शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

Kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला झटका, २९ उमेदवारांचे अर्ज बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:43 IST

अर्ज अपात्र ठरविल्याचे समजल्यानंतर विरोधी आघाडी आक्रमक

कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक छाननीत २३७ अर्जांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज अपात्र (बाद ) तर १५० अर्ज पात्र ठरले. कारखान्याशी ऊस पुरवठ्याबाबत केलेल्या कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत विरोधी आघाडीचे कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, मारुतराव मेडशिंगे यांच्यासह २९ जणांचे अर्ज अपात्र ठरविल्याने त्यांना रिंगणाबाहेर रहावे लागणार आहे. या निर्णयानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर विरोधी आघाडीच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देत निवडणूक यंत्रणेचा निषेध केला.‘राजाराम’ कारखान्याच्या २१ जागांसाठी विविध गटातून २३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी या अर्जांची छाननी झाल्यानंतर यामधील ४१ अर्ज अपात्र ठरवण्यात आले. कारखान्याला ऊस पुरवठा करण्याबाबत शेतकरी करार करतात, त्या करारानुसार ऊस पुरवठा केला नाहीतर कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहता येणार नाही, असा ‘ राजाराम ’ चा पोटनियम आहे. त्याचा आधार घेऊन हे अर्ज अपात्र ठरवले आहेत. मंगळवारी अर्ज अपात्र ठरविल्याचे समजल्यानंतर विरोधी आघाडी आक्रमक झाली होती.

बुधवारी सकाळी दहा पासूनच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बाहेर एकत्र येत निकालाची प्रतीक्षा करत होते. हरकती घेतलेले विरोधी आघाडीचे उमेदवार अपात्र ठरल्याचे समजात संतप्त सभासदांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. ‘ दबावाखाली येऊन निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो ’, ‘ दम असेल तर मैदानात उतरा ’ अशा घोषणा देण्यात आल्या. सभासद आक्रमक झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.सर्जेराव माने म्हणाले, सत्तारुढ आघाडीच्या राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या अधिकाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आजचा निर्णय लोकशाही मारक आहे, ‘ राजाराम ’ चे सभासद सूज्ञ असून मतदानातून सत्ताधारी आघाडीला ते उत्तर देतील. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.मोहन सालपे म्हणाले, सत्तारुढ आघाडीचा हा रडीचा डाव आहे. २८ वर्षाचा कारभार पारदर्शक आहे, तर घाबरता का ? रिंगणात या.अपात्र ठरलेले उमेदवार असे :गट क्र.१ - बाबूराव बेनाडे, पांडुरंग जाधवगट क्र.२- सर्जेराव माने, दिगंबर पोळ, उत्तम सावंत, मधुकर खोत, अजितकुमार पाटील, अमित भंडारी, संदीप भंडारी, बाळासाहेब माने, नागनाथ भोसले, लालासो कोळी.गट क्र.३- बाजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, नामदेव शिंदे, सुरेश पाटील.गट क्रमांक ४- महादेव पाटील, गणपती यादव, राजकुमार पाटील , अशोक पाटील, रंजना पाटील, सखाराम गौड, शिवाजी पाटील.गट क्रमांक ५- जयसिंग पोवारगट क्रमांक ६- रामचंद्र नलवडे, प्रकाश खराडे, रघुनाथ चव्हाण, सुधाकर साळोखे, बाबूराव चौगले, चंद्रकांत चौगले, शिवाजी पाटील, मारुतराव मेडशिंगे, मारुती मगदूम, दत्तात्रय पाटील, अजित पाटील, बाजीराव चौगले, गणपती पाटील, दीपसिंह नवले, बबन पाटील.महिला राखीव - रंजना पाटीलइतर मागास प्रवर्ग - नामदेव पाटील.सत्तारुढ गटाच्या व्यूहरचनेला यशविरोधी आघाडीची तयारी पाहता, त्यांच्याकडील ताकदवान उमेदवारांना छाननीत रोखण्याची व्यूहरचना सत्तारुढ आघाडीने अगोदरच आखली होती. त्यात ते यशस्वी झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.महापूराने ऊस गेला मग काय करायचे?कारखान्याकडे ऊस क्षेत्राची नोंद दिली पण महापूरासह इतर नैसर्गिक कारणाने उसाचे उत्पादन घटले मग करारानुसार ऊस पाठवायचा कसा ? असा सवाल यावेळी सभासदांनी केला.

गडमुडशिंगीतील विरोधी गटाचे सर्व अर्ज बादगडमुडशिंगी गावात तब्बल ४४३ मतदान आहे. येथून विरोधी आघाडीकडून डॉ. अशोक पाटील यांची उमेदवारी निश्चित होती. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर दोघांचे असे चारही अर्ज अपात्र ठरले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील