शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

जलशुद्धीकरण केंद्रांचा कारभार रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:24 IST

अमर पाटील : कळंबा : कळंबा, पुईखडी, बालिंगा या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. येथे ...

अमर पाटील :

कळंबा : कळंबा, पुईखडी, बालिंगा या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. येथे कर्मचारीवर्गाचा तुटवडा असल्याने कमी दाबाचा, अपुरा व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धता प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने कर्मचारीच पाणी तपासतात. दक्षिण विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्या उपनगरातील विविध प्रभागातील नागरिकांची पाण्याची गरज या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रातून भागवली जाते. १९४७ साली उभारण्यात आलेल्या कळंबा फिल्टर हाऊसची जलशुद्धीकरण क्षमता १० एमएलडी आहे. २००१ साली उभारण्यात आलेल्या पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ६० एमएलडी तर १९६२ साली उभारण्यात आलेल्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ६० एमएलडी आहे. मात्र, य तिन्ही जलशुद्दीकरण केंद्रात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. गाळणी निरीक्षक एक, गाळणी परिचर एक, फिल्टर ऑपरेटर चार आणि लॅबअसिस्टंट एक अशी पदे रिक्त आहेत. त्यामुळे तंत्रशुद्ध पध्दतीने तंत्रज्ञाकडून केंद्रावर पाण्याचे शुद्धीकरण न होताच पाणी वितरित केले जाते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नाशिक केंद्रातून आठ दिवसांचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या कर्मचारीवर्गाच्या तोकड्या अनुभवावर या जलशुद्धीकरण केंद्रांचा कारभार सुरू आहे.

प्रत्येक जलशुद्धीकरण केंद्रात एका शिफ्टसाठी एक फिल्टर ऑपरेटर व दोन मजूर लागतात. दिवसाच्या चार शिफ्टसाठी चार फिल्टर ऑपरेटर, आठ मजूर लागतात. तंत्रज्ञांची वानवा असल्याने तुरटी ब्लिचिंगचा डोस मजूरच देतात.

ड्रेसिंग रूम, बॅकवॉशरूम, लॅबोरेटरी क्लोरीन रूम येथे पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अपुऱ्या प्रकाशात जलशुद्धीकरण सुरू असते. प्रचंड विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांबाहेर सुरक्षारक्षक तैनात नसल्याने कोणाचाही मुक्तसंचार केंद्रात सुरू असतो. विशेष म्हणजे जलशुद्धीकरण केंद्रात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अवैध धंदे जोरात सुरू आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित याप्रश्नी संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी आता होत आहे.

कोट : या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांवर योग्य प्रमाणात कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच जलशुद्धीकरण केंद्रे समस्यामुक्त होणार आहेत.

- नारायण भोसले, जलअभियंता

चौकट

कर्मचारीच तपासतात पाण्याची शुद्धता

पाण्याची चव, वास गढूळता १ एनटीयू, टीडीएस ५०० पीपीएम, एकूण कठिणता ३०० पीपीएम आणि पीएच ६.५० ते ८.५०असावा असा नियम आहे. परंतु या जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धता प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने कर्मचारीच तपासतात. त्यामुळे नागरिकांनी शुद्धजलाची अपेक्षा कुणाकडून करायची असा सवाल उपस्थित हाेत आहे.

फोटो : ०८ बालिंगा जलशुद्दीकरण केंद्र

१९४७ साली उभारण्यात आलेल्या कळंबा जलशुद्धीकरण केंद्राची अपुऱ्या कर्मचारी वर्गाने दुरवस्था झाली आहे