शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

पावसाचे थैमान; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:04 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. जून महिना जवळजवळ कोरडा ...

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. जून महिना जवळजवळ कोरडा गेला असताना जुलैमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसला. तलाव छोटे-मोठे, काही धरणे भरून वाहू लागल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांच्या पडझडबरोबरच शेतीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने जनजीवनही विस्कळीत झाले आहे.कोल्हापूर-मलकापूर महामार्ग बंदकोल्हापूर-मलकापूर महामार्गावर केर्ली येथे पंचगंगेचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने तळकोकणातील वाहतूक मलकापूरमार्गे वळविली होती. आता येथे पाणी आल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.चार बंधारे पाण्याखालीगडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने बुधवारी किरकोळ उघडीप दिली. मात्र, तालुक्यातील नांगनूर, निलजी, जरळी, ऐनापूर हे चारही बंधारे पाण्याखाली आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू होती. बुधवारी दिवसभरात २८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आजअखेर १८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी झालेला मंडलनिहाय पाऊस मि.मी.मध्ये असा : गडहिंग्लज (२१), महागाव (२८), हलकर्णी (२३), नेसरी (४७), कडगाव (२९), दुंडगे (२६), नूल (८).खोचीत पुराचे पाणीखोची : वारणा नदीच्या पाणी पातळीत बुधवारी झपाट्याने वाढच होत गेली. पाणी पात्राबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले. या पाण्यामुळे भैरवनाथ मंदिर परिसर पूर्ण व्यापला आहे. त्यामुळे मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद होऊन मंदिराचा संपर्क तुटला आहे. येथील स्मशानभूमीचा परिसर पूर्ण पाण्याखाली गेल्याने स्मशानभूमीचा मार्ग बंद झाला आहे.गणेश मंदिर परिसरात नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे. महसूल विभागाच्या वतीने पूररेषेतील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटिसा लागू केल्या आहेत. बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती. तसेच वारणा धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग चालू झाल्याने पाणीपातळीत मोठी वाढ होत होती. खोची-दुधगाव दरम्यानचा खोची बंधारा पाण्याखालीच आहे. बंधाºयावर चौदा ते पंधरा फूट पाणी आहे. हा मार्ग वडगाव पोलिसांनी बॅरेकेट लावून बंद केला आहे. खोची, भेंडवडे, लाटवडे, बुवाचे वठार परिसरात शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. ऊस, भुईमूग, सोयाबीन, भात या पिकांचा त्यामध्ये समावेश आहे.‘राधानगरी’ भरले; मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरूराधानगरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता पूर्ण भरले. धरणाची पाणी पातळी ३४७.५० फुटाच्या पुढे गेल्याने स्वयंचलित दरवाजांतून पाण्याच्या विसर्ग सुरू झाला. रात्री उशिरा धरणाचा चौथा दरवाजा खुला होऊन त्यातून ७११२ क्यूसेक्सने विसर्ग सुरू झाले.बुधवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी ६ क्रमांकाचा दरवाजा उघडला. त्यानंतर सव्वाबारा वाजता ३ क्रमांकाचा व सव्वा वाजता ५ व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला. यातून प्रत्येकी १४५६ क्युसेक्स प्रमाणे ४३६८ व जलविद्युतनिर्मिती केंद्रातून १४०० असा एकूण ५७६८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला. यामुळे नदीपात्राबाहेर पाणी पडले.यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यातही मध्यंतरी १५ दिवस त्याने दडी मारली होती. त्यामुळे धरण उशिरा भरेल असा अंदाज होता. मात्र, गेल्या आठवडाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणी झपाट्याने वाढले. बुधवारी सकाळी आठ वाजता चोवीस तासांत या वर्षीचा उच्चांकी २०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एकूण २७६६ मिलिमीटर पाऊस झाला.