शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

CoronaVirus In Kolhapur : पोलीस, मनपा कर्मचाऱ्यांनी सक्तीने विक्रेत्यांना हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 18:08 IST

CoronaVirus Kolhapur : लॉकडाऊनचे निर्बंध कडक असूनदेखील रोज सकाळी होणारी बाजारपेठेतील गर्दी काही केल्याने हटत नाही, ही गर्दी प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे. कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या या गर्दीला पोलीस आणि महापालिका प्रशासनास बळाचा वापर करून हटवावे लागत आहेत. रोज काही पटीने वाढणारे कोरोना रुग्णांमुळे आरोग्य प्रशासन हैराण झाले असताना, जनता मात्र आपले कर्तव्य पार पाडताना दिसत नाही.

ठळक मुद्देपोलीस, मनपा कर्मचाऱ्यांनी सक्तीने विक्रेत्यांना हटविले बाजारपेठेतील गर्दी प्रशासनाची डोकेदुखी

कोल्हापूर : लॉकडाऊनचे निर्बंध कडक असूनदेखील रोज सकाळी होणारी बाजारपेठेतील गर्दी काही केल्याने हटत नाही, ही गर्दी प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे. कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या या गर्दीला पोलीस आणि महापालिका प्रशासनास बळाचा वापर करून हटवावे लागत आहेत. रोज काही पटीने वाढणारे कोरोना रुग्णांमुळे आरोग्य प्रशासन हैराण झाले असताना, जनता मात्र आपले कर्तव्य पार पाडताना दिसत नाही.कोल्हापूर जिल्ह्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती, तिची मुदत दि. १५ मे पर्यंत दुसऱ्यांदा वाढविण्यात आली. मात्र या दरम्यान रोज सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने व भाजी मंडई सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. गोकूळ दूध संघाची निवडणूक ही याच दरम्यान सुरू होती.

त्यामुळे संचारबंदी लागू करूनही काही केल्या कोरोनावर नियंत्रण मिळविता आले नाही. उलट कोरोनाचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे आता शनिवारी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केला जात आहे, या दरम्यान कोणाही व्यक्तीला आपले राहते घर सोडून रस्त्यावर येता येणार नाही.लॉकडाऊनची कुणकुण लागताच गेल्या तीन चार दिवसापासून नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करायला सुरवात केली. सकाळच्या सत्रात चार तास दुकाने उघडी राहिल्यामुळे या चार तासातच प्रचंड गर्दी होत आहे. परंतु सकाळी अकरा वाजेपर्यंत लोकांना रोखताही येत नाही. त्यामुळे होणारी गर्दी प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे. भाजीपाला, धान्य तसेच किराणा माल घेण्याकरिता नागरिक दुकानांसमोर रांगा लावत आहेत.गुरुवारी सकाळी शहरातील सर्वच रस्त्यावर, बाजारपेठेत, भाजी मंडईतून गर्दी उसळली होती. दुकानदारांनी बऱ्यापैकी सोशल डिस्टंन्स राखण्यात यश मिळविले होते, परंतु भाजी मंडईत त्याचे कोणालाच भान रहात नाही. रस्त्यावर वाहनांची गर्दी, बाजारात लोकांची गर्दी होती. सकाळी साडेअकरा वाजल्यानंतर मात्र पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सक्तीने लोकांचे बाजार उठविले.शहरात महाराणा प्रताप चौक, लुगडी ओळ येथील वडाप रिक्षा थांब्यावर अनेक रिक्षा प्रवाशांच्या प्रतीक्षेत होते. प्रवासी मिळतील तशा या रिक्षा रस्त्यावर धावताना दिसत होत्या. एकीकडे केएमटीची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली असताना दुसरीकडे रिक्षाची वडाप वाहतुक सुरू होती. पेट्रोलपंप सुरू होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर