शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी धरण भरले, दोन दरवाजे उघडले, ८२ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:26 IST

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आज, सकाळी थोडीसी उसंत घेतली असली तरी राधानगरी धरण आज सकाळी ७ वाजता भरले.

ठळक मुद्देराधानगरी धरणामधून २८२८ क्यूसेकचा विसर्गस्वयंचलित दरवाजा क्र ३ ही उघडला

कोल्हापूर : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेले  राधानगरी धरण आज सकाळी साडे आकरा वाजता पुर्ण भरले. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने आज, सकाळी थोडीसी उसंत घेतली. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. जिल्ह्यातील ८२ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील केर्ली येथे रस्त्यापर्यंत पाणी आले आहे. 

एकुण ५७६८ क्युसेक्स विसर्ग सुरु, ३४७.५ फुट पाणीपातळी झाल्यावर ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा सुरु झाला. त्यानतर पाऊण तासाने ३ नंबरचा दरवाजाही सुरु झाला. यातून प्रत्येकी एकहजार चारशेहे प्रमाणे दोनहजार आठशेहे व जलविद्युत निर्मिती केन्द्रातून एकहजार चारशे असा एकुण चारहजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. दुपारी १.१५ वाजता राधानगरी धरणाचा ५ नंबरचा दरवाजा उघडल्यामुळे  नदीला पुर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा सुरु झाला.

५७६८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत असून नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी यांनी दिला आहे. आज सकाळी ११-३० वाजता राधानगरी धरणाचा सहावा स्वयंचलित दरवाजा उघडून १४२८ क्यूसेक तर पायथा गृहातून १४०० असा एकूण २८२८ क्यूसेकचा विसर्ग सुरु झाला आहे.पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील इशारा पाणी पातळी पहाटे २-२0 वाजता ३९ फूट तर ८ वाजता ती ३९ फूट २ इंच इतकी नोंदवली आहे. पावसाचा जोर कायम असून काही तासातच राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचे तीन क्रमांकाचा स्वंयचलित दरवाजा उघडला आहे. यामुळे पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठी व सखल भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क रहावे, असा दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जंगमहट्टी मध्यम प्रकल्पही काल सकाळी ८ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.गगनबावडा मुख्य रस्ता वाहतूकीस सुरुकोल्हापूर ते गगनबावडा मुख्य रस्ता वाहतुकीस सुरु करण्यात आलेला आहे. मांडुकली व मार्गेवाडी जवळ पाणी पूर्णपणे उतरले असून, लोंघे गावाजवळ फक्त दोन इंच पाणी रस्त्यावर आहे. लोंघे गावाजवळून फक्त एका वेळी एक वाहन सोडले जात आहे. राधानगरी धरणाचे इतर स्वयंचलित दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडले तर पुन्हा कोल्हापूर ते गगनबावडा मुख्य रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे.

आरळा शित्तूर राघुचावाडा रस्त्यावर पाणी

आरळा शित्तूर राघुचावाडा (तालुका शाहुवाडी) जिल्हा मार्ग-१ किमी १५/३५० रस्त्यावर पाणी आलेने वाहतुक बंद केली आहे.मात्र शित्तूर-तुरुकवाडी-मलकापुर-निळे-भेंडवडे-उदगिरी मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे. 

टॅग्स :DamधरणRainपाऊसkolhapurकोल्हापूर