शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची बंदूक गावकऱ्यांच्या खांद्यावर : गावकऱ्यांचा ‘निशाणा’ पोलिसांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:56 IST

राम मगदूम ।गडहिंग्लज : मुत्नाळमधील अवैध धंद्याच्या बंदोबस्ताचा ठराव गावसभेत एकमताने मंजूर झाला. त्याच्या अंमलबजावणीची सर्वस्वी जबाबदारी आता पोलिसांवर आहे. मात्र, त्यासाठी गावात पोलीस मित्रांची नेमणूक करून त्यांच्यावरच ही ‘कामगिरी’ सोपविण्याचा इरादा पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी त्याच गावसभेत जाहीर केला. म्हणजेच ‘तुमच्या गावातील अवैध धंद्याचा बंदोबस्त तुम्हीच करा’ असा ...

ठळक मुद्देमुत्नाळमधील अवैध धंदे

राम मगदूम ।गडहिंग्लज : मुत्नाळमधील अवैध धंद्याच्या बंदोबस्ताचा ठराव गावसभेत एकमताने मंजूर झाला. त्याच्या अंमलबजावणीची सर्वस्वी जबाबदारी आता पोलिसांवर आहे. मात्र, त्यासाठी गावात पोलीस मित्रांची नेमणूक करून त्यांच्यावरच ही ‘कामगिरी’ सोपविण्याचा इरादा पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी त्याच गावसभेत जाहीर केला. म्हणजेच ‘तुमच्या गावातील अवैध धंद्याचा बंदोबस्त तुम्हीच करा’ असा अप्रत्यक्ष सल्ला देत त्यांनी आपली बंदूक गावकºयांच्या खांद्यावरच ठेवली आहे.

संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावरील हिटणी नाक्यापासून हिटणी व मुत्नाळ या गावांची हद्द सुरू होते. अवैध धंदे चालकांनी काही वर्षापासून याठिकाणी आपले हात-पाय पसरले आहेत. त्यातून निर्माण झालेल्या हितसंबंधामुळेच बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील ‘शिनोळी’प्रमाणेच हिटणी नाक्यावरील दारू, मटका, जुगार आदी अवैधधंदे तेजीत आल्यानेच त्यातील ‘हितसंबंध’ अधिक घट्ट होत गेले. त्यामुळेच त्याला आव्हान देणे अवघड होते. परंतु, निडसोशी मठाचे मठाधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनीच त्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने त्यांचा ‘शब्द’ प्रमाण मानणारे मुत्नाळकर पुढे सरसावले आहेत. किंबहुना, त्यासाठीच सरपंचांना ही गावसभा बोलवावी लागली.

यावेळी उपस्थित राहिलेले पोलीस निरीक्षक हसबनीस यांनी ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची ग्वाही जाहीरपणे दिली. मात्र, त्यासाठी गावात २० पोलीस मित्रांची नेमणूक करून त्यांना बॅचीस, काठी व टॉर्च दिला जाईल. त्यांनी गावात पोलिसांची भूमिका बजावावी. गावच्या निर्णयानंतरदेखील शिरजोरी करून कुणी अवैध धंदे सुरू केले, तर त्यांना पकडून ठेवा, त्यांच्यावर ‘आम्ही’ नियमाप्रमाणे कारवाई करू. मुत्नाळमधील हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो गडहिंग्लज तालुक्यातील अन्य गावातही राबविली जाईल, अशी ग्वाही दिली. परंतु त्यांच्या सल्ल्याने ग्रामस्थ बुचकळ्यात पडले आहेत.अवैध धंदे का वाढले !हिटणी नाका परिसरातील जमीन माळरान आहे. परंतु, सीमेवरील शेतात एखादी टपरी, शेड घालायला केवळ मोकळी जागा भाड्याने दिली तरी चांगले पैसे मिळायला लागले. त्यामुळेच या ठिकाणी बेकायदेशीर ‘उद्योगां’ना निवारा मिळू लागला. सध्या येथील ‘धंदे’ बंद असले तरी ते निवारे अजूनही उपलब्ध आहेत. म्हणूनच ते जमीनदोस्त करण्याची मागणी आहे.सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस जबाबदार२०१३ मध्ये महिलांच्या मतदानाने मुत्नाळमधील सरकारमान्य दारू दुकान बंद झाले आहे. मटका-जुगारीला शासनाची मान्यताच नाही. त्यामुळे गावसभेच्या निर्णयानंतरदेखील अवैध धंदे सुरूच राहून गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आल्यास त्याची जबाबदारी पोलिसांवर राहील, असा ठराव करून ग्रामस्थांनी पोलिसांवरच ‘निशाणा’ ठेवला आहे.स्वामीजी का संतापले !दोन दशकांपासून ज्ञानदासोहाच्या माध्यमातून मुत्नाळ गावच्या सामाजिक सुधारणेसाठी महास्वामीजी प्रयत्नशील आहेत. असे असतानाही गावात अवैध धंदे वाढतच राहिले. त्यात काही गावपुढाºयांचाही ‘इंटरेस्ट’ असल्याचे समजल्यामुळेच स्वामीजी संतापले. त्यामुळेच त्यांनी आधी गावातील अवैध धंदे बंद करा. मगच ‘दासोह’ करू, अशी भूमिका घेतली. त्यामुळेच ग्रामस्थांबरोबरच पोलीसही पेचात सापडले आहेत.

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर