शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

राखी न विसरणारा भैय्या--

By admin | Updated: August 28, 2015 23:47 IST

रक्षाबंधन विशेष

रत्नागिरी : ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना...’ या काव्य पंक्तीतून बहीण भावाकडे आर्जव करते. बहीण भावाच्या नात्याची विण राखीव्दारे घट्ट बांधून ठेवण्याचा सण अर्थात्च रक्षाबंधन! गेली २२ वर्षे हा सण आंबेडबुद्रुक येथील हसीना ऊर्फ फईमा निसार केळकर साजरा करीत आहेत. त्यांचे बंधुराज खलील युसूफ बावडेकर दरवर्षी न चुकता रक्षाबंधनाला हजर असतात, हे विशेष.आंबेडखुर्द गावातील खलील युसूफ बावडेकर हे दुबईमध्ये नोकरी करीत होते. त्यांच्या लग्नानंतर काही वर्षांतच खलील मानसिक आजारी पडले. तेव्हापासून आतापर्यंत अनेक औषधोपचार करूनसुध्दा खलील बरे झाले नाहीत. परिणामी नोकरी सुटली. खलील यांना सहा बहिणींपैकी त्यांचे हसीनावर भरपूर प्रेम. त्यामुळे हसीनाकडे दरवर्षी ते न चुकता हजर असतात. खलील मानसिक आजारी असल्यामुळे ते आपल्या घरी केव्हा थांबतच नाहीत. त्यांच्या बंधुराजांनी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करूनसुध्दा ते सतत पायी फिरत असतात. वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाकडे काही मागत नाहीत किंवा कोणाकडून काही घेत नाहीत. जेवणाच्या वेळी भूक असेल तर कुणी वाढलेले ते जेवतात. पंचक्रोशीमध्ये खलील यांना ओळखणारी मंडळी खूप आहे. ही व्यक्ती सतत चालत फिरत असल्यामुळे ओळखीची मंडळी त्यांना गाडीत बसवण्याचा प्रयत्न करतात. नातेवाईकही गाडीत बोलावतात. परंतु, ते स्पष्ट नकार देऊन चालतच फिरतात. त्यांच्याकडून कोणालाही उपद्रव होत नसल्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनाही त्यांच्याबद्दल आस्था वाटते. खलील सतत फिरतच असल्यामुळे चिपळूण, माखजन, इतकेच नव्हे; तर ते मुंबईतही पोहोचले होते. शेवटी नातेवाईकांनी शोध घेऊन त्यांना गावी आणले. मानसिक आजारामुळे खलील यांची अशी स्थिती आहे. त्यांना दररोजचा वार किंवा दिनांक याबद्दल काहीच माहीत नाही. इतकेच नव्हे; तर जवळच्या मंडळींनाही ते ओळखत नाहीत. परंतु, काळवेळेचे भान नसलेले खलिल रक्षाबंधनाच्या दिवशी मात्र बहिणीकडे न चुकता येतात. इतकेच नव्हे; तर बहिणीच्या सासू सासऱ्यांसह भाच्याची चौकशी करतात. बहिणीकडून राखी बांधून घेतात. वाढलेले जेवतात व पुन्हा आलेल्या मार्गाने निघून जातात. आपल्या बंधूराजाच्या या परिस्थितीमुळे हसीना व्याकूळ होतात. खलील घरी आलेवर परत जाऊ नयेत यासाठी त्यांनी घराचे दरवाजे बंद करून घेतले होते. त्यांना घरातील एका खोलीत राहण्यासाठी विनंती केली परंतु, खलील ते न जुमानता निघून गेले. गेली २२ वर्षे हसीना त्यांच्यासाठी नवीन कपडे घेतात, त्यांची वाट पहात असतात.कुठल्याच ऋतूंचा खलील यांच्यावर दिनक्रमावर परिणाम होत नाही. त्यांची फिरस्ती सतत सुरू असते. परंतु, रक्षाबंधन मात्र कधीच चुकत नाही. थोड्या वेळासाठी का होईना भाऊ घरी येतो, आपला भाऊ घरीच थांबावा, त्याचेवर आणखी औषधोउपचार व्हावेत व तो बरा व्हावा अशी ईच्छा हसीना व त्यांच्या सर्व बहिणींची आहे मात्र ती असफल ठरत आहे. त्यामुळेच ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ ऐवजी हसीना फक्त आपल्या भावासाठी अल्लाहकडे प्रार्थना करतात.