शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

Pulwama Attack: अजित डोवाल यांची चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर येतील; राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 14:55 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुलवामातील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कसून चौकशी करा, सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा दावा त्यांनी केला. 

एखादी घटना लपवायची असेल तर काहीतरी मोठी बातमी आणायची, हे सगळ्या सरकारांमध्ये चालत आलंय. पण या सरकारमध्ये त्यात प्रचंड वाढ झालीय. बातम्या पसरवल्या जाताहेत, पेरल्या जात आहेत. त्यामुळे नोटाबंदी, राफेल आणि भ्रष्टाचाराची अन्य प्रकरणं जनतेने विसरावीत, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा मध्यात सरकारकडून काहीतरी मोठं घडवलं जाईल, अशी शंका राज यांनी व्यक्त केली. कोल्हापूरमध्ये एका वाहिनीचं उद्घाटन केल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. 

राज ठाकरे म्हणाले, 

>> आजच्या सरकारच्या काळात वर्तमानपत्रं, वाहिन्या, सीबीआय, रिझर्व्ह बँक, पोलीस, लष्कर या सगळ्यांमध्ये दोन गट झालेत. हे लक्षण  देशासाठी चांगलं नाही. 

>> निवडणुकीच्या तोंडावर युद्धाच्या, काश्मीरच्या बातम्या सुरू झाल्या आणि चार-साडेचार वर्षं ज्यावरून आरडाओरड सुरू होती, ते विषय बंद झाले. 

>> नीरव मोदी, चोक्सी ही लोकं मोदींच्या काळात हजारो कोटी रुपये घेऊन फरार झाली. त्यावेळी श्रीदेवी गेल्याची बातमी आली आणि सगळ्या बातम्या बाजूला पडल्या. 

>> आता पुलवामा हल्ल्याच्या बातम्या सुरू आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान एवढंच तुमच्यापुढे उभं केलं जातंय. एक बुवाजी उभा करायचा आणि देशाचं लक्ष त्याच्याकडे वळवायचं, हे अमेरिकेत अनेक वर्षं चालत आलंय. तेच आपल्याकडेही सुरू आहे. 

>>अजित डोवाल यांची कसून चौकशी झाली ना तर काय प्रकरण होतं, आंतरराष्ट्रीय पातलीवर काय घडतंय, हे सगळं बाहेर येईल

>> पाकिस्तानचं पाणी तोडणार आहेत. नळातून द्यायचात का पाणी? आंतरराष्ट्रीय कायदा वगैरे काही असतो की नाही?

>> पाकिस्तानचं पाणी बंद करणार आहेत. मग आडवा बंधारा म्हणून अमित शहाला बसवणार आहात का नदीत?

>> पुलवामाच्या हल्ला झाला, तेव्हा नरेंद्र मोदी जिम कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. घटना कळल्यावरही ते निघाले नाहीत. या माणसाने ताबडतोब दिल्लीला यायला पाहिजे होतं, पण ते नाही आले. उलट भाषणं करत मतं मागताहेत.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAjit Dovalअजित डोवालkolhapurकोल्हापूर