शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

Kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला झटका, २९ उमेदवारांचे अर्ज बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 11:43 IST

अर्ज अपात्र ठरविल्याचे समजल्यानंतर विरोधी आघाडी आक्रमक

कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक छाननीत २३७ अर्जांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज अपात्र (बाद ) तर १५० अर्ज पात्र ठरले. कारखान्याशी ऊस पुरवठ्याबाबत केलेल्या कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत विरोधी आघाडीचे कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, मारुतराव मेडशिंगे यांच्यासह २९ जणांचे अर्ज अपात्र ठरविल्याने त्यांना रिंगणाबाहेर रहावे लागणार आहे. या निर्णयानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर विरोधी आघाडीच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देत निवडणूक यंत्रणेचा निषेध केला.‘राजाराम’ कारखान्याच्या २१ जागांसाठी विविध गटातून २३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी या अर्जांची छाननी झाल्यानंतर यामधील ४१ अर्ज अपात्र ठरवण्यात आले. कारखान्याला ऊस पुरवठा करण्याबाबत शेतकरी करार करतात, त्या करारानुसार ऊस पुरवठा केला नाहीतर कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहता येणार नाही, असा ‘ राजाराम ’ चा पोटनियम आहे. त्याचा आधार घेऊन हे अर्ज अपात्र ठरवले आहेत. मंगळवारी अर्ज अपात्र ठरविल्याचे समजल्यानंतर विरोधी आघाडी आक्रमक झाली होती.

बुधवारी सकाळी दहा पासूनच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बाहेर एकत्र येत निकालाची प्रतीक्षा करत होते. हरकती घेतलेले विरोधी आघाडीचे उमेदवार अपात्र ठरल्याचे समजात संतप्त सभासदांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. ‘ दबावाखाली येऊन निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो ’, ‘ दम असेल तर मैदानात उतरा ’ अशा घोषणा देण्यात आल्या. सभासद आक्रमक झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.सर्जेराव माने म्हणाले, सत्तारुढ आघाडीच्या राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या अधिकाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आजचा निर्णय लोकशाही मारक आहे, ‘ राजाराम ’ चे सभासद सूज्ञ असून मतदानातून सत्ताधारी आघाडीला ते उत्तर देतील. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.मोहन सालपे म्हणाले, सत्तारुढ आघाडीचा हा रडीचा डाव आहे. २८ वर्षाचा कारभार पारदर्शक आहे, तर घाबरता का ? रिंगणात या.अपात्र ठरलेले उमेदवार असे :गट क्र.१ - बाबूराव बेनाडे, पांडुरंग जाधवगट क्र.२- सर्जेराव माने, दिगंबर पोळ, उत्तम सावंत, मधुकर खोत, अजितकुमार पाटील, अमित भंडारी, संदीप भंडारी, बाळासाहेब माने, नागनाथ भोसले, लालासो कोळी.गट क्र.३- बाजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, नामदेव शिंदे, सुरेश पाटील.गट क्रमांक ४- महादेव पाटील, गणपती यादव, राजकुमार पाटील , अशोक पाटील, रंजना पाटील, सखाराम गौड, शिवाजी पाटील.गट क्रमांक ५- जयसिंग पोवारगट क्रमांक ६- रामचंद्र नलवडे, प्रकाश खराडे, रघुनाथ चव्हाण, सुधाकर साळोखे, बाबूराव चौगले, चंद्रकांत चौगले, शिवाजी पाटील, मारुतराव मेडशिंगे, मारुती मगदूम, दत्तात्रय पाटील, अजित पाटील, बाजीराव चौगले, गणपती पाटील, दीपसिंह नवले, बबन पाटील.महिला राखीव - रंजना पाटीलइतर मागास प्रवर्ग - नामदेव पाटील.सत्तारुढ गटाच्या व्यूहरचनेला यशविरोधी आघाडीची तयारी पाहता, त्यांच्याकडील ताकदवान उमेदवारांना छाननीत रोखण्याची व्यूहरचना सत्तारुढ आघाडीने अगोदरच आखली होती. त्यात ते यशस्वी झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.महापूराने ऊस गेला मग काय करायचे?कारखान्याकडे ऊस क्षेत्राची नोंद दिली पण महापूरासह इतर नैसर्गिक कारणाने उसाचे उत्पादन घटले मग करारानुसार ऊस पाठवायचा कसा ? असा सवाल यावेळी सभासदांनी केला.

गडमुडशिंगीतील विरोधी गटाचे सर्व अर्ज बादगडमुडशिंगी गावात तब्बल ४४३ मतदान आहे. येथून विरोधी आघाडीकडून डॉ. अशोक पाटील यांची उमेदवारी निश्चित होती. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर दोघांचे असे चारही अर्ज अपात्र ठरले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील