शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

राधानगरी धरण भरले, दोन दरवाजे उघडले, ८२ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:26 IST

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आज, सकाळी थोडीसी उसंत घेतली असली तरी राधानगरी धरण आज सकाळी ७ वाजता भरले.

ठळक मुद्देराधानगरी धरणामधून २८२८ क्यूसेकचा विसर्गस्वयंचलित दरवाजा क्र ३ ही उघडला

कोल्हापूर : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेले  राधानगरी धरण आज सकाळी साडे आकरा वाजता पुर्ण भरले. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आज, सकाळी थोडीसी उसंत घेतली. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. जिल्ह्यातील ८२ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील केर्ली येथे रस्त्यापर्यंत पाणी आले आहे. 

एकुण ५७६८ क्युसेक्स विसर्ग सुरु, ३४७.५ फुट पाणीपातळी झाल्यावर ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा सुरु झाला. त्यानतर पाऊण तासाने ३ नंबरचा दरवाजाही सुरु झाला. यातून प्रत्येकी एकहजार चारशेहे प्रमाणे दोनहजार आठशेहे व जलविद्युत निर्मिती केन्द्रातून एकहजार चारशे असा एकुण चारहजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. दुपारी १.१५ वाजता राधानगरी धरणाचा ५ नंबरचा दरवाजा उघडल्यामुळे  नदीला पुर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा सुरु झाला.

५७६८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत असून नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी यांनी दिला आहे. आज सकाळी ११-३० वाजता राधानगरी धरणाचा सहावा स्वयंचलित दरवाजा उघडून १४२८ क्यूसेक तर पायथा गृहातून १४०० असा एकूण २८२८ क्यूसेकचा विसर्ग सुरु झाला आहे.पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील इशारा पाणी पातळी पहाटे २-२0 वाजता ३९ फूट तर ८ वाजता ती ३९ फूट २ इंच इतकी नोंदवली आहे. पावसाचा जोर कायम असून काही तासातच राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचे तीन क्रमांकाचा स्वंयचलित दरवाजा उघडला आहे. यामुळे पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी व सखल भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जंगमहट्टी मध्यम प्रकल्पही काल सकाळी ८ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.गगनबावडा मुख्य रस्ता वाहतूकीस सुरुकोल्हापूर ते गगनबावडा मुख्य रस्ता वाहतुकीस सुरु करण्यात आलेला आहे. मांडुकली व मार्गेवाडी जवळ पाणी पूर्णपणे उतरले असून, लोंघे गावाजवळ फक्त दोन इंच पाणी रस्त्यावर आहे. लोंघे गावाजवळून फक्त एका वेळी एक वाहन सोडले जात आहे. राधानगरी धरणाचे इतर स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडले तर पुन्हा कोल्हापूर ते गगनबावडा मुख्य रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे.

आरळा शित्तूर राघुचावाडा रस्त्यावर पाणी

आरळा शित्तूर राघुचावाडा (तालुका शाहुवाडी) जिल्हा मार्ग-१ किमी १५/३५० रस्त्यावर पाणी आलेने वाहतुक बंद केली आहे.मात्र शित्तूर-तुरुकवाडी-मलकापुर-निळे-भेंडवडे-उदगिरी मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे. 

टॅग्स :DamधरणRainपाऊसkolhapurकोल्हापूर