शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

महाराणी ताराबाई जयंतीवरून समाजात दुहीचा हेतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:50 IST

या विषयावर सखोल संशोधन करणारे डॉ. अप्पासाहेब पवार, रंगूबाईसाहेब जाधव-भोसले, ब्रिज किशोर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार किंवा तरुण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत असतील, यांपैकी कुणालाही ताराबाईसाहेबांची जन्मतिथी ही कोणत्याही संदर्भसाधनांत मिळून आलेली नाही.

ठळक मुद्देइतिहास संशोधकांचे मत : जयंतीची तारीखच निश्चित नाहीकुणालाही ताराबाईसाहेबांची जन्मतिथी ही कोणत्याही संदर्भसाधनांत मिळून आलेली नाही.

कोल्हापूर : महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रख्यात इतिहास संशोधकांनी आजपर्यंत केलेल्या संशोधनातून महाराणी ताराबाई यांची जन्मतारीख स्पष्ट झालेली नाही. असे असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशीच ताराबाई यांची जयंती असल्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करण्यामागे समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय इतिहास संशोधकांनी व्यक्त केला आहे. आंबेडकर जयंतीपासून मराठा समाज बाजूला जावा, यासाठीच हा उद्योग जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा संशयही व्यक्त होत आहे.

या संदर्भात नव्या पिढीतील इतिहास संशोधक डॉ. देविकाराणी पाटील यांनी सविस्तर विवेचन केले आहे. या विषयावर हा विकीपीडियामध्ये बदल कुणी केला? त्या व्यक्तीकडे या विषयाची काही संदर्भसाधने आहेत का? नेमकी १४ एप्रिल हीच तारीख शोधून काढण्यामागे नक्कीच काहीतरी कुटील हेतू दिसत असल्याचे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे. त्या म्हणतात, ‘महाराणी ताराबाईसाहेब या जगाच्या इतिहासातील महापराक्रमी स्त्री आहेत.

जगात राज्य स्थापन करणारी कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांचेच नाव घ्यावे लागते. अशा या महाराणीचा इतिहास अजूनही लोकांसमोर आलेला नाही. त्यांच्यासंबंधीच्या संशोधकीय घडामोडी या अलीकडील ७० ते ८० वर्षांतील आहेत. या विषयावर सखोल संशोधन करणारे डॉ. अप्पासाहेब पवार, रंगूबाईसाहेब जाधव-भोसले, ब्रिज किशोर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार किंवा तरुण इतिहास संशोधक इंद्रजित सावंत असतील, यांपैकी कुणालाही ताराबाईसाहेबांची जन्मतिथी ही कोणत्याही संदर्भसाधनांत मिळून आलेली नाही.

‘महाराणी ताराबाईसाहेबांचे निधन हे १७६१ साली सातारच्या किल्ल्यावर झाले आणि त्यांचा दहनविधी हा त्यांचे नातू रामराजे त्यावेळी सातारा गादीवर होते यांनी संगममाहुलीला केला. दहावा दिवस करताना त्यांनी एक सनद दिली; त्यामुळे महाराणी ताराबाईसाहेबांची निधनाची तिथी व दिवस हा समजला. त्या वेळच्या कागदपत्रात ताराबाईसाहेबांचे वय ८६ नोंदविले आहे. म्हणून याचाच अर्थ त्यांचा जन्म हा १६७४-७५ साली झाला, असे संशोधकांनी सुसंगत तर्काच्या आधारे मांडले; पण आजपर्यंत त्यांचा जन्म हा अमुक तारखेलाच या ठिकाणी झाला, असे कुठल्याही संदर्भसाधनात किंवा बखरीतही किंवा इतरही कुठेही लिहिले गेलेले नाही.’विकीपीडिया म्हणजे संदर्भसाधन नव्हेमहाराणी ताराबाईसाहेबांची जयंती १४ एप्रिलला आहे, असे कुठेही नोंदवले गेलेले नव्हते. मागच्या वर्षी विकीपीडियामध्ये कुणीतरी ही तारीख टाकून दिली; परंतू विकीपीडिया म्हणजे काही इतिहासाचे संदर्भसाधन नव्हे. या विकीपीडियामध्ये अनेक लोक बदल करू शकतात. तसाच बदल करून ताराबाईसाहेबांच्या जन्मतारखेबद्दल १४ एप्रिल ही तारीख कुठलाही संदर्भ न देता तिथे टाकली. त्यामुळेच आजच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते या दिवशी महाराणी ताराबाईसाहेबांच्या जयंतीच्या पोस्ट प्रसिद्ध झाल्या. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhistoryइतिहास