शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

प्रधानमंत्री पिक विमा मुदत वाढवून द्यावी, शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 13:52 IST

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व लॉकडाऊनमुळे पिक विमा करण्यात अडथळे आल्याने व विमा मुदत संपल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांही शेतकरी बांधवानी ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी लावून धरली आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पिक विमा मुदत वाढवून द्यावी, शेतकऱ्यांची मागणीकोरोनाच्या भितीने पिक विमा नोंदणीत अडथळे

श्रीकांत ऱ्हायकरधामोड- कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व लॉकडाऊनमुळे पिक विमा करण्यात अडथळे आल्याने व विमा मुदत संपल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांही शेतकरी बांधवानी ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी लावून धरली आहे.

एकिकडे पावसाने पाठ फिरवल्याने हातची पिके गेल्याचे चित्र सद्या दिसते आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा वाढता प्रभाव व सततचे लॉकडाऊन यामुळे घराबाहेर पडणे जिकीरीचे झाले आहे.दुष्काळ, पावसातील खंड, पूर यासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकांच्या सरासरी उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे या उद्देशाने केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने विमा कंपनी अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना विमा कवच देण्याचा प्रयत्न असतो. यासाठी पिक लागणीनंतर ठराविक मुदतीत पिक विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात येते. यासाठी शासन व कृषी विभागाकडुन प्रबोधन करण्यात येते .या वर्षीही रिलायन्स जनरल विमा कंपनीच्या सहकार्याने ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याची मुदत काल संपली. पण यावर्षी पावसाची अनियमितता प्रचंड वाढली आहे, गतसालच्या तुलनेत पाऊसही कमीच झाला. त्यामुळे पेरणी केलेली बहुतांशी पिके पावसाअभावी शेतातच वाळली.

दुष्काळ सदृश्य परस्थिती असताना शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची गरज वाटते आहे. पण कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडता आले नाही . व त्यातच ही विमा मुदत संपली. ही मुदत वाढवुन मिळावी ही मागणी जोर धरत आहे.

यावर्षी  २०८३ शेतकऱ्यांचा पिक विमा 

गतसाली ६८२ शेतकऱ्यांनी २९६ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील भात, भुईमूग नाचणी इ. पिकाचा विमा उतरवला होता. पैकी ५८२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती, तर यावर्षी  २०८३ शेतकऱ्यांनी ४७४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला असे चित्र आहे.

गतसालच्या तुलनेत पिक विमा नोंदीचा आकडा जरी वाढला असला तरी पिक विमा नोंदणीसाठी दिलेली मुदत कमी आहे. मुदत वाढवून मिळाल्यास अजुनही जवळपास १५० हेक्टर क्षेत्राची वाढ होऊ शकते.- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा कृषी अधिकारी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर