शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पावसाचे थैमान; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:04 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. जून महिना जवळजवळ कोरडा ...

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. जून महिना जवळजवळ कोरडा गेला असताना जुलैमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसला. तलाव छोटे-मोठे, काही धरणे भरून वाहू लागल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांच्या पडझडबरोबरच शेतीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने जनजीवनही विस्कळीत झाले आहे.कोल्हापूर-मलकापूर महामार्ग बंदकोल्हापूर-मलकापूर महामार्गावर केर्ली येथे पंचगंगेचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने तळकोकणातील वाहतूक मलकापूरमार्गे वळविली होती. आता येथे पाणी आल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.चार बंधारे पाण्याखालीगडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने बुधवारी किरकोळ उघडीप दिली. मात्र, तालुक्यातील नांगनूर, निलजी, जरळी, ऐनापूर हे चारही बंधारे पाण्याखाली आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू होती. बुधवारी दिवसभरात २८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आजअखेर १८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी झालेला मंडलनिहाय पाऊस मि.मी.मध्ये असा : गडहिंग्लज (२१), महागाव (२८), हलकर्णी (२३), नेसरी (४७), कडगाव (२९), दुंडगे (२६), नूल (८).खोचीत पुराचे पाणीखोची : वारणा नदीच्या पाणी पातळीत बुधवारी झपाट्याने वाढच होत गेली. पाणी पात्राबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले. या पाण्यामुळे भैरवनाथ मंदिर परिसर पूर्ण व्यापला आहे. त्यामुळे मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद होऊन मंदिराचा संपर्क तुटला आहे. येथील स्मशानभूमीचा परिसर पूर्ण पाण्याखाली गेल्याने स्मशानभूमीचा मार्ग बंद झाला आहे.गणेश मंदिर परिसरात नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे. महसूल विभागाच्या वतीने पूररेषेतील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटिसा लागू केल्या आहेत. बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती. तसेच वारणा धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग चालू झाल्याने पाणीपातळीत मोठी वाढ होत होती. खोची-दुधगाव दरम्यानचा खोची बंधारा पाण्याखालीच आहे. बंधाºयावर चौदा ते पंधरा फूट पाणी आहे. हा मार्ग वडगाव पोलिसांनी बॅरेकेट लावून बंद केला आहे. खोची, भेंडवडे, लाटवडे, बुवाचे वठार परिसरात शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. ऊस, भुईमूग, सोयाबीन, भात या पिकांचा त्यामध्ये समावेश आहे.‘राधानगरी’ भरले; मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरूराधानगरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता पूर्ण भरले. धरणाची पाणी पातळी ३४७.५० फुटाच्या पुढे गेल्याने स्वयंचलित दरवाजांतून पाण्याच्या विसर्ग सुरू झाला. रात्री उशिरा धरणाचा चौथा दरवाजा खुला होऊन त्यातून ७११२ क्यूसेक्सने विसर्ग सुरू झाले.बुधवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी ६ क्रमांकाचा दरवाजा उघडला. त्यानंतर सव्वाबारा वाजता ३ क्रमांकाचा व सव्वा वाजता ५ व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला. यातून प्रत्येकी १४५६ क्युसेक्स प्रमाणे ४३६८ व जलविद्युतनिर्मिती केंद्रातून १४०० असा एकूण ५७६८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला. यामुळे नदीपात्राबाहेर पाणी पडले.यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यातही मध्यंतरी १५ दिवस त्याने दडी मारली होती. त्यामुळे धरण उशिरा भरेल असा अंदाज होता. मात्र, गेल्या आठवडाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणी झपाट्याने वाढले. बुधवारी सकाळी आठ वाजता चोवीस तासांत या वर्षीचा उच्चांकी २०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एकूण २७६६ मिलिमीटर पाऊस झाला.