शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पूरग्रस्त भागात उड्डाणपुलांची तयारी: जिल्हा प्रशासनाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 15:35 IST

महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देजागतिक बॅँकेकडे अर्थसाहाय्याची मागणी होणार १२ सप्टेंबरला जागतिक बॅँके चे प्रतिनिधी कोल्हापुरात येणार

प्रवीण देसाई कोल्हापूर : महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. १२ व १३ सप्टेंबरला जिल्ह्यात जागतिक बॅँकेचे प्रतिनिधी येत आहेत. त्यांच्यासमोर अर्थसाहाय्याकरिता याचे सादरीकरण केले जाणार आहे.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुराने जिल्ह्यात हाहाकार माजला होता. ३५० हून अधिक गावे पूरबाधित झाली होती. त्यांमध्ये शिरोळ तालुक्यातील १८, हातकणंगलेतील पाच, करवीरमधील चार गावे व कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार गल्ली, शाहूपुरी गवत मंडई, व्हीनस कॉर्नर, न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, नागाळा पार्क असा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.

या ठिकाणांची परिस्थिती भीषण होती. गावातील रस्त्यांबरोबरच गावातून इतर गावांसह शहरी भागाला जोडले जाणारे पर्यायी रस्तेही पाण्याखाली गेले होते. या ठिकाणी उड्डाणपूल असते तर नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर जाता आले असते. या विचारातून जिल्हा प्रशासनाने या २७ गावांसह कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

यासाठी हजारो कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्याकरिता थेट जागतिक बॅँकेकडून अर्थसाहाय्य मागण्याची तयारी सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याकरिता अर्थसाहाय्याची मागणी केली जाणार आहे.गेल्या आठवड्यात दिल्ली येथे जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्त भागांतील नुकसानीची माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर १२ व १३ सप्टेंबरला कोल्हापुरात जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल होणार आहे.

यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्यासमोर पूरबाधित भागाचे सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये उड्डाणपुलांकरीता अर्थसाहाय्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.पूरबाधित २७ गावांसह कोल्हापूर शहराचा विचारउड्डाणपुलासाठी शिरोळ तालुक्यातील १८ गावांसह हातकणंगले तालुक्यातील पाच, करवीर तालुक्यातील चार व कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, सुतारवाडा, शाहुपुरी कुंभार गल्ली, शाहूपुरी गवत मंडई, व्हीनस कॉर्नर, न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, नागाळा पार्क, आदी परिसरांचा विचार सुरू आहे.

जनावरांसाठी सुरक्षित तळउड्डाणपुलांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच गावांमधील गाई, म्हशी अशा पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचा विचार केला जात आहे. त्यांच्यासाठी उड्डाणपुलांना जोडले जातील अशा पद्धतीने जनावरांचे सुरक्षित तळही उभे करण्याचा विचार आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरpwdसार्वजनिक बांधकाम विभागWorld Bankवर्ल्ड बँक