शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

राजाराम कारखाना: सतेज पाटील यांना पराभव पचलेला नाही, अमल महाडिकांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:32 IST

राज्य सरकारकडे अपील करणार

कोल्हापूर : कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत पुन्हा एकदा गैरमार्गाने सभासदांवर अन्याय करून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा दुर्दैवी प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. तो आम्हास व सभासदांना कदापीही मान्य नाही. सतेज पाटील यांना राजारामचा पराभव पचलेला नाही, असा टोला कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी गुरुवारी प्रसिध्दीपत्रकातून लगावला. अपात्र ठरवलेले सभासद १२७२ नसून फक्त ८२४ असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे.पत्रकात म्हटले आहे, सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेले वक्तव्य बालिशपणाची आहेत. प्रत्यक्षात या निकालाचा कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूक निकालाशी संबंध नसताना कायदेशीर प्रक्रियेनुसार पार पडलेल्या निवडणुकीसंंबंधी दिशाभूल करत आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ म्हणजे फक्त राजकीय गट सांभाळणे एवढ्याचपुरता मर्यादित आहे. त्यांच्या गटाच्या पराभूत उमेदवारांना मी काहीतरी करून दाखवत आहे असे भासवण्याचा प्रयत्न आहे.

या निकालामध्ये मोठमोठी आकडेवारी सांगून सभासदांमध्ये निष्कारण चुकीची माहिती सांगण्याची उठाठेव ते करीत आहेत. निवडणुकीत मी स्वतः सर्वाधिक २२०५ मतांनी व आमचे सत्तारूढ पॅनेलचे सर्व उमेदवार सरासरी १६०० मतांनी विजयी झाले आहेत. हा फरक ८२४ पेक्षा निश्चितच मोठा आहे. खरे पाहता २१-० झालेला दारुण पराभव त्यांना चार महिने उलटले तरीही पचवता आलेला नाही.

राज्य सरकारकडे अपील करणारप्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता विरोधकांनी परस्पर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे आदेश दिला आहे. आदेश आणि त्यांच्याविरुध्द अवमान याचिका दाखल करणार आहे. निकालाविरोधात राज्य सरकारकडे अपील करणार आहे. प्रादेशिक सहसंचालकांचा आदेश सभासद, शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या विरोधात आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिक