग घेऊन शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत शून्य टक्के, तर तीन लाखांपर्यंत दोन टक्के व्याज दराने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला. एक लाखापर्यंतच्या कर्जाचे तीन-तीन टक्के व्याज केंद्र व राज्य सरकार देते; तर एक लाख ते तीन लाखांपर्यंतच्या कर्जाचे तीन टक्के केंद्र व एक टक्का व्याज राज्य सरकार बॅँकांना देते. त्यामुळे विकास संस्थांनी शेतकऱ्यांकडून या व्याजदरानेच आकारणी करावी, अशी ही व्याज सवलत योजना सांगते; पण वित्तीय संस्थांना दोन-दोन वर्षे व्याज मिळत नसल्याने त्यांची शेतकऱ्यांकडून वसुली सुरू आहे. सरकार आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सवलतीच्या रकमेची तरतूद करते. राज्य सरकारच्या वाट्याची चालू २०१६-१७ या आर्थिक वर्षाची ११० कोटींची तरतूद ४ आॅगस्टलाच केली आहे. त्यातील ८८ कोटींचे वितरणही करण्याचे आदेश दिले; मग परतावा शेतकऱ्यांपर्यंत येण्यास एवढा विलंब का लागतो. ज्या शेतकऱ्यांनी मुदतीत परतफेड केली आहे, त्यांचे प्रस्ताव संबधित वित्तीय संस्थांकडून सहायक निबंधकांकडे पाठविले जातात. त्यांच्याकडून तपासणी होऊन जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून सरकारकडे पाठविले जातात; पण या साखळीतूनच परताव्याचा प्रस्ताव पुढे सरकत नसल्याचा आरोप वित्तीय संस्थांकडून होत आहे. जिल्ह्यातील दोन लाख ७१ हजार शेतकरी २०६९ कोटी पीक कर्ज घेतात. त्यापैकी जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून १३०० कोटी, तर इतर बॅँकांतून ७५० कोटी पीक कर्ज वितरित केले जाते. दीड लाख शेतकरी व्याज सवलत योजनेत सहभागी होतात. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा बॅँकेशी निगडित शेतकऱ्यांचे २१ कोटी, तर राष्ट्रीयीकृत बॅँकेकडील शेतकऱ्यांचे पाच, असे २६ कोटी रुपये अडकले आहेत. वित्तीय संस्थांनी एवढे व्याज शेतकऱ्यांकडून वसूल केल्याने त्यांचा ताळेबंद जुळला आहे; पण दुष्काळ व त्यानंतरची अतिवृष्टी यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक घडी मात्र विस्कटली आहे. ऊस बिलांच्या दिरंगाईने फटका ४व्याज सवलतीची मुदत ३० जूनअखेर केली आहे; पण आपल्याकडे एप्रिलपर्यंत साखर कारखाने चालतात. ४तेथून पुढे उसाची बिले जमा होण्यास किमान दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जातो. ४जूनअखेर कर्जाची परतफेड होत नसल्याने अनेक शेतकरी व्याज सवलतीला मुकतात.