शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
4
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
5
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
6
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
7
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
8
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
9
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
10
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
11
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
12
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
13
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
14
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
15
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
17
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
18
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
19
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
20
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर

बहुजन समाजात एकरूप झालेले ‘राजपूत’

By admin | Updated: June 8, 2015 00:54 IST

ऐतिहासिक वारसा : हल्दीघाटी लढाईनंतर कोल्हापुरात स्थायिक , जिल्ह्यात ३५ हजारांहून अधिक लोकसंख्या--लोकमतसंगेजाणून घेऊ-- राजपूत समाज

सचिन भोसले - कोल्हापूर --राजपुतांना जन्मत:च योद्धा म्हटले जाते, अशा ‘क्षत्रिय राजपूत’ समाजाची काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकेकाळी सत्ता होती. ब्रिटिश काळ सोडला, तर या समाजाने अनादिकालापासून भारतावर राज्य केले आहे. या क्षत्रिय कुलावंतात हरिश्चंद्र, विश्वामित्र, राम, श्रीकृष्ण, राजा दशरथ, सम्राट पृथ्वीराज चौहान, मानसिंह कछवाह, जसवंतसिंह राठोड, रायसिंह-कर्णसिंह, राणा प्रताप, चंद्रसेन, सुस्त्रान, महाराणा प्रताप... एवढेच काय, छत्रपती शिवाजी महाराज, अशा महान विभूतींचा जन्म या क्षत्रिय कुलात झाला. अशा या समाजाने स्वातंत्र्यानंतर बहुजन समाजात मिसळून आधुनिकतेची कास धरली आहे. २१ जून १५७६ रोजी अकबर व महाराणा प्रताप यांच्यात हल्दीघाटची लढाई झाली. या लढाईनंतर क्षत्रिय राजपूत समाजातील लोक भारतातील विविध प्रांतांत विखुरले गेले. यांतील अनेक लोक सातपुडा पर्वतरांगांमध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी वास्तव्यास आले. शिवाजी महाराज यांच्या कार्यकालात तर अकबर, औरंगजेबाच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात राजपूत सैनिक होते. महाराष्ट्रातील विविध लढायांनिमित्त हे राजपूत राज्यातील जंगलांत राहू लागले. पुढे ते येथेच राहिले. १८५७ साली ब्रिटिशांविरोधात उठाव झाला. यामध्ये अग्रदूत वीर कुॅँवरसिंह यांनी उत्तुंग कामगिरी केली. या उठावानंतर अनेक राजपूत कोल्हापूर जिल्ह्यात आले. १८९५ साली शाहू महाराज हे शिकारीनिमित्त सोनतळी येथे जात असताना त्यांनी आपल्या शेतात एक पहार मारली व ती वाकवून ठेवली. पुन्हा सायंकाळी ते शेतात आले असता ती पहार सरळ केली होती. हे ताकदीचे काम कोणी केले असे महाराजांनी सर्वांना विचारले. तेव्हा मंगलसिंग राजपूत यांचे नाव पुढे आले. याच दरम्यान भोला पंजाबी कुस्ती करण्यासाठी आला होता. तो महाराजांना ‘माझी कुस्तीची लढत ठरवा, अन्यथा मला खंडणी द्या,’ असे म्हणाला. त्यावर महाराजांनी मंगलसिंग राजपूत यांना सोनतळी येथून बोलावून घेतले. मंगलसिंग व भोला पंजाबीसमोर महाराजांनी एक टोपली ओले वरणे व शेरभर तूप ठेवले. महाराजांनी समोर टाकलेले वरणे हाताला तूप लावून काही मिनिटांतच मंगलसिंग यांनी सोलले. हे काम पाहून भोला पंजाबी हे हादरून गेले. त्यांनी आपल्यापेक्षा थोर पैलवान महाराजांकडे आहे, आपली माघार म्हणून महाराजांकडे निशाण फडकावले. महाराजांनी भोलाला आतापर्यंत विविध ठिकाणांहून आणलेली खंडणीतील वाटणी मंगलसिंग यांना देण्यास सांगितले. याचबरोबर मंगलसिंग यांना १४ एकर जागा सोनतळीजवळ दिली. हीच आताची रजपूतवाडी होय. या मंगलसिंग यांच्या वंशजांबरोबर त्या काळी कोल्हापूरच्या जवळपासच्या क्षेत्रात अनेक राजपूत कुटुंबे आली होती. त्यानुसार स्वातंत्र्यानंतर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात राजपूत समाजाची ५६ लाख तर, जिल्ह्यात ३५ हजार इतकी