शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बँकेकडून साखर मूल्यांकन घटीचा विक्रम

By admin | Updated: July 7, 2015 23:59 IST

सलग आठव्यांदा घट : साखर कारखान्यांच्या कोट्यवधींच्या शेअर्स रकमेला राज्य बँकेकडून छदामही नाही

कोपार्डे : जसजसे साखरेचे दर घसरू लागले तसे राज्य बँकेने आपले पतधोरणही बदलले असून, साखर मूल्यांकन दर तीन महिन्यांनी जाहीर करण्याचा पायंडाच मोडल्याचे पहायला मिळत आहे. एक महिन्यात बाजारातील साखरेच्या दराचे भांडवल करत तीनवेळा साखर मूल्यांकन घटवून साखर कारखान्यांसमोरील आर्थिक अडचणीत भर टाकली असल्याचे मत साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. सध्या साखरेच्या दराने गेल्या दोन वर्षांतील निच्चांक गाठला आहे. १९०० ते २००० रुपये एक्स फॅक्टरी दर प्रति क्विंटलवर आल्याने मोठी आर्थिक चणचण कारखानदारींसमोर निर्माण झाली आहे. बाजारात साखर उत्पादन खर्चाच्या किमान ६०० ते ७०० रुपये कमी दर मिळत असल्याने एफ.आर.पी. द्यायची कोठून हा प्रश्न कारखानदारांसमोर उभा ठाकला आहे.त्यातच राज्य बँकेकडून प्रतिक्विंटल साखर उत्पादनावर देण्यात येणाऱ्या कर्जाच्या उचलीत कमालीची घट करत आर्थिक हातोडा उगारला आहे. हंगाम २०१४-१५ मध्ये आॅक्टोबर २०१४ मध्ये राज्य बँक प्रतिक्विंटल देत असलेली उचल २६३० रुपये होती. यावेळी साखरेची बाजारातील दराची घसरण सुरू झाली आहे. ती २००० रुपये प्रतिक्विंटल आल्याने २९ जून २०१५ मध्ये राज्य बँकेने प्रतिक्विंटल देत असलेल्या २१०० रुपये उचलीमध्ये १५० रुपये घट केली असून, ती १९५० वर आणली आहे. ही घट या हंगामातील आठव्यांदा असून, तो विक्रमच म्हणावा लागेल. दरम्यान, अडचणीच्या काळात राज्य बँकेकडून मदतीची अपेक्षा साखर उद्योगाला होती. पूर्वहंगामी कर्ज देताना एकूण कर्जाच्या एक ते दीड टक्का रक्कम शेअर्स भांडवल म्हणून कपात करते. या शेअर्स भांडवलावर राज्य बँकेकडून २००४ पासून एक रुपयाही रिबेट अथवा व्याज दिलेले नाही. राज्यातील साखर कारखान्यांची ही शेअर्स ठेव राज्य बँकेकडे कोट्यवधीच्या घरात आहे. ही रक्कम राज्य बँक बिनव्याजी वापरत आहे. आमच्या शेअर्स भांडवलावर व्याज देत नसाल ती साखर उद्योग अडचणीत असताना परत करा, अशी मागणी साखर कारखानदारांकडून होत आहे.तीन महिन्यांनी बाजारातील सरासरी साखरेचा दर पाहून साखर मूल्यांकन जाहीर करण्याचा नियम आजपर्यंत होता, पण या हंगामात (२०१४-१५) तो धाब्यावर बसवून राज्य बँकेने दीड महिन्यात तीनवेळा साखर मूल्यांकनात घट केल्याने साखर उद्योगातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)१९५०च्या ८५ टक्के मिळणार उचल राज्य बँकेने १९५० रुपये प्रतिक्विंटल उचल जाहीर केली असली तरी त्यांच्या ८५ टक्के म्हणजे १६५७ रुपये ५० पैसेच उपलब्ध होणार आहेत. यातील बँकेचे पूर्वीचे कर्जाचे व्याज, उत्पादन खर्च यापोटी ७५० रुपये वजा करता म्हणजे ऊस दर देण्यासाठी केवळ ९७५ रुपये २५ पैसेच साखर कारखानदारांच्या हातात पडणार आहेत. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सरासरी एफआरपी २४०० ते २६०० रुपये असल्याने उर्वरित १७०० रुपये प्रतिटन कोठून उपलब्ध करायचे हा प्रश्न असताना कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत. साखर उद्योगाच्या इतिहासातील प्रथमच प्रसंगराज्य बँकेकडून साखर मूल्यांकनामध्ये सातवेळा घट करण्यात आली. एकाच हंगामात एवढ्यावेळा घट करण्याचा साखर उद्योगाच्या इतिहासातील प्रथमच प्रसंग असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.