शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लोकमत इफेक्ट : अखेर ते दोन अंध विद्यार्थी पोहोचले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:56 IST

तब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांची भेट झाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेउन आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांने या विद्यार्र्थ्याना त्यांच्या नातेवाईकांकडे सोमवारी सुखरुप पोहोचवण्यात आले.

ठळक मुद्देलोकमत इफेक्ट : अखेर ते दोन अंध विद्यार्थी पोहोचले घरी, तीन महिन्याच्या प्रतिक्षेची अखेरहिंगोलीत झाली घरच्यांची भेट : आमदार ऋतुराज पाटील यांनी केले प्रयत्न

कोल्हापूर : तब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांची भेट झाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेउन आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांने या विद्यार्र्थ्याना त्यांच्या नातेवाईकांकडे सोमवारी सुखरुप पोहोचवण्यात आले.स्वतंत्र वाहन करुन जाण्याची ऐपत नसल्यामुळे गेले तीन महिने संचारबंदीमुळे कोल्हापूरात अडकलेले हिंगोली जिल्ह्यातील कामिनी ज्ञानेश्वर गडवे आणि अतुल विश्वनाथ भगत हे दोन अंध विद्यार्थी कोल्हापूरातच अडकले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे हे दोन अंध विद्यार्थी कोल्हापूरातील विकास हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होते. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या कामिनीचे वडील शेतमजूर असून अतुलचे वडील मुंबईत रोजगार करतात.यासंदर्भात ३१ मे रोजी लोकमतने बातमी दिली होती. ती वाचून आमदार ऋतुराज पाटील यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्याची तयारी दर्शविली. हे विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेत होते त्या विकास हायस्कूलमध्ये विशेष शिक्षक असलेले अजय वणकुद्रे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घेउन त्यांच्याशी चर्चा केली आणि जाण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली.

कसबा बावडा येथील चालक युवराज कुंभार यांनी सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या दोन विद्यार्र्थ्याना हिंगोलीत पोहोचवले. दोघांच्याही पालकांना त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आसवे उभी राहिली. लोकमत आणि आमदार ऋतुराज पाटील यांचे त्यांनी आभार मानले.मास्क, सॅनिटायझरसोबत दिली कोल्हापूरची शिदोरीडॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये या विद्यार्थ्यांचे मोफत स्वॅब घेउन त्यांना हिंगोलीत पोहोचविण्याची तयारी केली. त्यांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह येताच त्यांना सॅनिटायझर, मास्क, दोघांच्याही घरी पुरतील इतके अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, ते वापरण्याबद्दलचे सूचनापत्रक देउन त्यांना सोमवारी पहाटे हिंगोलीकडे रवाना केले. याशिवाय मिठाई, कोरडा खाउ, नाश्ता, आणि दुपारचे जेवण अशी कोल्हापूरची शिदोरीही दिली.होम क्वारन्टाईन करण्याच्या सूचनाया दोन विद्यार्थ्यांना विशेष परवानगी काढून होम क्वारन्टाईन करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा प्रशासनाला देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्यासोबत स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहेत.

लोकमतमुळे कोल्हापूरात अडकलेल्या या दोन अंध विद्यार्थ्यांना मदत करता आली. या कठीण काळात माणुसकीच्या नात्याने त्यांना त्यांच्या घरी पोहोचवणे आवश्यक होते. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला यामुळे प्रोत्साहन मिळाले. लोकमतचे विशेष आभार.ऋतुराज पाटील,आमदार, कोल्हापूर.

लोकमतमध्ये आलेली बातमी वाचुन या अंध विद्यार्थ्यांना मदत मिळणे गरजेचे वाटले. आमदार ऋतुराज पाटील यांना या मुलांची अवस्था सांगितली, त्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. या विध्यार्थ्यांना हिंगोली येथे गेल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवले जाऊ नये यासाठी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्येमोफत स्वाब तपासून तसे प्रमाणपत्र सोबत दिले. यामुळे त्यांना तेथे कोणताही त्रास झाला नाही. तीन महिन्यानंतर त्यांना त्यांचे पालक भेटले यातच आम्हाला समाधान आहे. महादेव नरके, प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा, कोल्हापूर 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRuturaj Patilऋतुराज पाटीलkolhapurकोल्हापूरHingoliहिंगोली