शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

भाजपसोबत कदापी जाणार नाही : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:23 IST

'निवडून आल्यानंतर आपण त्यांच्यासोबत जाऊ अशी अफवा'

शिरोळ : ज्या भाजप सरकारने साडेसातशे शेतकऱ्यांचा जीव घेतला, महिलांवर अत्याचार केला, त्यांच्यासोबत कदापि जाणार नाही. निवडून आल्यानंतर आपण त्यांच्यासोबत जाऊ, अशी अफवा पसरवली जात असून, मी सोबत जाण्याइतकी भाजपची लायकी नसल्याची टीका ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी केली. शिरोळ येथील शिवाजी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.शेट्टी म्हणाले, शेती उत्पादनांना हमीभाव मिळावा, यासाठी संसदेत कायदा मंजूर होण्याची गरज आहे. हा कायदा मंजूर झाल्यानंतर २४ पिकांना हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर मी लढाई करत आहे. भूमी अधिग्रहणाचा विषय महत्त्वाचा आहे. चुकीचा प्रचार करून मला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणी कितीही आडवा पाय मारण्याचा प्रयत्न केला तरी मी दिल्ली गाठल्याशिवाय राहणार नाही.स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील एकही प्रश्न मार्गी लावला नाही. केवळ कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या गप्पा मारण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नसून, अशा निष्क्रीय लोकप्रतिनिधीला घरी बसवण्याची वेळ आली आहे. यावेळी सावकार मादनाईक, सचिन शिंदे, विठ्ठल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Raju Shettyराजू शेट्टीBJPभाजपा