शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

जिल्ह्यातील उद्योग बंद राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:24 AM

CoronaVirus Shiroli Kolhapur : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून संचार बंदीच्या काळात उद्योग धंदे सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अजिंक्यतारा येथे पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विनंती केली होती; पण शासन निर्देशानुसार आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार सुरू ठेवावे लागतील.

ठळक मुद्देजिल्ह्यातील उद्योग बंद राहण्याची शक्यताउद्योग बंद राहिल्यानंतर सर्वांना फटका

शिरोली : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून संचार बंदीच्या काळात उद्योग धंदे सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अजिंक्यतारा येथे पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विनंती केली होती; पण शासन निर्देशानुसार आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार सुरू ठेवावे लागतील.

यामध्ये संबंधित कंपनीने कामगारांना कंपनीतच ठेवावे, किंवा इतर कुठे ही एकत्रित ठेवावे.कामगारांना ये-जा करता येणार नाही. अन्यथा बंद ठेवावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. त्यामुळे १५ ते ३० एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील सर्वच उद्योगधंदे बंद राहण्याची शक्यता आहे.

मुंबई, पुणे या मोठ्या मेट्रो शहरानंतर कोल्हापूर येथील ऑटोमोबाइल उद्योग हे जगभरात प्रसिद्ध आहेत. शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल, या मोठ्या औद्योगिक वसाहतीबरोबरच कोल्हापूर शहरातील वाय. पी. पोवार नगर, उद्यमनगर याठिकाणी लहान लहान उद्योग आहेत, तसेच हातकणंगले, इचलकरंजी, कुशिरे, गडहिंग्लज याठिकाणीसुद्धा उद्योग विस्तार झालेला आहे. जिल्ह्यात लहान-मोठे सुमारे पाच हजारांहून अधिक उद्योग आहेत, तर या उद्योगावर अवलंबून असलेले सुमारे एक लाखापेक्षा जास्त कामगार आहेत.

परप्रांतीय मंजुरांची संख्या २० हजार पेक्षा जास्त आहे. त्यामुळे उद्योग बंद राहिल्यानंतर या सर्वांना फटका बसणार आहे. यावेळी स्मॅक अध्यक्ष अतुल पाटील,राजू पाटील,मॅक अध्यक्ष गोरख माळी, दिनेश बुधले यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. अत्यावश्यक सेवेतील औषध तयार करणाऱ्या कंपन्या, शेती औजारे तयार करणारे उद्योग, कोरोगेटेड इंडस्ट्रीज सुरू राहणार आहेत.

शासनाने जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्राकानुसार नियम व अटी मान्य करून ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्योग सुरू ठेवावेत.

-अतुल पाटील-अध्यक्ष स्मॅक

कामगार रस्त्यावरून येणार-जाणार नाहीत. जे कामगारांना कंपनीतच ठेवतील त्यांचेच उद्योग सुरू राहणार आहेत.

-श्रीकांत पोतनीस -अध्यक्ष गोशिमा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर