शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

पंतप्रधान सन्मान योजना: अपात्र शेतकऱ्यांची वसुली मोहीम ठप्प, कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 18:22 IST

अपात्र खातेदारांकडून पैसे वसूल करणे अवघड

राजाराम लोंढेकोल्हापूर : पंतप्रधान सन्मान योजनेंतर्गत खातेदार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. यामध्ये जिल्ह्यात २० हजार ९८५ शेतकरी अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांकडून घेतलेल्या लाभाचे पैसे वसूल करण्याचे आदेश देण्यात आले; मात्र गेल्या वर्षभरात त्यात फारसे यश आले नाही. केंद्र सरकारने या शेतकऱ्यांचा तेरावा हप्ता थांबवला असला तरी वसुलीची मोहीम ठप्पच आहे.देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम किसान’ सन्मान योजना सुरू केली. चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना पेन्शन म्हणून दिले जातात. जिल्ह्यात ५ लाख ४९ हजार ३०७ लाभार्थी होते. मात्र, यातील लाभार्थ्यांची चौकशी केली असता निकष डावलून पैसे घेणारे लाभार्थी समोर आले. यामध्ये तब्बल २० हजार ९८५ खातेदार अपात्र ठरले. यामध्ये ज्यांच्या नावावर जमीनच नाही, पती-पत्नी दोघेही लाभ घेत आहेत, आयकर परतावा करणारे, इतर पेन्शन घेणाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित खातेदारांची पेन्शन बंद करून त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्याचे आदेश केंद्र सरकारने महसूल विभागाला दिले होते. महसूल विभागाने अपात्र शेतकऱ्यांची नावे कळवूनही त्यांच्या नावावर बाराव्या हप्त्याचे पैसे आले होते. मात्र, तेराव्या हप्त्याचे पैसे संबंधितांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत.मयत शेतकऱ्यांचे वसूल कोणाकडून करायचे?केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले असले तरी खर्च झालेले पैसे वसूल करणे तितकेसे सोपे नव्हते. मुळात योजनेचा लाभ देण्यापूर्वीच सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पात्र, अपात्र ठरविणे कायद्याने अपेक्षित आहे. लाभ घेतल्यानंतर त्याला अपात्र ठरविणे व त्यांच्याकडून पैसे वसूल करणे अडचणीचे ठरू शकते. त्यात काही लाभार्थी मयत आहेत, ते पैसे कोणाकडून वसूल करायचे, असा प्रश्न आहे.महसूल विभागाने नाक दाबण्याची गरजअपात्र खातेदारांकडून पैसे वसूल करणे अवघड आहे. ज्यांना एका हप्त्यात परत करता येत नसतील तर टप्पे पाडून ती रक्कम वसूल केली पाहिजे. ज्यांना शक्य आहे, पण भरायची मानसिकता नाही, त्यांचे नाक दाबण्याची गरज आहे.आयकर दात्यांकडून २.४० कोटी वसूलगेल्या दीड वर्षात आयकरदात्या लाभार्थ्यांकडून बऱ्यापैकी वसुली झाली आहे. जिल्ह्यात २,३७१ आयकर भरणारे खातेदार होते. त्यांच्याकडून २ कोटी ४० लाखांची वसुली झाली आहे.दुहेरी लाभार्थ्यांची पाठकेंद्र सरकारच्या या योजनेनुसार एका कुटुंबातील एकालाच लाभ घेता येतो. मात्र, पती व पत्नी दोघांनीही लाभ घेतला आहे. जिल्ह्यात असे १७०० खातेदार आहेत. त्यांच्याकडून एक रुपयाही वसूल झालेला नाही.

तालुकानिहाय अपात्र खातेदार असे -तालुका - अपात्र खातेदारकरवीर - २७८०कागल - २३६०राधानगरी - ३२००शाहूवाडी - १७२०पन्हाळा - २२००गगनबावडा - ७००भुदरगड - १९३०शिरोळ - १४८०हातकणंगले - ११३०गडहिंग्लज - १४३२आजरा - १०७७चंदगड - ९७६

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी