शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त भागात उड्डाणपुलांची तयारी: जिल्हा प्रशासनाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 15:35 IST

महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देजागतिक बॅँकेकडे अर्थसाहाय्याची मागणी होणार १२ सप्टेंबरला जागतिक बॅँके चे प्रतिनिधी कोल्हापुरात येणार

प्रवीण देसाई कोल्हापूर : महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. १२ व १३ सप्टेंबरला जिल्ह्यात जागतिक बॅँकेचे प्रतिनिधी येत आहेत. त्यांच्यासमोर अर्थसाहाय्याकरिता याचे सादरीकरण केले जाणार आहे.सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुराने जिल्ह्यात हाहाकार माजला होता. ३५० हून अधिक गावे पूरबाधित झाली होती. त्यांमध्ये शिरोळ तालुक्यातील १८, हातकणंगलेतील पाच, करवीरमधील चार गावे व कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार गल्ली, शाहूपुरी गवत मंडई, व्हीनस कॉर्नर, न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, नागाळा पार्क असा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.

या ठिकाणांची परिस्थिती भीषण होती. गावातील रस्त्यांबरोबरच गावातून इतर गावांसह शहरी भागाला जोडले जाणारे पर्यायी रस्तेही पाण्याखाली गेले होते. या ठिकाणी उड्डाणपूल असते तर नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर जाता आले असते. या विचारातून जिल्हा प्रशासनाने या २७ गावांसह कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

यासाठी हजारो कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्याकरिता थेट जागतिक बॅँकेकडून अर्थसाहाय्य मागण्याची तयारी सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याकरिता अर्थसाहाय्याची मागणी केली जाणार आहे.गेल्या आठवड्यात दिल्ली येथे जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्त भागांतील नुकसानीची माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर १२ व १३ सप्टेंबरला कोल्हापुरात जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल होणार आहे.

यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्यासमोर पूरबाधित भागाचे सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये उड्डाणपुलांकरीता अर्थसाहाय्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.पूरबाधित २७ गावांसह कोल्हापूर शहराचा विचारउड्डाणपुलासाठी शिरोळ तालुक्यातील १८ गावांसह हातकणंगले तालुक्यातील पाच, करवीर तालुक्यातील चार व कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, सुतारवाडा, शाहुपुरी कुंभार गल्ली, शाहूपुरी गवत मंडई, व्हीनस कॉर्नर, न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, नागाळा पार्क, आदी परिसरांचा विचार सुरू आहे.

जनावरांसाठी सुरक्षित तळउड्डाणपुलांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच गावांमधील गाई, म्हशी अशा पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचा विचार केला जात आहे. त्यांच्यासाठी उड्डाणपुलांना जोडले जातील अशा पद्धतीने जनावरांचे सुरक्षित तळही उभे करण्याचा विचार आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरpwdसार्वजनिक बांधकाम विभागWorld Bankवर्ल्ड बँक