शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

भाजपसोबत कदापी जाणार नाही : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:23 IST

'निवडून आल्यानंतर आपण त्यांच्यासोबत जाऊ अशी अफवा'

शिरोळ : ज्या भाजप सरकारने साडेसातशे शेतकऱ्यांचा जीव घेतला, महिलांवर अत्याचार केला, त्यांच्यासोबत कदापि जाणार नाही. निवडून आल्यानंतर आपण त्यांच्यासोबत जाऊ, अशी अफवा पसरवली जात असून, मी सोबत जाण्याइतकी भाजपची लायकी नसल्याची टीका ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी केली. शिरोळ येथील शिवाजी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.शेट्टी म्हणाले, शेती उत्पादनांना हमीभाव मिळावा, यासाठी संसदेत कायदा मंजूर होण्याची गरज आहे. हा कायदा मंजूर झाल्यानंतर २४ पिकांना हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर मी लढाई करत आहे. भूमी अधिग्रहणाचा विषय महत्त्वाचा आहे. चुकीचा प्रचार करून मला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणी कितीही आडवा पाय मारण्याचा प्रयत्न केला तरी मी दिल्ली गाठल्याशिवाय राहणार नाही.स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील एकही प्रश्न मार्गी लावला नाही. केवळ कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या गप्पा मारण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नसून, अशा निष्क्रीय लोकप्रतिनिधीला घरी बसवण्याची वेळ आली आहे. यावेळी सावकार मादनाईक, सचिन शिंदे, विठ्ठल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Raju Shettyराजू शेट्टीBJPभाजपा