लोकसंख्या आहे. स्वातंत्र्यानंतर कोल्हापुरातील राजपूत समाजाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. या समाजाला स्वत:चे असे कार्यालयही नाही. वारंवार शासनदरबारी विनंती अर्ज करूनही या समाजासाठी कोठेही अद्याप जागा मिळालेली नाही. या समाजाची कास बहुजन समाजाबरोबर बांधली असल्याने जातपात न पाहता अडल्या-नडलेल्या नागरिकांना यथाशक्ती मदतीचा हात नियमित दिला जात आहे. या समाजाला शासनदरबारी केवळ तीन टक्के आरक्षण आहे. याचबरोबर जातीचे दाखले मिळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने अल्पसंख्याक असणाऱ्या या समाजाला इतर समाजाबरोबरीने नोकरी, शिक्षणातही आरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे.इतिहासाच्या प्रत्येक पानावर राजपूत समाजाने शौर्य, साहस, स्वाभिमान या गोष्टी लिहून ठेवल्या. मात्र, काळानुसार समाज बदलत चालला आहे. त्यानुसार रूढी-परंपराही बदलत आहेत. समाजाने आजच्या घडीला एकत्रित येणे ही काळाची गरज बनली आहे. कोल्हापुरात समाजाची ३५ हजार लोकसंख्या असूनही त्यांची आज एकही वास्तू नाही. शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यासाठी समाजातील लोकांनी संघटित व्हावे. - अमरसिंह राजपूत, अध्यक्ष, राजपूत समाज, कोल्हापूर जिल्हापूर्वी पहाटे लग्ने होत होती; कारण या समाजाचे वास्तव्य जंगलात होते. त्याकाळी कधीही शत्रूचा हल्ला होण्याची भीती असायची. त्यामुळे सर्वांत सुरक्षित काळ म्हणून पहाटे लग्ने होत होती. ही प्रथा बंद झाली आहे. सध्या गोरज मुहुर्तावर लग्ने होतात; तर शिंदीच्या पानांपासून बनविलेले मोर-लांडोरीचे टोप लग्नात बाशिंग व मुंडावळ्या म्हणून वापरले जातात. सती जाण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. याशिवाय महिला आघाडीकडून स्त्रीभू्रण हत्या व शिक्षण, आरोग्यासंबधी जनजागृती केली जात आहे. याशिवाय रक्तदान, वधूवर मेळावा आयोजित केला जातो. शौर्याचा महामेरू ‘महाराणा प्रताप’ यांचा पुतळा उभारणीचे कार्य समाजाचे एकही कार्यालय नसताना गोपालसिंह राजपूत, दत्तूसिंह उमरावसिंह पवार, अमरसिंह परदेशी, अमरसिंह राजपूत, जयराज राजपूत, माधवसिंह राजपूत, रामसिंह राजपूत, निरंजनसिंह ठाकूर, बाळसिंह राजपूत, किसनसिंह राजपूत, किरणसिंह राजपूत, रणजितसिंह राजपूत, रतनसिंह राजपूत, सूरजितसिंह राजूपत, जोगसिंह देवडा, रचनाथसिह परदेशी, मोहनसिंह राजपूत, दिलीपसिंह राजपूत, बबनसिंह चंदेले, जयसिंह राजपूत, संयोगिता राजपूत, भगवानसिंह राजपूत, शामसिंह राजूपत, विठ्ठलसिंह राजूपत, भीमसिंह शिलेदार, ताराबाई ठाकूर यांच्या प्रयत्नांतून महावीर गार्डनमध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभा करण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते ३१ मे १९९६ रोजी झाले. आजतागायत ३१ मे रोजी महापौरांच्या हस्ते पुतळ्याची पूजा केली जाते. ‘भामटा’ शब्द लुप्त झालाब्रिटिशकाळात राजपूत लोकांनी लूटमारी व चोरी करू नये म्हणून त्यांना ‘भामटा राजपूत’ असे नाव दिले. भामटेगिरी बंद करावी, याकरिता विविध सवलती दिल्या. कालांतराने ‘भामटा’ हा शब्द लज्जास्पद वाटू लागल्याने समाजातील लोक ‘भामटा’ शब्दाचा उल्लेख टाळू लागले. आज या शब्दावरच शासन अडून बसले आहे. समाजातील लोकांना जातीचे दाखले देताना व जातपडताळणीवेळी ‘भामटा’ हा शब्दाचा उल्लेख नसल्याच्या कारणावरून अडचणी निर्माण होत आहेत.छत्रपती शिवरायांचे घराणेही ‘क्षत्रिय’ कुलावंतातीलछत्रपती घराणेही याच क्षत्रिय राजपूत घराण्यातील असल्याचा उल्लेख राजपूत समाजाच्या अनेक पुस्तकांत आढळतो. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आयोजित केला होता, तेव्हा पुरोहितांनी ते क्षत्रिय नसल्याचे सांगत राज्याभिषेक करण्यास नकार दिला होता. याच दरम्यान गागाभट्टांना बोलाविण्यात आले. त्यांनी महाराज हे ‘क्षत्रिय’ कुलावंतातील आहेत, याचा दाखला दिला. त्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. समाजातील हिरेमाजी महापालिका आयुक्त पृथ्वीराज बायसजिल्हा न्यायाधीश जी. सी. बायसपिंपरी-चिंचवडचे माजी महापालिका आयुक्त व आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशीप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रतापसिंह राजपूत व रजपूतवाडी व चिखलीचे सरपंच म्हणून सहा वेळा मान मिळवणारे केवलसिंग राजपूत.