शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

Kolhapur politics: शिरोळमध्ये राजकीय डावपेचात राजेंद्र पाटील-यड्रावकर यशस्वी; महाविकास आघाडी, स्वाभिमानीची गणिते चुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:49 IST

संदीप बावचे शिरोळ : शिरोळच्या राजकीय साठमारीत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळविला. प्रचाराचे नेटके नियोजन आणि दगाफटका ...

संदीप बावचेशिरोळ : शिरोळच्या राजकीय साठमारीत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळविला. प्रचाराचे नेटके नियोजन आणि दगाफटका होऊ नये म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत घेतलेली खबरदारी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीकडून गणपतराव पाटील व स्वाभिमानीकडून लढणारे उल्हास पाटील यांची गणिते चुकली. हा निकाल स्वाभिमानी पक्षाला आत्मचिंतन करायला लावणारा ठरला. जातीपातीच्या राजकारणापेक्षा जनता विकासालाच मत देते हे यड्रावकर यांच्या विजयातून अधोरेखित झाले आहे. विधानसभेचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटणार आहेत.तालुक्याची निवडणूक यापुढे जातीपातीवर न होता विकासकामांवर होईल, अशी भूमिका घेऊन यड्रावकर निवडणुकीत उतरले होते. पाच वर्षांतील विकासकामांचा मुद्दा, मतांचे ध्रुवीकरण होऊ नये यासाठी त्यांनी टाकलेले डावपेच यशस्वी ठरले. यड्रावकर यांच्या बाजूने गुरुदत्तचे अध्यक्ष माधवराव घाटगे, स्वाभिमानीचे सावकर मादनाईक यांच्यासह घटक पक्षातील नेत्यांचे योगदान मोलाचे ठरले. यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील-यड्रावकर यांच्या नियोजनामुळे ते किंगमेकर ठरले आहेत.

गणपतराव पाटील युवा मतदारांना खेचण्यात अयशस्वी ठरले. दुसऱ्या फळीतील नेत्यांचा फारसा प्रभाव देखील दिसून आला नाही. तर, स्वाभिमानीतून उल्हास पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाली. याचवेळी स्वाभिमानीचे सावकार मादनाईक यांनी महायुतीला पाठिंबा देत शेट्टी यांना धक्का दिला. त्यामुळे स्वाभिमानीची वोट बँक घटली आणि याचा फायदा आपसुकच यड्रावकरांना झाला.निवडणुकीत स्व. सा.रे. पाटील यांचे राजकीय वारसदार कोण हा मुद्दा प्रभावीपणे गाजला. यड्रावकर यांनी विजयश्री खेचून आणत तेच राजकीय वारसदार असल्याचे सिध्द करुन दाखविले. लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल शेट्टी यांना डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. लाडकी बहीण योजनेबरोबरच तरुणाई, शेतकरी, दलित, मुस्लिम यासह ओबीसी समाजातील घटक महायुतीसह महाविकास आघाडीच्या बाजूने राहिल्याचे दिसून आले. मात्र, अखेरच्या टप्प्यात यड्रावकर यांनी महायुतीच्या काळातील विकासकामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचविला आणि तो मतदारांना भावला.

गावागावांत यड्रावकरांना लीडलक्षवेधी ठरलेल्या जयसिंगपुरात यड्रावकर यांना २२,८८१ तर, गणपतराव यांना १०,७६२ मते मिळाली. तालुक्यातील ५५ गावांपैकी शिरोळ, धरणगुत्ती, जांभळी, कुटवाड, कनवाड, गौरवाड, औरवाड, बुबनाळ, बस्तवाड, आलास, नवे दानवाड, राजापूरवाडी या बारा गावांत किरकोळ लीड गणपतराव पाटील यांना तर, ४३ गावांत यड्रावकर यांनाच लीड मिळाल्याचे दिसून आले. स्वाभिमानीच्या हक्काच्या गावामध्येही यड्रावकरच भारी ठरले आहेत.

आगामी निवडणुका लक्षवेधी ठरणार..शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीला पुन्हा ताकद दाखवावी लागणार आहे. तर, विरोधी काँग्रेससह स्वाभिमानी, उद्धव सेना, शरद पवार गट यांची भूमिका काय असणार यावरच आगामी राजकारणाची गणिते अवलंबून असणार आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shirol-acशिरोळMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024