शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

राजाराम कारखाना निवडणूक: वाढलेल्या टक्केवारीने वाढली निकालाची हुरहुर, दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 12:50 IST

या निवडणुकीत यंत्रणा राबवण्यापासून, जेवणावळी व प्रत्यक्ष रोख रकमेचे वाटप याचा विचार केला असता तेवढ्या रकमेतून नवा कारखाना उभा राहिला असता, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सभासदाने व्यक्त केली

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विक्रमी ९१.१२ टक्के मतदान झाल्याने निकालाबद्दलची हुरहुर कमालीची वाढली आहे. गत निवडणुकीत सरासरी नव्वद टक्के मतदान झाले होते. दोन्ही बाजूंकडून सर्रास झालेले पैशाचे वाटप, प्रत्येक मतदार बाहेर काढण्यासाठी लागलेली यंत्रणा, प्रचारात उठलेली राळ आणि बोगस मतदान रोखण्यात आलेले यश यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस दिसली. सभासदांच्या मतांचा कौल मात्र मंगळवारीच स्पष्ट होईल.ही निवडणूक गेली वर्षभरापासून गाजते आहे. सुरुवातीला ती अपात्र सभासदांच्या लढ्यामुळे गाजली. त्याची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. त्यानंतर विरोधी आघाडीचे तगडे उमेदवार अपात्र ठरण्यावरून गाजली. ती लढाईही उच्च न्यायालयापर्यंत गेली. या दोन्ही लढ्यांत सत्ताधारी महादेवराव महाडिक यांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे आता प्रत्यक्ष मतपेटीतील लढाई कुणाच्या बाजूने कौल देते याबद्दल अंदाज वर्तवणे मुश्कील झाले आहे.राजाराम कारखान्याची सत्ता ही महाडिक गटाकडे राहिलेली जिल्हा पातळीवरील एकमेव व महत्त्वाची सत्ता आहे. विधान परिषद, विधानसभा, गोकुळ आणि लोकसभेला पाठोपाठ पराभव झाल्यानंतर महाडिक गट जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफुटवर गेला; परंतु राज्यसभेला आकस्मिकपणे धनंजय महाडिक यांना भाजपने संधी मिळाली व पुन्हा या गटाला उभारी आली.पुढे राज्यात सत्तांतर झाल्याचा फायदाही राजारामच्या निवडणुकीत सभासद व उमेदवार अपात्र प्रकरणात सत्तारूढ गटाला झाला. त्यांच्या दृष्टीने राजारामची सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनीही सर्व पातळ्यांवर उतरून ही निवडणूक लढवली. बऱ्याचदा लोक कारखान्याची सत्ता व विधानसभा किंवा अन्य निवडणुकीतील यश याची फारच चौकसपणे निवड करतात. गेल्या २८ वर्षांत महाडिक यांचा दबदबा राहिला. त्यामुळे त्यांच्याशी जोडलेले लोक कितपत बाजूला जातात यावरच गुलाल ठरणार आहे.निवडणूक कोणतेही असो, ती सतेज पाटील यांनी एकदा अंगावर घेतली की मग मागेपुढे पाहायचे नाही. तिला भिडायचे याचा अनुभव लोकसभा व गोकुळच्या निवडणुकीतही आला होता. तशीच यंत्रणा त्यांनी या निवडणुकीत राबवली. को-जन, डिस्टलरी प्रकल्प, विस्तारीकरण, उसाला दर, कारखान्याचे बकालपण, सभासदांना मिळणारी वागणूक हे मुद्दे निवडणुकीत ऐरणीवर आणून त्यांनी मतदारांच्या भावनेला हात घातला.तगडे उमेदवार अपात्र ठरल्याने या निवडणुकीत त्यांच्या पॅनलमध्ये गावपातळीवरील सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली. वाशीसारख्या एकाच गावांत तीन उमेदवार द्यावे लागले. त्यामुळे गावे व तगडे उमेदवार यांचा समतोल साधता आला नाही हे खरे असले तरी त्यांनी सतेज पाटील हेच उमेदवार आहेत, असे वातावरण निर्माण करण्यात यश मिळवले. त्यांची व्यक्तिगत राबणूक हीच लढतीत हवा निर्माण करणारी ठरली. मयत मतदान होणार नाही याची दक्षता घेतली. हातकणंगले तालुक्यात विनय कोरे यांनी एका सभेत भाषण केले; परंतु ते सक्रिय होणार नाहीत याची व्यवस्था केली. सर्जेराव माने यांचे बळ, गोकुळची सत्ता सोबत होती. अशा अनेक जोडण्या लावल्याने त्यांना विजयाचा पुरता आत्मविश्वास आहे.

नवा कारखाना झाला असता...

या निवडणुकीत यंत्रणा राबवण्यापासून, जेवणावळी व प्रत्यक्ष रोख रकमेचे वाटप याचा विचार केला असता तेवढ्या रकमेतून नवा कारखाना उभा राहिला असता, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ सभासदाने व्यक्त केली. अगोदर एका गटाने पाच हजार दिले, ते दुसऱ्या गटाला समजल्यावर त्यांनी दहा दिले. मग पहिल्या गटाने आणखी दहा हजार मताला दिले असे अनेक गावांत घडले. मतदारांनी दोघांकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे पैशाचा प्रभाव पडतो की, लोक कारभार पाहून जागरूकतेने मतदान करतात यावरही निकाल ठरेल. कुंभी-कासारी, राजाराममध्ये जे घडले ते ऐकून निवडणूक होणाऱ्या बिद्री, भोगावतीसारख्या इतर कारखानदारांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकAmal Mahadikअमल महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील