शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पावसाचा जोर ओसरला;कोल्हापूर पंचगंगेचे पाणी प्रथमच गायकवाड वाड्यालगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:43 AM

किरकोळ सरी वगळता पावसाने उघडीप दिली. मात्र, दोन दिवसांच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देपावसाचा जोर ओसरला ; पहिल्याच पावसात शहरात खड्डेच खड्डेपुराच्या पाण्यामुळे तेरवाड, शिरोळ, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नृसिंहवाडीत दत्त मंदिरात पाणी आले

कोल्हापूर : शहरात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर शुक्रवारी सकाळपासून कमी झाला. किरकोळ सरी वगळता पावसाने उघडीप दिली. मात्र, दोन दिवसांच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

गुरुवार (दि. ११) पासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासून काही प्रमाणात उसंत घेतली. सकाळपासून दिवसभरात शहरात अधूनमधून पावसाचा शिडकावा होत होता. काही काळ उन्हाचे दर्शन झाले. पावसाचा जोर ओसरला तरीही पंचगंगा नदीचे पाणी प्रथमच पात्राबाहेर पडले. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली. सकाळी गायकवाड वाड्यालगत पाणी होते, तर दुपारनंतर त्यात वाढ होऊन ते जामदार क्लबकडे सरकले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा मार्ग लोखंडी बॅरिकेटस् टाकून रस्ता बंद केला. पावसाचा जोर ओसरला तरीही शहरातील बिंदू चौक, भाऊसिंगजी रोड, कोळेकर तिकटी, सीपीआर चौक, दाभोळकर कॉर्नर, स्टेशन रोड, कावळा नाका, आदी परिसरात वाहतुकीच्या कोंडीचे चित्र दिसत होते. राजारामपुरी जनता बझार, लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, आदी ठिकाणी पाणी साचून होते. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणची गटारे व ड्रेनेज साफ केल्यामुळे पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे रस्ते किंवा वाहतूक बंद झाली नाही.

दूधगंगा पात्राबाहेरशिरोळ / दत्तवाड : शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरणक्षेत्रात कोसळणाºया पावसामुळे तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दोन फुटाने वाढ झाली तर दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीचे पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले असून दोन्ही बाजूंची गवताची कुरणे पाण्यात गेली आहेत.

पुराच्या पाण्यामुळे तेरवाड, शिरोळ, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नृसिंहवाडीत दत्त मंदिरात पाणी आले आहे तर शिरढोण-कुरुंदवाड, नांदणी-शिरढोण मार्गदेखील बंद झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी नृसिंहवाडी येथे कृष्णेची पाणी पातळी ४५ फूट, राजापूर बंधाºयावर ३४.०९ तर शिरोळ बंधाºयावर पंचगंगेची पाणी पातळी ४७ फूट, तेरवाड बंधाºयावर ५३.०९ तर दिनकरराव यादव पुलावर ४५ फूट होती. दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून घोसरवाड- सदलगा, दत्तवाड-मलिकवाड, दत्तवाड-एकसंबा या बंधाºयावर पाणी आले आहे.

खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टीकोल्हापूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. यावर महापालिकेकडून मुरूम टाकून ते भरण्याचे काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते. एवढीच मलमपट्टी केल्यानंतर पुन्हा पाऊस झाल्यानंतर या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते, असे चित्र वारंवार दिसून येते. तरीही ही मलमपट्टी कशासाठी, असा सवाल वाहनधारकांमधून विचारला जात आहे. विशेषत: रिक्षाचालक खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी