शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

रंकाळा शुद्धिकरण १४ जूनपासून

By admin | Published: June 07, 2015 1:03 AM

महापालिकेत सादरीकरण : आर्थिक बोजाविना प्रकल्प साकारणार

कोल्हापूर : मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतर्फे (आय.सी.टी.) रंकाळ्यातील पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्पास १४ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. ‘हायड्रो डायनॅमिक कॅव्हिटेशन’ या तंत्रज्ञानावर आधारित पाण्याच्या करण्यात येणाऱ्या शुद्धिकरण प्रकल्पाचे आय.सी.टी.चे प्राध्यापक व प्रकल्प संशोधक डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी शनिवारी महापालिकेत सादरीकरण केले. यावेळी डॉ. पंडित यांनी पर्यावरण अभ्यासकांच्या प्रश्नांचे निराकरण केले. महापालिका या प्रकल्पासाठी फक्त वीजपुरवठा करणार आहे. सेवाभावी निधीतून संस्थेचे कुलगुरू व कोल्हापूरचे सुपुत्र जी. डी. यादव यांनी प्रकल्पासाठी लागणारा २५ लाखांचा निधी जमा केला आहे. या प्रकल्पासाठी ३० बाय १५ फूट जागा व थ्री फेज ४० एचपी वीज तसेच एक आयआटीआय फिटर कामगार महापालिका पुरविणार आहे. प्रकल्पाद्वारे एका तासात एक दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धिकरण होईल. यात कोणत्याही रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार नाही. रिअ‍ॅक्टरमध्ये सेकंदाच्या लाख भागापेक्षाही कमी वेळेत पाणी दहा हजार अंश सेल्सियस तापमानावर गरम होऊन थंड होईल. यावेळी पाण्यातील दूषित घटक मरून जातील. शेवाळ, हायसिंथ व इतर प्रदूषित घटकांचा पूर्णत: नाश केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात इराणी खणीतील पाणी शुद्ध केले जाणार आहे. पंधरा दिवस ते एक महिन्यात हे पाणी दृश्यस्वरूपात शुद्ध झालेले दिसेल, असे पंडित यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती आदिल फरास, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनीष पवार, उदय गायकवाड, दिलीप देसाई, बुरहान नायकवडी, प्रा. अमर जाधव, प्रसाद मंत्री, केवल सांगरूळकर, रवी बांदिवडेकर, सुनील बत्तासे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)