शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्रांचा कारभार रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:24 IST

अमर पाटील : कळंबा : कळंबा, पुईखडी, बालिंगा या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. येथे ...

अमर पाटील :

कळंबा : कळंबा, पुईखडी, बालिंगा या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. येथे कर्मचारीवर्गाचा तुटवडा असल्याने कमी दाबाचा, अपुरा व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धता प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने कर्मचारीच पाणी तपासतात. दक्षिण विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्या उपनगरातील विविध प्रभागातील नागरिकांची पाण्याची गरज या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रातून भागवली जाते. १९४७ साली उभारण्यात आलेल्या कळंबा फिल्टर हाऊसची जलशुद्धीकरण क्षमता १० एमएलडी आहे. २००१ साली उभारण्यात आलेल्या पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ६० एमएलडी तर १९६२ साली उभारण्यात आलेल्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ६० एमएलडी आहे. मात्र, य तिन्ही जलशुद्दीकरण केंद्रात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. गाळणी निरीक्षक एक, गाळणी परिचर एक, फिल्टर ऑपरेटर चार आणि लॅबअसिस्टंट एक अशी पदे रिक्त आहेत. त्यामुळे तंत्रशुद्ध पध्दतीने तंत्रज्ञाकडून केंद्रावर पाण्याचे शुद्धीकरण न होताच पाणी वितरित केले जाते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नाशिक केंद्रातून आठ दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या कर्मचारीवर्गाच्या तोकड्या अनुभवावर या जलशुद्धीकरण केंद्रांचा कारभार सुरू आहे.

प्रत्येक जलशुद्धीकरण केंद्रात एका शिफ्टसाठी एक फिल्टर ऑपरेटर व दोन मजूर लागतात. दिवसाच्या चार शिफ्टसाठी चार फिल्टर ऑपरेटर, आठ मजूर लागतात. तंत्रज्ञांची वानवा असल्याने तुरटी ब्लिचिंगचा डोस मजूरच देतात.

ड्रेसिंग रूम, बॅकवॉशरूम, लॅबोरेटरी क्लोरीन रूम येथे पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अपुऱ्या प्रकाशात जलशुद्धीकरण सुरू असते. प्रचंड विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांबाहेर सुरक्षारक्षक तैनात नसल्याने कोणाचाही मुक्तसंचार केंद्रात सुरू असतो. विशेष म्हणजे जलशुद्धीकरण केंद्रात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अवैध धंदे जोरात सुरू आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित याप्रश्नी संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी आता होत आहे.

कोट : या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांवर योग्य प्रमाणात कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच जलशुद्धीकरण केंद्रे समस्यामुक्त होणार आहेत.

- नारायण भोसले, जलअभियंता

चौकट

कर्मचारीच तपासतात पाण्याची शुद्धता

पाण्याची चव, वास गढूळता १ एनटीयू, टीडीएस ५०० पीपीएम, एकूण कठिणता ३०० पीपीएम आणि पीएच ६.५० ते ८.५०असावा असा नियम आहे. परंतु या जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धता प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने कर्मचारीच तपासतात. त्यामुळे नागरिकांनी शुद्धजलाची अपेक्षा कुणाकडून करायची असा सवाल उपस्थित हाेत आहे.

फोटो : ०८ बालिंगा जलशुद्दीकरण केंद्र

१९४७ साली उभारण्यात आलेल्या कळंबा जलशुद्धीकरण केंद्राची अपुऱ्या कर्मचारी वर्गाने दुरवस्था झाली आहे