शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

कर्जमुक्तीसाठी ‘स्वाभिमानी’चे ‘गहुली’मधून आंदोलन; महाराष्ट्रभर दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:38 IST

कर्जमुक्तीचे अर्ज राष्ट्रपतींना देणार

कोल्हापूर : सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मगावी गहुली (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथून वसंतराव नाईक कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केली असून ते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात जाऊ लागली आहे. वाढलेली महागाई, नैसर्गिक आपत्ती, खतांचे वाढलेले दर, सरकारचे शेतीमालाच्या चुकीचे आयात- निर्यात धोरण, रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशके, शेती औजारे याच्या माध्यमातून जी. एस. टी.चा शेतकऱ्यांवर पडलेला बोजा, यामुळे कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतीतून लोक बाहेर पडू लागले आहेत. यामुळे सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, ही मागणी ते करत आहेत.

यावेळी स्वाभिमानीचे डॅा. प्रकाश पोपळे, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले, वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक, स्वाभिमानीचे विदर्भ प्रवक्ता मनीष जाधव, हणमंत राजुगोरे, परभणी जिल्हा अध्यक्ष किशोर ढगे, गहुलीचे सरपंच नितीन कोल्हे, उपसरपंच विलास आडे आदी उपस्थित होते.कर्जमुक्तीचे अर्ज राष्ट्रपतींना देणारशेतक-यांच्याकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घेऊन ते अर्ज राष्ट्रपतींना देणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या जाणार आहेत.‘वंचित’च्या शिष्टमंडळाने घेतली भेटआगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने तिसऱ्या आघाडीसाठी चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहभागी व्हावे, यासाठी ‘वंचित’च्या शिष्टमंडळाने सोमवारी राजू शेट्टी यांची भेट घेतली. पण, कर्जमुक्तीचे आंदोलन झाल्याशिवाय विधानसभा निवडणूकीबाबत विचार करणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीagitationआंदोलन