शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक परीक्षांसाठीचा प्रस्ताव देणार, विद्यापीठ विकास मंचची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:31 IST

शिवाजी विद्यापीठातील विविध घटकांचे प्रश्न सोडविणे, विकासाच्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ‘विद्यापीठ विकास मंच’ स्थापन करण्यात आला आहे. या मंचने आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे; कला, वाणिज्य शाखांसाठी वार्षिक परीक्षा पद्धती असावी, आदी विविध मागण्यांबाबत पाठपुरावा केला आहे. पदवी प्रमाणपत्रांची दुबार छपाई प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मंचची मागणी असल्याचे अधिसभा सदस्य पंकज मेहता, श्रीनिवास गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देवार्षिक परीक्षांसाठीचा प्रस्ताव देणार, विद्यापीठ विकास मंचची मागणी दुबार प्रमाणपत्र छपाई प्रकरणातील दोषींवर कारवाई करा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध घटकांचे प्रश्न सोडविणे, विकासाच्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ‘विद्यापीठ विकास मंच’ स्थापन करण्यात आला आहे. या मंचने आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे; कला, वाणिज्य शाखांसाठी वार्षिक परीक्षा पद्धती असावी, आदी विविध मागण्यांबाबत पाठपुरावा केला आहे. पदवी प्रमाणपत्रांची दुबार छपाई प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मंचची मागणी असल्याचे अधिसभा सदस्य पंकज मेहता, श्रीनिवास गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.मेहता म्हणाले, विद्यापीठाचा शैक्षणिक, संशोधनात्मक विकास हे विद्यापीठ विकास मंचचे ध्येय आहे. त्यासाठी मंचने विविध रचनात्मक सूचना, ठराव विद्यापीठात सादर केले आहेत. पाठपुरावा केला आहे. त्यामध्ये खेळाडूंसाठी वैद्यकीय विमा सुविधा, मुलींच्या वसतिगृहात अद्ययावत सोयीसुविधा असाव्यात, सांगली व सातारा येथे विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, आदींचा समावेश आहे.

गायकवाड म्हणाले, दुबार प्रमाणपत्र छपाई प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला, तर मंच त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. अधिसभा सदस्य दिनेश जंगम म्हणाले, प्राध्यापकांचे विविध प्रश्न आणि विद्यार्थ्यांसाठी छात्र संसद, खुल्या निवडणुका आगामी शैक्षणिक वर्षात घेण्यात याव्यात, अशी मागणी मंचने केली आहे. या पत्रकार परिषदेस अधिसभा सदस्य आरती शिंदे उपस्थित होत्या.

प्रस्तावासाठी समितीची स्थापनाविद्यापीठात कला, वाणिज्य शाखेसाठी पुन्हा वार्षिक परीक्षा पद्धती कशा पद्धतीने राबविता येईल; त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) कशी मान्यता घेता येईल, याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मंचने समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये पाच सदस्यांचा समावेश आहे. या समितीद्वारे प्रस्ताव तयार करून तो विद्यापीठाला सादर केला जाणार आहे. अन्य मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर